शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

सावधान..पैसे घेऊन नव-या मुलींचे ‘भागम भाग’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 13:51 IST

सध्या राज्यभरात नोकरी नसलेल्या, मोलमजुरी करणा-या, मोठी इस्टेट नसलेल्या मुलांना ‘स्व’ जातीतील मुली मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मच्छिंद्र देशमुखकोतूळ : सध्या राज्यभरात नोकरी नसलेल्या, मोलमजुरी करणा-या, मोठी इस्टेट नसलेल्या मुलांना ‘स्व’ जातीतील मुली मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दलालाच्या माध्यमातून लग्न मोठ्या थाटात होते. लग्नानंतर पहिल्यांदा नवरी मुलगी माहेरी गेल्यानंतर परत येतच नाही. फसवणूक झाल्यानंतर नवरा मुलगा आणि नातेवाईकांवर पश्चाताप करण्याची वेळ येते.लग्न न जमणा-या मुलांचे झटपट लग्न जमविण्यासाठी दलाल जोमात आहेत. हे दलाल एक लाख ते पाच लाख रूपयांमध्ये ‘सौदा’करतात. इतर समाजातील मुलींशी लग्न लावून देतात. मोठ्या थाटामाटात लग्न केले जाते. सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये रितसरपणे नवरी मुलगी माहेरी जाते. त्यानंतर ती कधीच सासरी येत नाही. नवरी मुलींना लग्नानंतर परत आणण्याचा प्रयत्न केल्यास इस्टेटीत वाटा मागण्याची किंवा जातीवाचक गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. फसवणूक झाली तरी तक्रार करायला कोणीही पुढे येत नाही. यात काही विशिष्ट समाजातील मुलांना टार्गेट केले जात असल्याचे चित्र आहे.एकट्या अकोले तालुक्यात असे डझनभर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सध्या शेतकरी, मजूर, किंवा आई, वडील नसलेले तसेच कमी प्रॉपर्टी असलेल्या मुलांची लग्न ‘स्व’ जातीतील मुलींच्या अति अपेक्षा वाढल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून परजातीचीही चालेल असा पालकांचा विचार होत आहे. याचाच फायदा काही एजंट घेत आहेत. पेठ, सुरगाणा, जवाहर, मोखाडा, इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील काही गावातील व गुजरातच्या सीमावर्ती भागातील विशिष्ट समाजातील मुलगी देतो, असे सांगून हे दलाल फसवणूक करीत आहेत.मुलीच्या आई, वडिलांची परिस्थिती गरीब आहे. त्यांना पैसे द्यावे लागतील असा बनाव केला जातो. मुलगी पाहण्यासाठी जाताना दलाल दहा ते वीस हजारांचे टोकन घेतात. लग्नाच्या दिवशी ठरलेली रक्कम घेतात. ही रक्कम एक ते पाच लाख, कधी कधी घर किंवा जमीन मुलीच्या नावावर करून घेतात.यात एखादा अतिचौकस पालक असेल तर रजिस्टर लग्न होते. विशेष म्हणजे लग्न किंवा माळ घालण्याचा कार्यक्रम मुलाच्या गावाकडे गुपचूप मंदिरात होतो. नवरी येते. पहिल्यांदा गेल्यावर मात्र ती परत येत नाही. मला करमत नाही. भाग चांगला नाही. नवरा चांगला नाही, असे सांगितले जाते. समजूत काढायला गेल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. तर कधी कधी घर किंवा जमिनीवर दावा दाखल करण्याची धमकी दिली जाते. नावावर केलेली मालमत्ता परत करण्यासाठी मोठी रक्कम घेतली जाते. यातील काही मुलींचे यापूर्वी लग्नही झालेले असते. अशी अनेकांची फसवणूक झाली, नगर व नाशिक जिल्ह्यात अशा एजंटांची संख्या मोठी आहे.सध्या शेती व्यवसायातून फारसे उत्पन्न नाही. यामुळे समाजातील अनेक मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेती व अल्प उत्पन्न असलेल्या मुलांशी लग्न करणे त्या टाळतात. अशा मुलांची फसवणूक होत आहे. फसवणूक झालेल्या मुलांनी व पालकांनी कायद्याची मदत घेतल्यास इतरांची फसवणूक होणार नसल्याचे शेतकरी अविवाहित मुलांच्या समस्यांचे अभ्यासक शांताराम गर्जे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले