शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

आवडीच्या विषयातच करिअरची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:03 IST

अहमदनगर : बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या आवडीची शाखा निश्चित करून पुढील करिअरची दिशा ठरवावी,

अहमदनगर : बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या आवडीची शाखा निश्चित करून पुढील करिअरची दिशा ठरवावी, असे मत पुणे येथील सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस् व्हीआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा़ डॉ़ अभिजित औटी यांनी व्यक्त केले़ ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘महाविद्यालय आणि शाखा निवड’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते़ ते म्हणाले, अभियांत्रिकीला प्रवेश घेताना महाविद्यालयाची निवड हा महत्त्वाचा विषय असतो़ नामांकित महाविद्यालयांमध्ये शुल्क जास्त असते. मात्र, तेथे सुविधाही चांगल्या मिळतात़ शुल्क कमी असलेल्या महाविद्यालयांत बहुतांशीवेळा सुविधा मिळत नाहीत़ असे सांगत औटी यांनी महाविद्यालयाची निवड करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी प्रा़ केदार जोशी यांनी ‘अभियांत्रिकी म्हणजे नक्की काय?’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ ते म्हणाले, कॅम्प राऊंड एकमध्ये जवळपास ८० ते ९० टक्के प्रवेश होतात़ दुसऱ्या व तिसऱ्या राऊंडची वाट पाहत बसल्यास प्रवेश संधी गमविण्याची शक्यता असते़ अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीत खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पीसीएम ग्रुपला किमान १५० गुण हवेत़ राखीव जागेसाठी १३५ गुण हवेत़ पीसीएमच्या गुणांची बेरीज कमी होत असेल तर केमेस्ट्री ऐवजी बायोलॉजी, बायोटेक, टेक्निकल यापैकी एका विषयातील गुणांसह १५० (खुला गट), १३५ (राखीव गट) झाले तरी तो विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतो़यावेळी महाविद्यालय, प्रवेश आणि करिअर या विषयी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या शंकांचे औटी व जोशी यांनी निरसन केले़ (प्रतिनिधी)