शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

११ मतदारसंघात बसपाकडून उमेदवार

By admin | Updated: September 28, 2014 23:25 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने मागील पंचवार्षिकप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यातील अकोले वगळता ११ मतदारसंघात उमेदवार दिले आहेत़

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने मागील पंचवार्षिकप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यातील अकोले वगळता ११ मतदारसंघात उमेदवार दिले आहेत़ या पक्षाची जिल्ह्यात कोणत्याच मतदारसंघात प्रभावी ठरेल अशी ताकद नाही़ मात्र, पक्षाने अस्तित्वाची लढाई सुरु ठेवली आहे. एकीकडे मनसेसारख्या पक्षांना जिल्ह्यात उमेदवार देता आले नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, सेनेसारख्या पक्षांना ऐनवेळी ‘आयात’ उमेदवारांवर वेळ मारुन न्यावी लागली. त्या तुलनेत बसपाने पक्षातूनच उमेदवार देण्यात यश मिळविले आहे.मागील विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात एक या प्रमाणे १२ उमेदवार रिंगणात होते़ मात्र, यातील एकाही उमेदवाराला आपली अनामत रक्कमही वाचविता आली नव्हती़ एकेकाळी मायावती यांचा उत्तरप्रदेशात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग चांगला यशस्वी झाला होता़ २००९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या पक्षाने महाराष्ट्रातही हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता़ मात्र, हा पक्ष सर्वव्यापक होवू शकला नाही़ राज्यातील विदर्भ वगळता कोणत्याच अन्य ठिकाणी या पक्षाला पाय रोवता आले नाही़ जिल्ह्यात सन २००४ पासून हा पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे़ मात्र, कोणत्याच मतदारसंघात कधीच तुल्यबळ उमेदवार दिला गेला नाही़ ज्या उमेदवारांनी निवडणूक लढविली ते पक्षाचे तालुका पातळीवर काम करणारे पदाधिकारी होते़ त्यामुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना बसपा उमेदवारांची कधीच दखल घेण्याची वेळ आली नाही़ यावेळीही जिल्ह्यातील ११ मतदारसंघात पक्षाने उमेदवार दिले आहेत़ मुळात राज्यपातळीवरच हा पक्ष सर्वव्यापक नसल्याने निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र संघटना पातळीवर उमेदवार देण्याची किमया त्यांनी साधली, हेही नसे थोडके. स्थानिक पातळीवर आणि स्वत:च्या बळावर पक्षाच्या अस्तीत्वासाठी सुरु असलेला हा लढा म्हणूनच दखलपात्र ठरावा. आता निवडणुकीत कोण, किती मते घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ (प्रतिनिधी)