शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळी परीक्षा रद्द, पालक संतप्त

By admin | Updated: March 20, 2016 23:17 IST

अहमदनगर/पाथर्डी : राहुरीच्या क्षितिज प्रकाशन या खासगी संस्थेने रविवारी नगरमध्ये आयोजित सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा संयोजकांनी ऐनवेळी रद्द केली.

अहमदनगर/पाथर्डी : राहुरीच्या क्षितिज प्रकाशन या खासगी संस्थेने रविवारी नगरमध्ये आयोजित सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा संयोजकांनी ऐनवेळी रद्द केली. यामुळे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. परीक्षेसाठी येण्या-जाण्याचा आर्थिक भुर्दंड या विद्यार्थी आणि पालकांना बसला, याशिवाय वेळही वाया गेला आहे. तर पाथर्डीत सुमारे दीड तास उशीरा सुरू झालेल्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिका कमी पडल्याने गोंधळ उडाला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे परीक्षेसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. क्षितिज प्रकाशन या खासगी संस्थेच्या वतीने इ. २ री ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेचे संयोजन केले होते. या परीक्षेला जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी, खासगी शाळेतील विद्यार्थी बसले होते. यासाठी वर्गनिहाय विद्यार्थ्यांकडून फी आकारण्यात आलेली होती. यात २ री साठी १०० रुपये, ३ री साठी १३० रुपये, ४ थी साठी १५०, ५ वी साठी २०० रुपये, ६ वी साठी २५० आणि ७ वी साठी ३१० रुपयांप्रमाणे फी आकारण्यात आली. या परीक्षेला बसण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी शिक्षण विभागाची कोणतीच परवानगी घेतलेली नव्हती. अनेक ठिकाणी शिक्षकांनी पालकांना सक्ती करून विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवले होते. रविवारी परीक्षेचा नियोजित वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत होता. मात्र, १२ वाजेपर्यंत संयोजक आले नाहीत. शहरातील सविता रमेश फिरोदिया आणि समर्थ विद्या मंदिर शाळेत परीक्षा केंद्र होते. या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने परीक्षा रद्द झाल्याची माहिती पालक आणि शिक्षकांना दिली. कर्जत, श्रीगोंदा, नगर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी खासगी वाहनांनी नगरला आले होते. परीक्षा रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांना रस्त्यावर, शहरातील इमारतीच्या आडोशाला बसून जेवण करण्याची वेळ आली. या परीक्षेत भाषा, गणित आणि बुध्दिमत्ता विषयाचा पेपर होणार होता. तांत्रिक कारणामुळे परीक्षा रद्द परीक्षा रद्द झाल्यानंतर दुपारी क्षितिज प्रकाशनचे जी. के.गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षेला उशीर झाल्याने नगरमधील परीक्षा रद्द करावी लागली. पुढील आठवड्यात परीक्षेचे पुन्हा नियोजन करण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण सोडवण्यास वेळ झाला, यामुळे परीक्षा रद्द करावी लागली. सकाळपासून ग्रामीण भागातून लहान मुले आलेली आहेत. उन्हाचा तडाखा मोठा आहे. त्याच परीक्षेत एकच गोंधळ झाला. यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. शिक्षण खात्याची परवानगी नसेल तर अशा परीक्षा का घेतल्या जातात, असा सवाल पाथर्डी येथील पालक अजय साठे, काकासाहेब उदागे, विठ्ठल बोकेफोडे, संदीप श्ािंदे यांनी उपस्थित केला आहे. या खासगी परीक्षेच्या नावाखाली जिल्ह्यात लाखो रुपयांची विद्यार्थी आणि पालकांची लूट सुरू आहे. या लुटीला प्रशासनातील अनेकांचे वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. दरवर्षी हा प्रकार सुरू असताना जिल्हा परिषद या प्रकाराला आळा का घालत नाही, असा सवाल पालकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र होते, तेथे जाऊन विचारणा केली असता, आमचा परीक्षेशी संबंध नाही. परीक्षेसाठी आम्ही विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली होती. परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपर्यंत संयोजक आले नाहीत. यामुळे आम्हाला परीक्षा रद्द झाली असल्याचे शिक्षक आणि पालकांना सांगावे लागले. ही प्रज्ञाशोध परीक्षा खासगी संस्थेमार्फत घेण्यात येत आहे. याला जिल्हा परिषदेची कोणतीच परवानगी नाही. पालक स्वइच्छेने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवतात. आपली फसवणूक झाली, असे ज्या पालकांना आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना वाटत असल्यास त्यांनी गुन्हे दाखल करावे, अथवा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करावी. -अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प.