शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या नावाने तोतयाचा फोन, कोपर्डीच्या दोषींना येरवड्यात हलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:44 IST

कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा कारागृह अधीक्षकांना एका तोतयाने फोन करून मुख्यमंत्र्यांचा पीए बोलत असल्याचे सांगत कोपर्डीच्या दोषींना तत्काळ येरवडा कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला.

अहमदनगर : कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा कारागृह अधीक्षकांना एका तोतयाने फोन करून मुख्यमंत्र्यांचा पीए बोलत असल्याचे सांगत कोपर्डीच्या दोषींना तत्काळ येरवडा कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला. त्याबाबत शनिवारी जिल्हा कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात तोतया व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली.कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर २९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता जिल्हा कारागृह अधीक्षकांना एक फोन आला़ ‘मी मुख्यमंत्र्यांचा खासगी पीए बोलतोय’, असे सांगत तिन्ही आरोपींना फाशी झाली असून, त्यांना येरवडा कारागृहात पाठविण्याचे फर्मान सोडले. पुन्हा जरा वेळाने फोन करून ‘एसपी बोलतोय’ असे सांगत तोच निरोप दिला. रात्री आठ वाजता त्याच व्यक्तीने पुन्हा फोन करून ‘पोलीस महासंचालक बोलतोय’ असे सांगत येरवडा कारागृहात आरोपींना तातडीने वर्ग करा. तेथेच ते सुरक्षित राहतील असे सांगितले़ हा फोन तोतया व्यक्तीकडून येत असल्याचे कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आले़ शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.फोनचा उद्देश काय?कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा कारागृह प्रशासनाने २९ नोव्हेंबरला रात्री तिनही दोषींना येरवडा कारागृहात वर्ग केले़ सकाळी दोषींनी न्यायालयात आणतानाही मोठी खबरदारी घेतली होती़ कारागृहात मुख्यमंत्र्याचा पीए आणि अधिकाºयांचे नाव घेऊन फोन करून आरोपींना येरवड्यातच पाठवा असे सांगण्यात तोतयाचा काय उद्देश होता? याचा पुढील तपास पोलीस करत आहेत़

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस