शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

विडी कामगारांचा कैवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 15:09 IST

कॉम्रेड राम रत्नाकर आणि कम्युनिस्ट चळवळ यांचे नाते अतूट आहे. विडी कामगारांच्या उद्धारासाठी त्यांनी त्यांचे जीवन चळवळीच्या माध्यमातून पणाला लावले. शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाची त्यांनी आयुष्यभर वकिली केली. त्यांचे घर म्हणजे एक कार्यशाळाच होती. अहमदनगर जिल्हा साम्यवादी विचारांचा बालेकिल्ला बनविणाºया अनेक रत्नांमध्ये ‘राम रत्नाकर’ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल़

अहमदनगर : कम्युनिस्टांचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आता कमी होत असली तरी पूर्वी कधीकाळी हा संपूर्ण जिल्हा लाल रंगात रंगलेला होता. महाराष्टÑातील अनेक चळवळी अहमदनगरमधून सुरू झाल्या. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर लढे उभारले गेले. यापैकी अनेक लढ्याला यशही मिळाले. अहमदनगर शहरामध्ये पूर्वी विडी उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत होता. या उद्योगामध्ये पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होता. त्यांच्यामध्ये आज दिसत असलेली सामाजिक सुधारणा, भरभराट ही कॉम्रेड राम रत्नाकर यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच दिसत आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये़अ‍ॅड. कॉ. रामचंद्र कृष्णाजी रत्नाकर हे कोºहाळा (ता. कोपरगाव) येथील मूळ रहिवासी. सात भाऊ आणि दोन बहिणी असणाºया शेतकरी कुटुंबातील रत्नाकर हे वडिलांच्या निधनानंतर अहमदनगरला मामांकडे आले. अहमदनगर महाविद्यालयात पदवीपर्यंतचे  शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुणे येथील महाविद्यालयात एल. एल. बी.चे शिक्षण घेतले. त्यावेळी राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही ते जात होते. नगर शहरातील नामवंत डॉक्टर क्षीरसागर हे त्याकाळी साम्यवादी विचारांचे कार्यकर्ते होते. त्यांनी रत्नाकर यांना मार्क्स, लेनिन यांची पुस्तके वाचायला दिली. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि ते साम्यवादी विचारांकडे झुकले. संयुक्त महाराष्टÑ चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.  त्यानंतर १९६० मध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले.१९६१ मध्ये लाल बावटा कामगार युनियनची त्यांनी स्थापना केली. ते अहमदनगरचे अध्यक्ष बनले. १९६३ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्टÑातील असंघटित कामगारांचा संप झाला. महाराष्टÑ राज्य विडी, सिगारेट, तंबाखू वर्कर्स् फेडरेशनची धुरा त्यांनी स्वत:कडे घेतली. कामगारांच्या विविध प्रश्नात लक्ष घालून ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शहर, जिल्हा व राज्य कौन्सिलवर त्यांनी काम केले. कामगार विषयक आपल्या कार्यकर्तृत्वाने उभ्या महाराष्ट्राला ते परिचित झाले. अहमदनगर शहरात विडी कामगारांना राहण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा श्रमिकनगर वसाहतीची कॉ. सुरेश संत यांच्या सहकार्याने त्यांनी स्थापना केली. विडी कामगारांनी ४५० रुपये सभासद फी, १ हजार रुपये डेव्हलपमेंट फी व १४ हजार ५०० रुपये महाराष्टÑ हौसिंग फायनान्सचे कर्ज एवढ्या कमी रकमेत ६२० स्क्वेअर फूट जागेमध्ये २२० फूट बांधकाम केलेली घरे कामगारांना मिळाली. त्यासाठी रत्नाकर यांनी मोठे परिश्रम घेतले.अहमदनगर नगरपालिकेच्या नगरसेवकपदी ते दोनदा निवडून आले. शिक्षण मंडळाचे सभापती म्हणूनही त्यांनी काहीकाळ काम केले. विडी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शाळा व शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या.शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे वकील म्हणून ते शहरात उत्तम वकिली करीत होते. शहरातील त्यांचे घर म्हणजे सर्वपक्षीय  कार्यकर्त्यांची कार्यशाळाच होती. विविध पक्षाचे पुढारी घरी जाऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे. पक्षाची विविध अधिवेशने, मोठ्या नेत्यांच्या सभा त्यांनी आयोजित केल्या होत्या. मुळा चारी, निळवंडे धरण, जायकवाडी धरणग्रस्त लढ्यामध्ये ते सातत्याने सहभागी व्हायचे. अहमदनगर शहराची जीवनदायी ठरलेल्या मुळा धरणातून थेट पाणी पुरवठा योजना व्हावी यासाठी शहर बंदची हाक १९७२ मध्ये त्यांनीच दिली होती.विडी कामगारांना किमान वेतन मिळावे, फंड मिळावा, ग्रॅच्युईटी मिळावी, महिलांना बाळंतपणाची सुट्टी मिळावी यासाठीचे लढे उभारून त्यांनी विडी कामगारांना न्याय मिळवून दिला. कष्टकरी महिलांना पेन्शन मिळावी, ही त्यांची मागणी मान्य झालीच. शिवाय विडी कामगार महिला, विधवा महिला असल्यास तिच्या मुलीच्या विवाहासाठी सानुग्रह अनुदान त्यांनी सुरू करायला भाग पाडले. कोणत्याही प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हाक दिल्यास ते सर्वात पुढे असायचे. कोणी समोर असो नसो. त्यांचे भाषण सुरू होई आणि लोक जमत, हा अनुभव अनेकांनी घेतला. कामगारांना संघटित करून त्यांना त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून देणे, त्यांची सोडवणूक करण्यासाठी ते प्रयत्न करायचे. प्रश्नाची तड लावल्याशिवाय ते थांबत नसत.अहमदनगर जिल्ह्यात त्यांचे समवेत कॉ. पी. बी. कडू पाटील, कॉ. बाळासाहेब नागवडे, कॉ. नामदेव आव्हाड, कॉ. वकीलराव लंघे, कॉ. बाबासाहेब ठुबे, कॉ. बी. के. देशमुख हे त्यांचे पक्षातील सहकारी होते तर मित्र पक्षाचे कॉ. भास्करराव जाधव, कॉ. मधुकर कात्रे, बापूसाहेब भापकर, कॉ. एकनाथ भागवत, दिनकर नलावडे, राजाभाऊ कुलंगे, रामभाऊ निसळ, साथी राम दसरे, नानासाहेब नानल, अ‍ॅड. ना. ज. पाऊलबुद्धे, मल्लेश्याम येमूल, कॉ. चंद्रभान आठरे पाटील हे त्यांचे सहकारी होते. रत्नाकर यांनी पक्षाचा आदेश मानून दोन वेळा विधानसभा तर एक वेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती. पक्षाचे मोठे पुढारी कॉ. सी. राजेश्वरराव, कॉ. इंद्रजीत गुप्ता यांच्या सभांचे त्यांनी आयोजन केले होते. रत्नाकर हे कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी असले तरी सर्व पक्ष संघटनेतील मान्यवर त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी यायचे. 

लेखक - कॉ. शंकर न्यायपेल्ली (सहकार्य : अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर