शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

मढी, मायंबा यात्रेसाठी विकतचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 15:38 IST

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रा व आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथील मच्छिंद्रनाथ उत्सवावर यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे.

अनिल लगडअहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रा व आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथील मच्छिंद्रनाथ उत्सवावर यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. राज्यातून यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी दोन्ही देवस्थानांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.मढी येथील कानिफनाथांचा यात्रौत्सव होळीपासून सुरू होतो. यामुळे यात्रेला सुरूवात झाली आहे. लाखो भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. पैठणला नाथषष्ठीनिमित्त जाणाऱ्या असंख्य दिंड्या या मढी, मायंबा येथे मुक्कामी असतात. या दिंड्याची व्यवस्था देवस्थानांना करावी लागते. मढी गावाला देवस्थानने बांधलेल्या शेततळ्यातून व त्याखाली असलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. परंतु यंदा उद्भव आटल्याने शेततळे कोरडे पडले आहे. मढी देवस्थानसाठी २००० मध्ये जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा पाईलाईन केली आहे. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या योजनेतून कधीच पाणी आले नाही. त्यानंतर मढी गावासाठी वांबोरी चारीतून पाईपलाईन आणून पाणी पुरवठा योजना राबविली. परंतु तीही बंद पडली. या दोन्ही योजनांचा मढीला काहीच उपयोग झाला नाही. यंदा यात्रा उत्सव सुरू झाला असून भाविकांना पाणी पुरविण्यासाठी मढी देवस्थान ट्रस्टला मोठी कसरत करावी लागत आहे. हीच परिस्थिती सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टची आहे. हे उंच डोंगरावर असल्याने तेथील सर्व उद्भव कोरडे पडले आहेत. येथील यात्रा उत्सव पाडव्याच्या (६ एप्रिल) दिवशी असतो. येथे पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री प्रत्येक भाविकांना स्रान करुनच समाधी दर्शन घ्यावे लागते. तेथेही दरवर्षी शेकडो टँकरने देवस्थानला पाणी पुरवठा करावा लागतो.श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांचा यात्रौत्सवास तसेच मायंबा (सावरगाव,ता.आष्टी) राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भाविकांचे हाल पाहता दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी मदत केल्यास भाविकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, यात शंका नाही.यात्रेसाठी रोज पाच टँकरने पाणीपुरवठामढी यात्रेसाठी देवस्थानने गेल्या आठ दिवसात १५० ते २०० टँकरने पाणी पुरवठा केला आहे. जवळपास १५०० ते २२०० रुपयांना एक टँकर असे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या टँकरचे पाणी परिसरातील जवळपास ३५ ते ४० विहिरीत टाकले आहे. त्यातून गावाला व भाविकांना सध्या पाणी मिळत आहे. दूरवरुन आलेल्या भाविकांना मात्र विकतच्या पाण्याच्या बॉटलचा आधार घ्यावा लागत आहे. रोज टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर