शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

मढी, मायंबा यात्रेसाठी विकतचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 15:38 IST

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रा व आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथील मच्छिंद्रनाथ उत्सवावर यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे.

अनिल लगडअहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रा व आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथील मच्छिंद्रनाथ उत्सवावर यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. राज्यातून यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी दोन्ही देवस्थानांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.मढी येथील कानिफनाथांचा यात्रौत्सव होळीपासून सुरू होतो. यामुळे यात्रेला सुरूवात झाली आहे. लाखो भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. पैठणला नाथषष्ठीनिमित्त जाणाऱ्या असंख्य दिंड्या या मढी, मायंबा येथे मुक्कामी असतात. या दिंड्याची व्यवस्था देवस्थानांना करावी लागते. मढी गावाला देवस्थानने बांधलेल्या शेततळ्यातून व त्याखाली असलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. परंतु यंदा उद्भव आटल्याने शेततळे कोरडे पडले आहे. मढी देवस्थानसाठी २००० मध्ये जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा पाईलाईन केली आहे. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या योजनेतून कधीच पाणी आले नाही. त्यानंतर मढी गावासाठी वांबोरी चारीतून पाईपलाईन आणून पाणी पुरवठा योजना राबविली. परंतु तीही बंद पडली. या दोन्ही योजनांचा मढीला काहीच उपयोग झाला नाही. यंदा यात्रा उत्सव सुरू झाला असून भाविकांना पाणी पुरविण्यासाठी मढी देवस्थान ट्रस्टला मोठी कसरत करावी लागत आहे. हीच परिस्थिती सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टची आहे. हे उंच डोंगरावर असल्याने तेथील सर्व उद्भव कोरडे पडले आहेत. येथील यात्रा उत्सव पाडव्याच्या (६ एप्रिल) दिवशी असतो. येथे पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री प्रत्येक भाविकांना स्रान करुनच समाधी दर्शन घ्यावे लागते. तेथेही दरवर्षी शेकडो टँकरने देवस्थानला पाणी पुरवठा करावा लागतो.श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांचा यात्रौत्सवास तसेच मायंबा (सावरगाव,ता.आष्टी) राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भाविकांचे हाल पाहता दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी मदत केल्यास भाविकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, यात शंका नाही.यात्रेसाठी रोज पाच टँकरने पाणीपुरवठामढी यात्रेसाठी देवस्थानने गेल्या आठ दिवसात १५० ते २०० टँकरने पाणी पुरवठा केला आहे. जवळपास १५०० ते २२०० रुपयांना एक टँकर असे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या टँकरचे पाणी परिसरातील जवळपास ३५ ते ४० विहिरीत टाकले आहे. त्यातून गावाला व भाविकांना सध्या पाणी मिळत आहे. दूरवरुन आलेल्या भाविकांना मात्र विकतच्या पाण्याच्या बॉटलचा आधार घ्यावा लागत आहे. रोज टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर