शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

काश्मीरच्या पुष्प महोत्सवात जुळले बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 16:59 IST

व्हॅलेंटाईन-डे स्पेशल /बाळासाहेब काकडे मी आणि सुजाता वैद्यकीय पदवीच्या शेवटच्या वर्षाला होतो. आमची काश्मीरला सहल गेली होती. काश्मीरमध्येच बहरलेल्या ...

व्हॅलेंटाईन-डे स्पेशल /बाळासाहेब काकडेमी आणि सुजाता वैद्यकीय पदवीच्या शेवटच्या वर्षाला होतो. आमची काश्मीरला सहल गेली होती. काश्मीरमध्येच बहरलेल्या पुष्प महोत्सवात माझी व सुजाताची नजरा नजर झाली. अन् तेथेच आमचे बंध जुळले. त्यानंतर दोन्ही परिवाराची मान्यता घेऊन रितसर विवाह केला, असे श्रीगोंद्यातील डॉक्टर विजय भानुदास बगाडे यांनी सांगितले.डॉ. विजय भानुदास बगाडे व डॉ. सुजाता यादवराव ढोबळे यांनी २० फेब्रुवारी १९७६ रोजी आंतरजातीय विवाह केला. डॉ विजय बगाडे यांचा पारंपरिक कापड व्यवसाय आहे. त्यांना वैद्यकीय सेवेची आवड होती. त्यांना पुणे येथील एका मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. त्याच कॉलेजला मुंबईच्या सुजाता यांनीही प्रवेश घेतला होता. सुजाता या अतिशय हुशार होत्या. त्यांचा स्वभाव तापट होता, तर विजय हे अतिशय शांत, संयमी स्वभावाचे होते. पदवीचे शिक्षण अंतिम टप्प्यात असताना सर्वांना करिअरचे वेध लागले होते. दरम्यान, त्यांची रेल्वेने काश्मीरला सहल गेली होती. त्यावेळी विजय बगाडे यांच्याही मनात सुजाता यांच्याविषयी आपलुकी होती. त्यांच्याविषयी प्रेम होते. मात्र ते व्यक्त केलेले नव्हते. सुजाता यांनाही विजय यांचा स्वभाव भावलेला होता. मात्र दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलेले नव्हते. काश्मिरी पुष्प महोत्सवात दोघांनीही एकमेकांच्या भावना बोलून दाखविल्या व त्यांनी पुढील आयुष्यात सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. दोघांनीही हा निर्णय घरी सांगितला. आंतरजातीय विवाहाला घरच्यांकडून थोडासा विरोध झाला. मात्र त्यांनी समजून सांगिल्यानंतर त्यांचा पुण्यात रितसर विवाह झाला. त्यानंतर त्यांनी श्रीगोंद्यात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यानंतर सन १९७९ मध्ये पल्लवी या मुलीचा जन्म झाला. तीनेही वैद्यकीय व्यवसाय निवडला. ती एमडी झाली असून इंग्लंडमध्ये वैद्यकीय सेवा करीत आहे.डॉ. बगाडे म्हणाले, सध्या चित्रपट पाहून अल्पवयीन मुले प्रेमाच्या नावाखाली आयुष्य बरबाद करून घेत आहेत. मात्र अगोदर स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. आयुष्याचा जोडीदार निवडताना भावनेत वाहून जाण्याऐवजी विचार करायला हवा. घरच्यांच्या भावनांचाही विचार करावा आणि निवडलेल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट