शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

लोकसभेसाठी पक्ष बांधणी करणार

By admin | Updated: April 26, 2016 23:25 IST

अहमदनगर : दक्षिण नगर जिल्ह्याला महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसने संधी दिली आहे. आता कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी दक्षिण लोकसभा व जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.

अहमदनगर : दक्षिण नगर जिल्ह्याला महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसने संधी दिली आहे. आता कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी दक्षिण लोकसभा व जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. दक्षिण लोकसभा मतदार संघातून, सुशिक्षित उमेदवार काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देईल, असा विश्वास प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस नंदकमार झावरे यांनी केले. दुष्काळात कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन उपक्रम राबविले पाहिजेत, असे ते म्हणाले. नगर जिल्हा कॉँग्रेस समितीच्यावतीने कॉँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक व प्रदेश समितीवर निवड झाल्याबद्दल नंदकुमार झावरे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कार समारंभानंतर झावरे बोलत होते. झावरे म्हणाले, कॉँग्रेसचे सरकार असताना सरकारने दुष्काळात मागेल त्याला छावणी, शेतकऱ्यांना सुमारे शंभर कोटी रुपयांचा पीक विमा, नांगरणीसाठी अनुदान दिले. माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला पण कॉँग्रेस कार्यकर्ते सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचू शकले नाहीत. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. जनतेत युती सरकारविषयी नाराजी आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेत पोहचले पाहिजे. दक्षिण लोकसभा मतदार संघातून तरूण, सुशिक्षित, उमदेवार पक्षा विजय निश्चित करून देईल, असा विश्वास व्यक्त करून कॉँग्रेसला चांगले दिवस येतील, असा आशावाद झावरे यांनी व्यक्त केला. सत्तेत असूनही सेना आक्रमक आंदोलन करते. कॉँग्रेस विरोधात असूनही आंदोलने करत नसल्याची खंत दादा पाटील शेळके यांनी व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे म्हणाले, दक्षिण व उत्तर जिल्ह्यातही दुष्काळ आहे. कॉँग्रेसच्या पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दुष्काळ प्रश्नावर आंदोलने केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ प्रश्नावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णा शेलार, जिल्हा युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष हेमंत ओगले, विनायक देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष सविता मोरे, जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल झावरे, राजेंद्र नागवडे यांनी दुष्काळ प्रश्नावर कॉँग्रेसने आवाज उठविण्याची मागणी केली. अरुण होळकर, बांधकाम समितीचे सभापती बाबासाहेब दिघे, संपतराव म्हस्के, मारुती रेपाळे, पारनेर तालुकाध्यक्ष भास्कर शिरोळे, रामचंद्र मांडगे, एकनाथ पठारे, बापूराव होळकर, संदीप वराळ, बबन झावरे, महेश शिरोळे आदी उपस्थित होते.