शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
2
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
3
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
4
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
5
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
6
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
7
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
8
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
9
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
10
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
11
2026 Prediction: ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
13
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
14
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
15
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
16
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
17
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
18
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
19
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
20
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सब पैसेके भाई, अपना कोई नही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:55 IST

 श्रीमद् शंकराचार्यांनी या श्लोकात एक महत्वाची बाब स्पष्ट केली आहे ती म्हणजे, सब पैसेके भाई, अपना कोई नही । पैशाची जादू उभ्या जगावर चालते. पैसा नसेल तर कोणतेही कार्य करणे अवघड आहे. ‘अर्थस्य पुरुषो दास: दासस्त्वर्थो न कर्हिचित। इति सत्यं महाराज! बद्धोऽस्म्यर्थेन कौरवै:।’

( भज गोविंदम्-५)     

श्लोक:-५  : यावव्दित्तोपार्जनसक्तस्तावaन्निजपरिवारो रक्त: ।पश्चाध्दावति जर्जरदेहे वार्तां प्रुच्छति कोपि न गेहे ॥५ भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥

 श्रीमद् शंकराचार्यांनी या श्लोकात एक महत्वाची बाब स्पष्ट केली आहे ती म्हणजे, सब पैसेके भाई, अपना कोई नही । पैशाची जादू उभ्या जगावर चालते. पैसा नसेल तर कोणतेही कार्य करणे अवघड आहे. ‘अर्थस्य पुरुषो दास: दासस्त्वर्थो न कर्हिचित। इति सत्यं महाराज! बद्धोऽस्म्यर्थेन कौरवै:।’

महाभारतात भीष्माचार्य धर्मराजाला म्हणाले होते, सर्व जग अर्थाचे (पैसा) दास आहेत. अर्थ कोणाचा दास नाही. म्हणूनच मी नाईलाजाने का होईना कौरवांच्या बाजूने बांधला गेलो आहे. परमार्थातही धनावाचून काही होत नाही आणि आता तर एक वेगळेच फ्याड आले आहे. ते म्हणजे देवाच्या दरवाज्यावर सोन्याचा मुलामा, देवाचे सिंहासन सोन्याचे, मखर सोन्याचे, विशेष म्हणजे देवाचा मुकुट सोन्याचा आणि तोही १४-१५ किलो वजनाचा.  बरे हे सर्व एक वेळ ठीक आहे, असे समजू. परंतु त्या सोन्याच्या रक्षणासाठी पहारेकरी पाहिजेत. म्हणजे ज्या देवाला आपण ..रक्ष माम परमेश्वर ॥ म्हणायचे त्यालाच संरक्षण हवे. 

ख-या परमार्थाचिया चाडा । कोणी वेचिना कवडा । भुल कैसी पडली मुढा । रोकडा परमार्थ विसरले ॥(लघुवाक्यव्रुत्ती-)

भारतीय संस्कृतीमध्ये  धन हा  दुसरा पुरुषार्थ (धर्म-अर्थ-काम-मोक्ष) म्हटले आहे. पैसा मिळवू नये असे नाही. मिळवावा पण तो योग्य मार्गाने मिळवला पाहिजे. श्री तुकाराम महाराज म्हणतात,

‘वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी॥’  

सरळ मार्गाने पैसा कमवावा व योग्य विनीयोग करावा. अवास्तव चैन, हौस भागविण्यासाठी धन आवशक वाटते आणि ते मिळविण्यासाठि वेगवेगळे मार्ग अवलंबिले जातात. बरे हे सर्व कोणासाठी? तर हे सर्व माझ्या कुटुंबासाठी.  ज्यांना मी माझे म्हणतो. त्या माझ्या सगे, सोयºयांसाठी करायचे.

जववरि बरवा चाले धंदा । तववरि बहिण म्हणे दादा॥ 

पैसे असले तरच बहिण सुध्दा मान देते. गरीब भावाकडे जाणार नाही. मायबापे पिंड पाळियेला मायाजन्म मरण ज्या संत संग.. मायेच्या पोटी, लोभाचे पोटी सर्व नातेवाईक जवळ येत असतात. सोयरे, धायरे, दिल्या घेतल्याचे । अंतकाळिचे नाही कोणी ॥तु.म.

जोवरी पैसा तोवरी बैसा ही म्हण खरी आहे. श्रीमंत मनुष्य आला तर त्या ठिकाणी कितीही मोठा विद्वान उपस्थित  असला तरी त्याला मान न मिळता तो श्रीमंत माणसाला मिळतो. व विद्वानाची उपेक्षा होते. 

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा । वेश्यांना मणीहार । उध्दवा अजब तुझे सरकार....  

धनवंताघरि धनचि काम करि॥ तु.म. 

श्रीमंताचे घरी पैसाच काम करीत असतो. पैशामध्ये अशा वेगवेळ्या प्रकारच्या शक्ती आहेत. म्हणून पैशाची ताकद ओळखून माणसाने योग्य नियोजन केले तर हाच पैसा त्याला तारणारा ठरणार आहे. त्यातून त्याला चांगले काही करता पण येणार आहे. म्हणूनच श्रीमद् शंकराचार्य म्हणतात..  हे मानवा! जोवर तुझ्यामध्ये धन कमावण्याची शक्ती आहे. तोपर्यंतच तुझ्या घरातील तुझे आप्त तुझ्यावर फार प्रेम करतात. तुझी विचारपूस करतात. पण ! त्यानंतर तुला म्हातारपण आल्यानंतर देह जर्जर झाला.  काम करण्याची शक्ती संपली की घरात तुझा कोणालाही उपयोग नसतो. मग तुझी कोणीही विचारपूस करीत नाहीत. त्यांना तू नको असतो.  तुझा पैसा हवा असतो. 

श्री तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रिये मावळली म्हणती आला बागुल आजा। म्हातारा मनुष्य म्हणजे घरातील नातवांचे खेळणे होऊन बसते. तारुण्यात शक्ती असते. त्यामुळे माणूस म्हणतो की,  लाथ मारीन तिथे पाणी काढीन पण! एकदा का आयुष्य उतरणीला लागले की शरीर थकते. त्यामध्ये रोग प्रवेश करतात. बुध्दि सुध्दा कमजोर होते. विसराळूपणा वाढतो. प्रकृती चांगली रहात नाही. वारंवार वैद्याकडे जावे लागते. शेवटी त्याचाही कंटाळा येतो. आणि औषधेही नको म्हणतो.  अशावेळी त्याची शारिरिक व मानसिक स्थिती ढासळते. मग घरातील लोकांना त्याचा उद्वेग येतो.  त्याला दडपण येते. भितीने ग्रासला जातो. खरे तर अशावेळी त्याला मदतीची, समजून घेण्याची गरज असते. पण! होते सारे उलटेच. त्याला तर कोणी समजून  घेत तर नाहीतच.  पण तो सुध्दा समजून वागत नाही. हे एवढे घडुनही त्याला गोविंदाचे भजन करण्याची बुध्दी होत नाही हे त्याचे दुर्दैव आहे.

जो परिवार त्याला पैसे असतांना प्रेमाने विचारत होता,  तोच परिवार आता त्याला धनाच्या अभावामुळे, शरिराच्या शक्तिहिनतेमुळे त्याच्याशी बोलतही नाहीत. त्यामुळे वार्धक्य न टळणारी गोष्ट आहे.  हे जर आपल्याला माहित असेल तर त्याची तजवीज अगोदरच का करु नये? बालपणापासुनच परमार्थाची सवय लावून घेतली पाहिजे. म्हणजे मग जरी प्रतिकूल परिस्थिती आली तरी आपला तोल जाणार नाही. सुखदु:खे समे क्रृत्वा लाभा लाभो जया जयौ ॥ हे गीतेचे तत्वज्ञान  समजून घेतले की मग कोणत्याही परिस्थितीत आनंद भंग होत नाही आणि शेवटी फक्त गोविंद नामानेच संधान वाटणार आहे. 

भज गोविंदम्.. भज गोविंदम्...

                                                               -भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले,गुरुकुल भागवताश्रम चिचोंडी पाटील, ता.नगर. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक