शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सब पैसेके भाई, अपना कोई नही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:55 IST

 श्रीमद् शंकराचार्यांनी या श्लोकात एक महत्वाची बाब स्पष्ट केली आहे ती म्हणजे, सब पैसेके भाई, अपना कोई नही । पैशाची जादू उभ्या जगावर चालते. पैसा नसेल तर कोणतेही कार्य करणे अवघड आहे. ‘अर्थस्य पुरुषो दास: दासस्त्वर्थो न कर्हिचित। इति सत्यं महाराज! बद्धोऽस्म्यर्थेन कौरवै:।’

( भज गोविंदम्-५)     

श्लोक:-५  : यावव्दित्तोपार्जनसक्तस्तावaन्निजपरिवारो रक्त: ।पश्चाध्दावति जर्जरदेहे वार्तां प्रुच्छति कोपि न गेहे ॥५ भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥

 श्रीमद् शंकराचार्यांनी या श्लोकात एक महत्वाची बाब स्पष्ट केली आहे ती म्हणजे, सब पैसेके भाई, अपना कोई नही । पैशाची जादू उभ्या जगावर चालते. पैसा नसेल तर कोणतेही कार्य करणे अवघड आहे. ‘अर्थस्य पुरुषो दास: दासस्त्वर्थो न कर्हिचित। इति सत्यं महाराज! बद्धोऽस्म्यर्थेन कौरवै:।’

महाभारतात भीष्माचार्य धर्मराजाला म्हणाले होते, सर्व जग अर्थाचे (पैसा) दास आहेत. अर्थ कोणाचा दास नाही. म्हणूनच मी नाईलाजाने का होईना कौरवांच्या बाजूने बांधला गेलो आहे. परमार्थातही धनावाचून काही होत नाही आणि आता तर एक वेगळेच फ्याड आले आहे. ते म्हणजे देवाच्या दरवाज्यावर सोन्याचा मुलामा, देवाचे सिंहासन सोन्याचे, मखर सोन्याचे, विशेष म्हणजे देवाचा मुकुट सोन्याचा आणि तोही १४-१५ किलो वजनाचा.  बरे हे सर्व एक वेळ ठीक आहे, असे समजू. परंतु त्या सोन्याच्या रक्षणासाठी पहारेकरी पाहिजेत. म्हणजे ज्या देवाला आपण ..रक्ष माम परमेश्वर ॥ म्हणायचे त्यालाच संरक्षण हवे. 

ख-या परमार्थाचिया चाडा । कोणी वेचिना कवडा । भुल कैसी पडली मुढा । रोकडा परमार्थ विसरले ॥(लघुवाक्यव्रुत्ती-)

भारतीय संस्कृतीमध्ये  धन हा  दुसरा पुरुषार्थ (धर्म-अर्थ-काम-मोक्ष) म्हटले आहे. पैसा मिळवू नये असे नाही. मिळवावा पण तो योग्य मार्गाने मिळवला पाहिजे. श्री तुकाराम महाराज म्हणतात,

‘वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी॥’  

सरळ मार्गाने पैसा कमवावा व योग्य विनीयोग करावा. अवास्तव चैन, हौस भागविण्यासाठी धन आवशक वाटते आणि ते मिळविण्यासाठि वेगवेगळे मार्ग अवलंबिले जातात. बरे हे सर्व कोणासाठी? तर हे सर्व माझ्या कुटुंबासाठी.  ज्यांना मी माझे म्हणतो. त्या माझ्या सगे, सोयºयांसाठी करायचे.

जववरि बरवा चाले धंदा । तववरि बहिण म्हणे दादा॥ 

पैसे असले तरच बहिण सुध्दा मान देते. गरीब भावाकडे जाणार नाही. मायबापे पिंड पाळियेला मायाजन्म मरण ज्या संत संग.. मायेच्या पोटी, लोभाचे पोटी सर्व नातेवाईक जवळ येत असतात. सोयरे, धायरे, दिल्या घेतल्याचे । अंतकाळिचे नाही कोणी ॥तु.म.

जोवरी पैसा तोवरी बैसा ही म्हण खरी आहे. श्रीमंत मनुष्य आला तर त्या ठिकाणी कितीही मोठा विद्वान उपस्थित  असला तरी त्याला मान न मिळता तो श्रीमंत माणसाला मिळतो. व विद्वानाची उपेक्षा होते. 

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा । वेश्यांना मणीहार । उध्दवा अजब तुझे सरकार....  

धनवंताघरि धनचि काम करि॥ तु.म. 

श्रीमंताचे घरी पैसाच काम करीत असतो. पैशामध्ये अशा वेगवेळ्या प्रकारच्या शक्ती आहेत. म्हणून पैशाची ताकद ओळखून माणसाने योग्य नियोजन केले तर हाच पैसा त्याला तारणारा ठरणार आहे. त्यातून त्याला चांगले काही करता पण येणार आहे. म्हणूनच श्रीमद् शंकराचार्य म्हणतात..  हे मानवा! जोवर तुझ्यामध्ये धन कमावण्याची शक्ती आहे. तोपर्यंतच तुझ्या घरातील तुझे आप्त तुझ्यावर फार प्रेम करतात. तुझी विचारपूस करतात. पण ! त्यानंतर तुला म्हातारपण आल्यानंतर देह जर्जर झाला.  काम करण्याची शक्ती संपली की घरात तुझा कोणालाही उपयोग नसतो. मग तुझी कोणीही विचारपूस करीत नाहीत. त्यांना तू नको असतो.  तुझा पैसा हवा असतो. 

श्री तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रिये मावळली म्हणती आला बागुल आजा। म्हातारा मनुष्य म्हणजे घरातील नातवांचे खेळणे होऊन बसते. तारुण्यात शक्ती असते. त्यामुळे माणूस म्हणतो की,  लाथ मारीन तिथे पाणी काढीन पण! एकदा का आयुष्य उतरणीला लागले की शरीर थकते. त्यामध्ये रोग प्रवेश करतात. बुध्दि सुध्दा कमजोर होते. विसराळूपणा वाढतो. प्रकृती चांगली रहात नाही. वारंवार वैद्याकडे जावे लागते. शेवटी त्याचाही कंटाळा येतो. आणि औषधेही नको म्हणतो.  अशावेळी त्याची शारिरिक व मानसिक स्थिती ढासळते. मग घरातील लोकांना त्याचा उद्वेग येतो.  त्याला दडपण येते. भितीने ग्रासला जातो. खरे तर अशावेळी त्याला मदतीची, समजून घेण्याची गरज असते. पण! होते सारे उलटेच. त्याला तर कोणी समजून  घेत तर नाहीतच.  पण तो सुध्दा समजून वागत नाही. हे एवढे घडुनही त्याला गोविंदाचे भजन करण्याची बुध्दी होत नाही हे त्याचे दुर्दैव आहे.

जो परिवार त्याला पैसे असतांना प्रेमाने विचारत होता,  तोच परिवार आता त्याला धनाच्या अभावामुळे, शरिराच्या शक्तिहिनतेमुळे त्याच्याशी बोलतही नाहीत. त्यामुळे वार्धक्य न टळणारी गोष्ट आहे.  हे जर आपल्याला माहित असेल तर त्याची तजवीज अगोदरच का करु नये? बालपणापासुनच परमार्थाची सवय लावून घेतली पाहिजे. म्हणजे मग जरी प्रतिकूल परिस्थिती आली तरी आपला तोल जाणार नाही. सुखदु:खे समे क्रृत्वा लाभा लाभो जया जयौ ॥ हे गीतेचे तत्वज्ञान  समजून घेतले की मग कोणत्याही परिस्थितीत आनंद भंग होत नाही आणि शेवटी फक्त गोविंद नामानेच संधान वाटणार आहे. 

भज गोविंदम्.. भज गोविंदम्...

                                                               -भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले,गुरुकुल भागवताश्रम चिचोंडी पाटील, ता.नगर. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक