शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

वाहन चालविताना नियम तोडला; दंड कधी भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST

अहमदनगर : महामार्ग पोलिसांनी मागील सहा महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८९ हजार ३२९ वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल ४ ...

अहमदनगर : महामार्ग पोलिसांनी मागील सहा महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८९ हजार ३२९ वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल ४ कोटी ८३ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यातील अवघ्या ७ हजार ३६२ जणांनी ४० लाख ७१ हजार १०० जणांनी दंड भरला आहे. ८१ हजार ९६७ जणांकडे ४ कोटी ४३ लाख ८४ हजार रुपये बाकी आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना २०२० पासून स्पिडगणच्या माध्यमातून ऑनलाइन दंड केला जातो. विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, ओव्हर स्पीड, मोबाइलवर बोलणे, नो पार्किंग, ट्रिपल सीट, विनालायसन्स आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारला जातो. ऑनलाइन दंड झाल्यानंतर वाहनचालकांच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज येतो. हा दंड ऑनलाइन तसेच महामार्ग पोलिसांच्या कार्यालयात जाऊन भरण्याची सुविधा आहे. ९० टक्के वाहनचालक मात्र दंड न भरता त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

-----------------

सर्वाधिक दंड सुसाट वाहनांना

मागील सहा महिन्यांत महामार्ग पोलिसांनी वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ३३ हजार २०० वाहनचालकांना २ कोटी ९८ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे. स्पीडगणच्या माध्यमातून ऑनलाइन दंड करण्यात आला आहे. महामार्गावर अनेक वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करताना आढळून येतात. यातून अपघाताचे प्रमाण वाढते.

-----------------------

दंड न भरल्यास वाहन हस्तांतरित होणार नाही

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झालेला दंड वेळेत भरला नाही तर ते वाहन कुणालाही हस्तांतरित करता येत नाही. आरटीओ विभागातून त्या वाहनासंदर्भातील कुठलीही प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. त्यामुळे झालेला दंड हा भरावाच लागतो.

----------------------

वेगमर्यादेचे उल्लंघन -३०२०९ वाहनचालकांकडे २,९५,९७,५०० दंड बाकी

इतर नियमांचे उल्लंघन- ५१७५८ वाहनचालकांकडे १,४७,१०,९०० दंड बाकी

------------------------

महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महामार्ग पोलिसांमार्फत सातत्याने कारवाई केल्या जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून महामार्गावर १ मार्च २०२१ पासून मृत्युंजय दूत ही योजना राबविली जात आहे. नगर जिल्ह्यात पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपअधीक्षक प्रीतम यावलकर, निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत्युंजय दूत योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दंडात्मक कावाईसह प्रबोधनात्मक उपक्रमही राबविले जात आहेत.

- शशिकांत गिरी, सहाय्यक पाेलीस निरिक्षक, महामार्ग पोलीस