शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

ब्रिटिशकालीन रस्त्याची होणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:22 IST

इंग्रजांनी रतनगड-कात्राबाईची खिंड-कुमशेत-पाचनई हरिश्चंद्रगड अशा प्रवासासाठी रतनगड रस्ता तयार केला होता. ही वाट दुर्लक्षित झाली. अनेक ठिकाणी या वाटेची ...

इंग्रजांनी रतनगड-कात्राबाईची खिंड-कुमशेत-पाचनई हरिश्चंद्रगड अशा प्रवासासाठी रतनगड रस्ता तयार केला होता. ही वाट दुर्लक्षित झाली. अनेक ठिकाणी या वाटेची दुरवस्था झाली. सध्या क्वचितच या वाटेने ट्रेकर्स, पर्यटक जात असतात. या पाऊल वाटेने जाताना रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर दिसते. भंडारदरा धरणाचा जलाशय, लांबवर असलेला अलंग, मदन, कुलंग हे गड आणि कळसुबाई शिखरही दृष्टिक्षेपात येते. पुढे करवतीच्या पात्याप्रमाणे असणारी कात्राबाईची खिंड याच रस्त्यावर आहे. येथून घनचक्करचा डोंगर दिसतो. या खिंडीतून ही पाऊलवाट कुमशेत गावात उतरते, तशीच पुढे पाचनईपर्यंत जाते.

मात्र या पाऊल वाटेची दुरुस्ती झाल्यास परिसरात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांचा आणि ट्रेकर्सचा ओघ वाढेल आणि पर्यटनास चालना मिळेल. हा हेतू ठेवत हरिश्चंद्रगड वन्यजीव विभागाने ही वाट दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने आपल्या वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्यामुळे या पाऊल वाटेच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

................

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर म्हणजे निसर्ग सौंदर्याचा खजिना आहे. भंडारदरा, कळसुबाई परिसरातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तेथे गर्दी करत असतात. रतनगडावर येणाऱ्या पर्यटकांना तसेच ट्रेकर्सला याच गडावरून पुढे हरिश्चंद्रगडाकडे जाण्यासाठी इंग्रजकालीन पायवाट आहे. या वाटेवर अद्यापही ब्रिटिशांनी रोवलेले मैलाचे चिरे कायम आहेत. ही पायवाट दुरुस्त केल्यास पर्यटकांना सोयीचे होईल आणि कुमशेत परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येईल. या दृष्टीने या पाऊल वाटेची दुरुस्ती केल्यास या परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पहिल्या टप्प्यात या रस्त्यावरील दहा किलोमीटर लांबीच्या दुरुस्तीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून दिवाळीनंतर हे काम सुरू होईल.

- डी. डी. पडवळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हरिश्चंद्रगड राजूर