शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:03 IST

पुणे जिल्ह्यातील भामा -आसखेड धरणातून सोडलेले पाणी न पोहचल्याने जलालपूर (ता. कर्जत) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सिध्दटेक : पुणे जिल्ह्यातील भामा -आसखेड धरणातून सोडलेले पाणी न पोहचल्याने जलालपूर (ता. कर्जत) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रांताधिकारी,तहसीलदारांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदने पाठविली आहेत.अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेला वरदान ठरलेले भीमा नदीवरील उजनी जलाशय यावर्षी १०९ टक्के भरले होते. मात्र पाणी वाटपाच्या नियोजनाअभावी जलालपूर येथील नदी पात्र कोरडे पडून पिके करपू लागली आहेत.सिद्धटेक, बेर्डी, दुधोडी येथील पाणी पाच सहा दिवस तर भांबोरा, गणेशवाडी, खेड येथील पाणी पंधरा ते वीस दिवस पुरेल एवढेच आहे. ग्रामस्थांनी २५ आॅगस्टला पाणी सोडण्यासाठी ग्रामसभेचा ठराव देऊन पालकमंत्र्यांसह प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र त्यांनी टाळाटाळ केल्याने त्यांच्याबद्दल ग्रामस्थांमध्ये रोष आहे.उजनी जलाशयात आमच्या जमिनी गेल्या, आणि पाणी दुसरे पळवितात. पुणे जिल्ह्यातील धरणांमधून पाणी आणण्यासाठी लोकप्रतिनिधी काहीच प्रयत्न करीत नाहीत. त्यांना भीमा पट्ट्याचे वाळवंट करायचे आहे काय? -रामदास बिबे, ग्रामस्थ, जलालपूर.याबाबत मी संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून ग्रामस्थांबरोबर बैठक घेणार आहे. -राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अहमदनगर.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019