शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शौचालय योजनेत बोगस लाभार्थी

By admin | Updated: June 30, 2016 01:21 IST

श्रीरामपूर : राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानांर्तगत नगरपालिकेने निधी दिला. परंतु अनेक लाभार्थ्यांनी जुनेच शौचालये दाखवून हा निधी लाटला.

श्रीरामपूर : राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानांर्तगत नगरपालिकेने निधी दिला. परंतु अनेक लाभार्थ्यांनी जुनेच शौचालये दाखवून हा निधी लाटला. यावर पालिकेने काय कार्यवाही केली, असा जाब विरोधी नगरसेविका भारती कांबळे यांनी पालिका सर्वसाधारण सभेत विचारला. नगरसेवकांनी गैरव्यवहार झालेल्या अनुदानाबाबत माहिती दिली असती, तर कारवाई केली असती, असा खुलासा नंतर मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी केला. नगरपालिकेची सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी व्यासपीठावर होते. मुख्याधिकारी मोरे सभागृहास माहिती देताना म्हणाले, स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधकाम योजनेत ३ हजार १६ नागरिकांनी अर्ज दाखल केले. त्यात मंजूर झालेल्या १ हजार ८८१ अर्जापैकी १ हजार ८२० नागरिकांना प्रथम टप्यातील अनुदान देण्यात आले. अनुदान रकमेचा गैरवापर करणाऱ्यावर नगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी अंजुम शेख यांनी केली. त्यावर नगरपालिकेची कार्यवाही सुरु आहे. ज्यांनी गैरवापर केला त्यांना फौजदारी गुन्ह्याची नोटीसा देऊन कारवाई करण्यात येईल, असे मोरे यांनी सांगितले. तसेच उघड्यावर शौचालय बसणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक नेमण्यात येईल, असे नमूद केले.अंजुम शेख व नगरसेवक श्याम आडागळे यांनी १२ हजारात शौचालयाचे काम होत नाही. त्याला आणखी ३ हजार जादा अनुदान द्यावे, अशी मागणी करत शेख यांनी आपण प्रभागात लोकांना वैयक्तिक ३ हजार रुपये दिल्याचे सांगितले. सभेत नगरसेवक संजय छल्लारे यांनी सभागृहाचे लक्ष वेगळ्या विषयाकडे वळविले. विरोधी नगरसेविकेच्या प्रश्नास बगल देत ते म्हणाले, आरोप तर होतच राहतात. परंतु सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर चर्चा का होत नाही. नगरपालिकेने जल पुनर्भरण कार्यक्रम हाती घेतला आहे. शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये व नगरपालिकेच्या अन्य मालमत्तांमध्ये ही योजना राबवावी, नगरपालिकेने पत्र देऊन बैठकीच्या माध्यमातून जागृती करावी, अशी सूचना त्यांनी केली. पक्षप्रतोद संजय फंड यांनी त्यास अनुमोदन दिले.शहरातून वाळूची अवैध वाहतूक होत आहे. त्यामुळे अपघात, तसेच रस्ते खराब होतात. त्यासाठी या वाहतुकीला पर्यायी मार्ग सूचवा, अशी सूचना संजय फंड यांनी केली. विरोधी नगरसेविका भारती कांबळे व मंजुश्री मुरकुटे यांनी मुख्याधिकारी पत्रकारांना एक व सभागृहात एक माहिती देतात, असा आरोप केला. त्याबद्दल मुरकुटे नगराध्यक्षांच्या परवानगीने बोलण्यास उभ्या राहिल्या असता त्यांना अन्य नगरसेवकांनी बोलू न दिल्याने त्या संतप्त झाल्या. उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी विरोधकांना शांत करत विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा करण्याचे सांगितले. नगराध्यक्षा ससाणे यांनी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. (वार्ताहर) कल्याण मंडप विद्युतीकरणाचा विषय सभागृहात गाजला. मुख्याधिकारी मोरे म्हणाले, आतील कामाचा ठेका दिला असून बाहेरील कामाची निविदा तांत्रिक कारणाने निघाली नाही. त्यामुळे पालिकेच्या निधीतून ३४ हजार ३६७ रुपयांचे गॅलरी व बाहेरील काम केले. निवडणुकीपूर्वी कल्याण मंडपाचे उद्घाटन करावे, अशी सूचना अंजुम शेख यांनी केली. ---------------------------------------------------मुरकुटे संतप्त सभा संपल्यानंतर नगरसेविका मंजुश्री मुरकुटे व मुख्याधिकारी मोरे यांच्यात वाद झाले. विरोधकांनी अभ्यास करून बोलावे, असा उल्लेख करून आपणास सभेत बोलू दिले नाही असा आरोप मुरकुटे यांनी केला.