शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

ग्रामीण अर्थव्यवस्थेला ७७१ कोटींचा बूस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:21 IST

अण्णा नवथर अहमदनगर : कोरोनाच्या महामारीमुळे अनेक मोठे व्यवसाय बंद पडलेले आहेत. बळीराजा मात्र कंबर कसून कामाला लागला असून, ...

अण्णा नवथर

अहमदनगर : कोरोनाच्या महामारीमुळे अनेक मोठे व्यवसाय बंद पडलेले आहेत. बळीराजा मात्र कंबर कसून कामाला लागला असून, शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना ७७१ कोटींचे कर्ज वाटप झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हे कर्ज एकप्रकारे बूस्टर डोस ठरला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वच क्षेत्रांची वाताहत झाली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व्यवसाय पूर्ववत होत असतानाच पुन्हा दुसरी लाट येऊन धडकली. ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळून येत आहेत. असे असले तरी बळीराजाने हिंमत न हारता खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यात यंदा मान्सून वेळेवर बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. सरकारच्या कर्जमाफीमुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले असून, त्यांच्याकडून नव्याने कर्जांची मागणी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून ७७१ कोटींचे कर्ज घेतले असून, या कर्जातून खरीपाचे पीक उभे करण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीची नांगरणी कोळपणी सध्या सुरू असून, यंदा कोणते पीक घ्यायचे याची चर्चा सध्या ग्रामीण भागात सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कृषी सेवा केंद्रासह खताची दुकानेही बंद आहेत. मशागतीसाठी इंधन मिळत नाही. कोरोनाच्या भीतीने मजूरही कामावर येत नाही, अशा कठीण परिस्थितीतही बँकांकडून कर्ज घेऊन बळीराजा मशागतीच्या कामाला लागला आहे. कोरोनामुळे कुणाच्याच संपर्कात जायला नको, आपल्या शेतात काम केलेले बरं, असे म्हणत शेतकरी रात्रंदिवस शेतात राबताना दिसत आहेत.

.....

बँकांकडून कर्जासाठी ऑनलाईन सुविधा

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत आहे. वाड्या-वस्त्यांवर कोरोना पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी बँक गर्दी करू नये. बँकेतून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे आहे, अशा शेतकऱ्यांनी अहमदनगर एनआयसी डॉट कॉम, या पोर्टलवरील अर्ज भरून मागणी नोंदवावी. ही नोंदणी केल्यानंतर बँकेतून फोन येईल. त्यानंतर कर्जाबाबतची कार्यवाही केली जाणार असून, शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संदीप वालवलकर यांनी सांगितले.

....