शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

ग्रामीण अर्थव्यवस्थेला ७७१ कोटींचा बूस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:21 IST

अण्णा नवथर अहमदनगर : कोरोनाच्या महामारीमुळे अनेक मोठे व्यवसाय बंद पडलेले आहेत. बळीराजा मात्र कंबर कसून कामाला लागला असून, ...

अण्णा नवथर

अहमदनगर : कोरोनाच्या महामारीमुळे अनेक मोठे व्यवसाय बंद पडलेले आहेत. बळीराजा मात्र कंबर कसून कामाला लागला असून, शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना ७७१ कोटींचे कर्ज वाटप झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हे कर्ज एकप्रकारे बूस्टर डोस ठरला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वच क्षेत्रांची वाताहत झाली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व्यवसाय पूर्ववत होत असतानाच पुन्हा दुसरी लाट येऊन धडकली. ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळून येत आहेत. असे असले तरी बळीराजाने हिंमत न हारता खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यात यंदा मान्सून वेळेवर बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. सरकारच्या कर्जमाफीमुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले असून, त्यांच्याकडून नव्याने कर्जांची मागणी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून ७७१ कोटींचे कर्ज घेतले असून, या कर्जातून खरीपाचे पीक उभे करण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीची नांगरणी कोळपणी सध्या सुरू असून, यंदा कोणते पीक घ्यायचे याची चर्चा सध्या ग्रामीण भागात सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कृषी सेवा केंद्रासह खताची दुकानेही बंद आहेत. मशागतीसाठी इंधन मिळत नाही. कोरोनाच्या भीतीने मजूरही कामावर येत नाही, अशा कठीण परिस्थितीतही बँकांकडून कर्ज घेऊन बळीराजा मशागतीच्या कामाला लागला आहे. कोरोनामुळे कुणाच्याच संपर्कात जायला नको, आपल्या शेतात काम केलेले बरं, असे म्हणत शेतकरी रात्रंदिवस शेतात राबताना दिसत आहेत.

.....

बँकांकडून कर्जासाठी ऑनलाईन सुविधा

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत आहे. वाड्या-वस्त्यांवर कोरोना पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी बँक गर्दी करू नये. बँकेतून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे आहे, अशा शेतकऱ्यांनी अहमदनगर एनआयसी डॉट कॉम, या पोर्टलवरील अर्ज भरून मागणी नोंदवावी. ही नोंदणी केल्यानंतर बँकेतून फोन येईल. त्यानंतर कर्जाबाबतची कार्यवाही केली जाणार असून, शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संदीप वालवलकर यांनी सांगितले.

....