शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

ग्रामीण अर्थव्यवस्थेला ७७१ कोटींचा बूस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:21 IST

अण्णा नवथर अहमदनगर : कोरोनाच्या महामारीमुळे अनेक मोठे व्यवसाय बंद पडलेले आहेत. बळीराजा मात्र कंबर कसून कामाला लागला असून, ...

अण्णा नवथर

अहमदनगर : कोरोनाच्या महामारीमुळे अनेक मोठे व्यवसाय बंद पडलेले आहेत. बळीराजा मात्र कंबर कसून कामाला लागला असून, शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना ७७१ कोटींचे कर्ज वाटप झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हे कर्ज एकप्रकारे बूस्टर डोस ठरला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वच क्षेत्रांची वाताहत झाली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व्यवसाय पूर्ववत होत असतानाच पुन्हा दुसरी लाट येऊन धडकली. ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळून येत आहेत. असे असले तरी बळीराजाने हिंमत न हारता खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यात यंदा मान्सून वेळेवर बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. सरकारच्या कर्जमाफीमुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले असून, त्यांच्याकडून नव्याने कर्जांची मागणी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून ७७१ कोटींचे कर्ज घेतले असून, या कर्जातून खरीपाचे पीक उभे करण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीची नांगरणी कोळपणी सध्या सुरू असून, यंदा कोणते पीक घ्यायचे याची चर्चा सध्या ग्रामीण भागात सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कृषी सेवा केंद्रासह खताची दुकानेही बंद आहेत. मशागतीसाठी इंधन मिळत नाही. कोरोनाच्या भीतीने मजूरही कामावर येत नाही, अशा कठीण परिस्थितीतही बँकांकडून कर्ज घेऊन बळीराजा मशागतीच्या कामाला लागला आहे. कोरोनामुळे कुणाच्याच संपर्कात जायला नको, आपल्या शेतात काम केलेले बरं, असे म्हणत शेतकरी रात्रंदिवस शेतात राबताना दिसत आहेत.

.....

बँकांकडून कर्जासाठी ऑनलाईन सुविधा

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत आहे. वाड्या-वस्त्यांवर कोरोना पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी बँक गर्दी करू नये. बँकेतून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे आहे, अशा शेतकऱ्यांनी अहमदनगर एनआयसी डॉट कॉम, या पोर्टलवरील अर्ज भरून मागणी नोंदवावी. ही नोंदणी केल्यानंतर बँकेतून फोन येईल. त्यानंतर कर्जाबाबतची कार्यवाही केली जाणार असून, शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संदीप वालवलकर यांनी सांगितले.

....