शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशव्यापी बंदमध्ये मंडळाधिकारीही झाले सहभागी

By | Updated: December 9, 2020 04:16 IST

अहमदनगर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये कार्यालय बंद ठेवून मंडळाधिकारीही सहभागी झाल्याचे उघड झाले असून, या ...

अहमदनगर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये कार्यालय बंद ठेवून मंडळाधिकारीही सहभागी झाल्याचे उघड झाले असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप शहर मध्य मंडळाध्यक्ष अजय चितळे यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी मंगळवारी बंदची हाक दिली होती. देश बंद असल्याने नगर शहरातील नालेगाव येथील मंडळाधिकारी कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची बाब भाजपचे अजय चितळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. चितळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजना, तसेच अन्य विशेष साहाय्य योजनांसाठी शासनाने उत्पन्नाच्या दाखल्याची सक्ती केली आहे. हे दाखले मिळविण्यासाठी लाभार्थी नालेगाव मंडळाधिकारी कार्यालयात गर्दी करतात. मात्र, नालेगावचे मंडळाधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात. यावर कळस असा की, भारत बंदच्या नावाखाली मंडळाधिकारी कार्यालय बंद ठेवण्यात आले असून, यामुळे १०० ते १५० लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागल्याचे चितळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

....

सूचना फोटो ०८ नालेगाव नावाने आहे.

फोटो ओळी

भारत बंदच्या नावाखाली नालेगाव मंडळाधिकारी कार्यालय बंद ठेवल्याच्या निषेधार्थ निदर्शने करताना भाजप शहर मध्य मंडळाध्यक्ष अजय चितळे व विशेष साहाय्य योजनांचे लाभार्थी.