शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

रक्ताचे नाते गोठले; स्मशानातील राखेचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:19 IST

अहमदनगर : कोरोनामुळे मृतांची संख्या वाढलेली असतानाच स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील सर्वाधिक ...

अहमदनगर : कोरोनामुळे मृतांची संख्या वाढलेली असतानाच स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील सर्वाधिक अंत्यसंस्कार होत असलेल्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये राखेचे ढीग जमा होत आहेत. कोरोनामुळे रक्ताची नातीही गोठली असून कर्मचाऱ्यांनाच त्या राखेवर सोपस्कार पार पाडावे लागत आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर नगर शहरात फक्त नालेगाव अमरधाममध्येच अंत्यसंस्कार केले जातात. आता काही अंत्यसंस्कार तपोवन रोड येथील सावेडी परिसरातील कचरा डेपोत केले जात आहेत.

महापालिकेच्या मार्गदर्शनात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनाने मयत झालेल्यांचे बहुतांश अंत्यसंस्कार विद्युतदाहिनीमध्येच होतात. गत महिन्यात एकाच दिवशी ४० ते ५० अंत्यसंस्कार लाकडावर करण्यात आले होते.

कोरोनाने मयत झालेल्यांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर बरेच नातेवाईक फक्त अस्थी घेऊन घेतात. राख सहसा कोणीच नेत नाही. तसेच काही जण अस्थीही नेत नाहीत आणि राखही नेत नाहीत. त्यामुळे अमरधाममध्ये राखेचे ढीग साचलेले आहेत. ही राख पोती भरून ती नदीत सोडण्याचे कामही सध्या कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. भीती आणि निर्बंधामुळे अंत्यविधीला सोडाच पण मृतांची अस्थी व राख घेण्यासाठीसुद्धा नातेवाईक येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राखेची जबाबदारीही कर्मचारीच उचलत आहेत.

-------

गतवर्षीपेक्षा आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नातेवाईक अस्थी घेण्यासाठी येत आहेत. पण, राख मात्र संसर्गाच्या भीतीने स्मशानभूमीतच सोडून जात आहेत. तर काही जण राखेने नदी दूषित होईल, म्हणून राख स्मशानभूमीतच ठेवत आहेत.

- एक कर्मचारी, कचरा डेपो स्मशानभूमी

-----

अमरधाम स्मशानभूमीत सर्वाधिक मयतावर अंत्यसंस्कार झाल्यावर नातेवाईक राख नेत नसल्याने राखेचे ढिगारे साचत आहेत. मोठ्या प्रमाणात पोती राखेने भरून ठेवाव्या लागत आहेत. ही राख कर्मचाऱ्यांनाच एका टेम्पोतून नदीत नेऊन टाकावी लागत आहे. ३० टक्के लोक राखही नेत नाहीत आणि अस्थीही नेत नाहीत.

- स्वप्नील कुऱ्हे, व्यवस्थापक, अमरधाम

------

अस्थींचे नदीत विसर्जन....

सध्या बाहेर फिरण्यावर निर्बंध असल्याने अनेक जण अस्थी घेऊन जात नाहीत. त्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी जाता येत नसल्याने अडचण आहे; परंतु स्मशानभूमीमधील कर्मचारी स्वत: ती राख नदीत नेऊन टाकत आहेत. इतर स्मशानभूमीत कोणी राख नेणारे असल्यास त्यांच्याजवळ ती देण्यात येत आहे.

बाहेरगावातील कोरोनाबाधिताचे शहरात निधन झाले, तर त्याचे नातेवाईक अस्थी नेत नाहीत, अशा अस्थींच्या पोती भरून ठेवाव्या लागत आहेत. ही राख नदीत नेऊन टाकत आहोत. आतापर्यंत ५००-६०० पोती राख विसर्जित केली आहे.

-------

आता भीती गेली

सुरुवातीला लोकांना कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास भीती वाटत होती; परंतु आता कोणीच भीत नाही, असे अमरधामधील कर्मचाऱ्याने सांगितले.

डमी आहे.....