शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अहमदनगर महापालिकेतही भाजपाचा स्वबळाचा नारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 17:51 IST

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने २०१८ मध्ये होणाºया अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे.

ठळक मुद्दे२०१८ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीचे भाजपाने फुंकले रणशिंगभाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णयमिरा-भाईंदरमध्ये यशाबद्दल फटाके वाजवून आनंदा साजरा

अहमदनगर : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने २०१८ मध्ये होणाºया अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. आज दुपारी गांधी मैदानातील भाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस शहर जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा यांनीआगामी महानगरपालिका स्वबळावर लढून महापौर भाजपाचा करण्याचा ठराव मांडला. त्यास उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अनुमोदन दिले तर उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने हा ठराव संमत केला. यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, उपाध्यक्ष अन्वर खान, नगरसेविका मालन ढोणे, गटनेते सुवेंद्र गांधी, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.मिरा-भाईंदरमध्ये भाजपाने मिळविलेल्या यशाबद्दल फटाके वाजवून आनंदा साजरा करण्यात आला. यावेळी सुनिल रामदासी म्हणाले, विकासाच्या मुद्यावर भाजपा निवडणुका लढवत असून, उत्कृष्ट नियोजनामुळे जिंकत आहे. भाजपा संपूर्ण राज्यात मिळवत असलेल्या यशामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.उपमहापौर छिंदम म्हणाले, २५ वर्षे शिवसेनेचा आमदार नगरमध्ये होता. तसेच गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे. महापालिकेतही या आधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांना महापौरपद मिळाले. मात्र आजपर्यंत भाजप यापासून लांब आहे. आता मात्र भाजपला नगर शहरामधील सर्व निवडणुका जिंकण्याची मोठी संधी आहे.  यासाठी २०१८ ला नगरच्या महापालिकेला सामोरे जायचे आहे. ही निवडणुक आपण स्वबळावर लढणार असून त्यासाठी नियोजन करत आहोत.  सुवेंद्र गांधी म्हणाले, भाजपाच्या सरकारमुळे अच्छे दिन आले आहेत. जनता उत्स्फुर्तपणे भाजपाच्या मागे उभी आहे. नगरमध्येही  शहर भारतीय जनता पार्टी चांगले काम करत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्तविक अन्वर खान यांनी तर आभार नरेश चव्हाण यांनी मानले.  यावेळी विश्वनाथ पोंदे, मल्हार गंधे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भोरे, सुभाष साळवे, अज्जू शेख, संतोष शिरसाठ, अविनाश साखला, रफिक सय्यद, सागर कराळे, उमेश साठे, सागर गोरे, तुषार पोटे, नितीन घोरपडे, संदिप पवार, सुनिल सकट, जालिदर शिंदे, शुभम कोटा, शशिकांत पालवे, विपुल पुप्पाल, हेमंत दंडवते, शिवाजी दहिंडे, गणेश साठे उपस्थित होते