शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

अहमदनगर महापालिकेतही भाजपाचा स्वबळाचा नारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 17:51 IST

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने २०१८ मध्ये होणाºया अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे.

ठळक मुद्दे२०१८ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीचे भाजपाने फुंकले रणशिंगभाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णयमिरा-भाईंदरमध्ये यशाबद्दल फटाके वाजवून आनंदा साजरा

अहमदनगर : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने २०१८ मध्ये होणाºया अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. आज दुपारी गांधी मैदानातील भाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस शहर जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा यांनीआगामी महानगरपालिका स्वबळावर लढून महापौर भाजपाचा करण्याचा ठराव मांडला. त्यास उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अनुमोदन दिले तर उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने हा ठराव संमत केला. यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, उपाध्यक्ष अन्वर खान, नगरसेविका मालन ढोणे, गटनेते सुवेंद्र गांधी, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.मिरा-भाईंदरमध्ये भाजपाने मिळविलेल्या यशाबद्दल फटाके वाजवून आनंदा साजरा करण्यात आला. यावेळी सुनिल रामदासी म्हणाले, विकासाच्या मुद्यावर भाजपा निवडणुका लढवत असून, उत्कृष्ट नियोजनामुळे जिंकत आहे. भाजपा संपूर्ण राज्यात मिळवत असलेल्या यशामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.उपमहापौर छिंदम म्हणाले, २५ वर्षे शिवसेनेचा आमदार नगरमध्ये होता. तसेच गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे. महापालिकेतही या आधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांना महापौरपद मिळाले. मात्र आजपर्यंत भाजप यापासून लांब आहे. आता मात्र भाजपला नगर शहरामधील सर्व निवडणुका जिंकण्याची मोठी संधी आहे.  यासाठी २०१८ ला नगरच्या महापालिकेला सामोरे जायचे आहे. ही निवडणुक आपण स्वबळावर लढणार असून त्यासाठी नियोजन करत आहोत.  सुवेंद्र गांधी म्हणाले, भाजपाच्या सरकारमुळे अच्छे दिन आले आहेत. जनता उत्स्फुर्तपणे भाजपाच्या मागे उभी आहे. नगरमध्येही  शहर भारतीय जनता पार्टी चांगले काम करत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्तविक अन्वर खान यांनी तर आभार नरेश चव्हाण यांनी मानले.  यावेळी विश्वनाथ पोंदे, मल्हार गंधे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भोरे, सुभाष साळवे, अज्जू शेख, संतोष शिरसाठ, अविनाश साखला, रफिक सय्यद, सागर कराळे, उमेश साठे, सागर गोरे, तुषार पोटे, नितीन घोरपडे, संदिप पवार, सुनिल सकट, जालिदर शिंदे, शुभम कोटा, शशिकांत पालवे, विपुल पुप्पाल, हेमंत दंडवते, शिवाजी दहिंडे, गणेश साठे उपस्थित होते