शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भाजपाला सत्तेचा घमेंड; अण्णा हजारेंची टीका, जानेवारीत आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 18:49 IST

जन आंदोलनाच्या तयारीसाठी देशभरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे राळेगणसिध्दी येथे शनिवार व रविवारी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सरकारला तीन महिने वेळ देऊन या काळात हजारे विविध राज्यात सभा घेऊन जनजागृती करणार आहेत.

ठळक मुद्देशेतक-यांकडून जे चक्रवाढ व्याज आकारलेले आहे, ते त्यांना परत करावेशेतक-यांनीच संघटित व्हायला हवे. सध्याच्या सरकारला सत्तेची घमेंड असून, त्यांनी जनतेची फसवणूक केली

पारनेर : लोकपाल, शेतकरी आंदोलन व निवडणूक सुधारणा इत्यादी मुद्द्यांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी जन आंदोलन सुरू करण्याचा निर्णय राळेगणसिद्धी येथे झालेल्या दोन दिवसीय शिबिरात घेण्यात आला. भाजपाला सत्तेचा घमेंड चढला आहे़ त्यामुळे ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असा आरोप अण्णांनी यावेळी केला़जन आंदोलनाच्या तयारीसाठी देशभरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे राळेगणसिध्दी येथे शनिवार व रविवारी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सरकारला तीन महिने वेळ देऊन या काळात हजारे विविध राज्यात सभा घेऊन जनजागृती करणार आहेत.समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना अण्णा म्हणाले, ग्रामसभा विधानसभा व लोकसभेची जननी आहे म्हणून ग्रामसभेला अधिकार मिळाले पाहिजेत. लोकप्रतिनिधी हे जनतेला जबाबदार असले पाहिजेत कारण त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. दुर्दैवाने आज लोकप्रतिनिधी जनतेला नाही तर राजकीय पक्षाला जबाबदार आहेत. ही खरी लोकशाही होऊ शकत नाही. जन आंदोलनातून हे बदलावे लागेल. नोटा अधिकाराची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक व्हावी व ज्यांना लोकांनी नाकारले आहे त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ नये. शेतक-यांच्या प्रश्नावर सखोल विचार व्हावा. पीक कर्जावर कायद्याचे उल्लंघन करून मनमानी व्याज आकारले जाते. पीक विम्याच्या माध्यमातून शेतक-यांची लूट होते. बँक रेग्युलेशन कायद्याचे बँकांकडून पालन होत नाही. त्यामुळे शेतक-यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. सर्वोच्च न्यायालयाने यावर स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही शेतक-यांच्या प्रश्नावर विचार होत नाही हा अन्याय आहे. याविरोधात आंदोलन करावे लागेल. कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर जनजागृती करून आंदोलन करावे. आंदोलनाची मागणी राहील की, १९७२ पासून शेतक-यांकडून जे चक्रवाढ व्याज आकारलेले आहे, ते त्यांना परत करावे. शेतकरी हा सुद्धा देशाचा सेवक आहे. त्याला वयाच्या ६० वर्षांनंतर निवृत्तिवेतन मिळाले पाहिजे. संसदेत प्रलंबित असलेले शेतकरी पेन्शन विधेयक तत्काळ मंजूर करावे, औद्योगिक क्षेत्राला सर्व सोयीसुविधा देण्यात येतात. पण शेतक-यांना मात्र काहीच दिले जात नाही. यावर शेतक-यांनीच संघटित व्हायला हवे. केवळ स्तर पाच व सहामधील जमिनीचे क्षेत्र विकासकामांसाठी अधिग्रहित करायला हवे. ते करताना ग्रामसभेची परवानगी बंधनकारक असायला हवी. मंत्रालयात बसून शेतक-यांच्या जमिनी संपादित करणे हे अन्यायकारक आहे. हे थांबविण्यासाठी आंदोलनाची गरज आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर शेतक-यांना संसदेत पाठवावे लागेल. त्यासाठी शेतक-यांना जागवावे लागेल, असे अण्णा म्हणाले.कार्यकर्त्यांनी चारित्र्य सांभाळणे आवश्यक आहे. केवळ सत्ता परिवर्तन करून काही साध्य होणार नाही. जनआंदोलनातून व्यवस्था परिवर्तन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या सरकारला सत्तेची घमेंड असून, त्यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचे हजारे म्हणाले. कार्यकर्त्यांनी संविधानाचा अभ्यास करायला हवा. लोकशिक्षण करायला हवे. परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर संघटित होऊन व्यापक आंदोलन करावे लागेल. न्यासाचे प्रा. बालाजी कोंपलवार, अशोक सब्बन, अल्लाउद्दीन शेख, अजित देशमुख इत्यादींनी चर्चेत सहभाग घेतला. राळेगणसिद्धीच्या सरपंच रोहिणी गाजरे यांनी आभार मानले.