शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

अहमदनगरची बाजारपेठ उद्धवस्त करण्याचा भाजप-राष्ट्रवादीचा डाव! काँग्रेसची टीका

By साहेबराव नरसाळे | Updated: April 18, 2023 14:01 IST

कापड बाजारातील एका व्यापाऱ्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: व्यापाऱ्यांच्या आडून राजकीय नेते पोळ्या भाजत आहेत. भाजप-राष्ट्रवादीमुळे शहरातील वातावरणात तणाव निर्माण होत आहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी बाजारपेठ उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यांना ना व्यापाऱ्यांची काळजी आहे, ना हॉकर्सची, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कापड बाजारातील एका व्यापाऱ्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यापार्श्वभूमीवर नगरमधील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. मात्र, त्यास भाजप व राष्ट्रवादीचे नेते जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसकडून केली आहे. काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. यावेळी मनोज गुंदेचा, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, दशरथ शिंदे, प्रवीण गीते, सुजित क्षेत्रे, राहुल सावंत, गौरव घोरपडे आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, नवलानी यांच्यावरील हल्लेखोराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फरार आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही. वर्षभरापूर्वी अतिक्रमण विरोधी कारवाई करुन तात्पुरती मलमपट्टी करत व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्यांनी मोठी गुंतवणूक करून दुकानं घेतली आहेत. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी मनपावर आहे. मात्र गोरगरीब, हातावर पोट भरणाऱ्यांचे फेरीवाला धोरणाप्रमाणे जोपर्यंत कायमस्वरूपी योग्य पुनर्वसन मनपा करत नाही, तोपर्यंत व्यापाऱ्यांची मागणी कायमस्वरूपी निकाली निघू शकत नाही. बाजारपेठेत स्वतःच एकही दुकान नसणारे तथाकथित राजकीय पुढारी ढोंगी भाषणबाजी करून एकाच वेळी व्यापारी, हॉकर्सची फसवणूक करत आपली राजकीय दुकानदारी चालवीत असल्याचा आरोप काळेंनी केला.

आडते बाजार, डाळमंडई स्थलांतराचा डाव

शहरात बाजार समितीची २८ एकर जागा आहे. सोयऱ्या धायऱ्यांच्या हातात सत्ता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर ३ फेजमध्ये समिती आवारात पुर्नविकासाच्या नावाखाली २०० कोटी रूपयांचा बांधकाम आराखडा तयार करण्यात आला असून गाळ्यांच्या विक्रीतून मलिदा लाटण्यासाठी आटापिटा नेत्यांचा सुरू आहे. कोरोना काळात भाजी व फळबाजार नेप्ती उपबाजाराला स्थलांतरित करण्याचा डाव व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे फसला. भविष्यात दहशतीच्या जोरावर तो स्थलांतरीत केला जाणार असून तिथे आडते बाजार, डाळमंडई स्थलांतरित करण्याचा डाव असल्याचा गौप्यस्पोट काळेंनी केला. त्यासाठीच बाजारपेठेतील वातावरण खराब केले जात असल्याचा दावा काळे यांनी केला.

व्यापारी, फेरीवाल्यांच्या प्रश्नाला धार्मिक रंग

मर्जीतल्या बिल्डरांना हाताशी धरून पाईपलाईन रोड, झोपडी कॅन्टीनजवळ व्यावसायिक गाळे, मॉलचे काम सुरू आहे. मनमाड रोडवर एका संस्थेचा मोठा भूखंड लाटून ३०० कोटींचा मॉल उभा करण्याचा डाव या नेत्यांचा आहे. बाजारपेठ उध्वस्त केल्याशिवाय पुढारी, बिल्डर लॉबीच्या संगनमतातून उभे राहणारे हे मॉल चालणार नाहीत. ग्राहक मिळणार नाही. यामुळेच बाजारपेठेतील विषयाला धार्मिक रंग देण्याचे षडयंत्र आहे. मॉल संस्कृतीमुळे बाजारपेठ, उपनगरांतील छोटे व्यापारी कायमचे उध्वस्त होतील, अशी भीती काळे यांनी व्यक्त केली.

हिंमत असेल तर राणेंनी आरोपींना अटक करुन दाखवावी

भाजप नेते आ. नितेश राणे नगरमध्ये येत आहेत. यावर टिप्पणी करताना किरण काळे म्हणाले, राणे हिंदूंसाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी येताना शहरातील ५० हजार हिंदू तरुण बांधवांच्या रोजगारासाठी सरकारकडून एमआयडीसी करिता १० हजार कोटींचे पॅकेज आणावे. टाटा, बिर्ला, महिंद्रा, बजाज या सारखे मोठे उद्योग घेऊन यावेत. यामुळे बाजारपेठेतील व्यापाराला देखील चालना मिळेल. नवलानींसह हिंदू बांधव असणारे माळी समाजाचे कांदा व्यापारी चिपाडे यांनाही राणेंनी न्याय मिळवून द्यावा. राणेंनी हिंमत असेल तर बाजारपेठेत जाण्यापूर्वी चिपाडे यांच्यावरील हल्लेखोरांना त्यांच्या सरकारच्या माध्यमातून अटक करुन दाखवावी, असे आव्हान काँग्रेसने दिले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर