शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरची बाजारपेठ उद्धवस्त करण्याचा भाजप-राष्ट्रवादीचा डाव! काँग्रेसची टीका

By साहेबराव नरसाळे | Updated: April 18, 2023 14:01 IST

कापड बाजारातील एका व्यापाऱ्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: व्यापाऱ्यांच्या आडून राजकीय नेते पोळ्या भाजत आहेत. भाजप-राष्ट्रवादीमुळे शहरातील वातावरणात तणाव निर्माण होत आहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी बाजारपेठ उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यांना ना व्यापाऱ्यांची काळजी आहे, ना हॉकर्सची, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कापड बाजारातील एका व्यापाऱ्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यापार्श्वभूमीवर नगरमधील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. मात्र, त्यास भाजप व राष्ट्रवादीचे नेते जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसकडून केली आहे. काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. यावेळी मनोज गुंदेचा, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, दशरथ शिंदे, प्रवीण गीते, सुजित क्षेत्रे, राहुल सावंत, गौरव घोरपडे आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, नवलानी यांच्यावरील हल्लेखोराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फरार आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही. वर्षभरापूर्वी अतिक्रमण विरोधी कारवाई करुन तात्पुरती मलमपट्टी करत व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्यांनी मोठी गुंतवणूक करून दुकानं घेतली आहेत. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी मनपावर आहे. मात्र गोरगरीब, हातावर पोट भरणाऱ्यांचे फेरीवाला धोरणाप्रमाणे जोपर्यंत कायमस्वरूपी योग्य पुनर्वसन मनपा करत नाही, तोपर्यंत व्यापाऱ्यांची मागणी कायमस्वरूपी निकाली निघू शकत नाही. बाजारपेठेत स्वतःच एकही दुकान नसणारे तथाकथित राजकीय पुढारी ढोंगी भाषणबाजी करून एकाच वेळी व्यापारी, हॉकर्सची फसवणूक करत आपली राजकीय दुकानदारी चालवीत असल्याचा आरोप काळेंनी केला.

आडते बाजार, डाळमंडई स्थलांतराचा डाव

शहरात बाजार समितीची २८ एकर जागा आहे. सोयऱ्या धायऱ्यांच्या हातात सत्ता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर ३ फेजमध्ये समिती आवारात पुर्नविकासाच्या नावाखाली २०० कोटी रूपयांचा बांधकाम आराखडा तयार करण्यात आला असून गाळ्यांच्या विक्रीतून मलिदा लाटण्यासाठी आटापिटा नेत्यांचा सुरू आहे. कोरोना काळात भाजी व फळबाजार नेप्ती उपबाजाराला स्थलांतरित करण्याचा डाव व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे फसला. भविष्यात दहशतीच्या जोरावर तो स्थलांतरीत केला जाणार असून तिथे आडते बाजार, डाळमंडई स्थलांतरित करण्याचा डाव असल्याचा गौप्यस्पोट काळेंनी केला. त्यासाठीच बाजारपेठेतील वातावरण खराब केले जात असल्याचा दावा काळे यांनी केला.

व्यापारी, फेरीवाल्यांच्या प्रश्नाला धार्मिक रंग

मर्जीतल्या बिल्डरांना हाताशी धरून पाईपलाईन रोड, झोपडी कॅन्टीनजवळ व्यावसायिक गाळे, मॉलचे काम सुरू आहे. मनमाड रोडवर एका संस्थेचा मोठा भूखंड लाटून ३०० कोटींचा मॉल उभा करण्याचा डाव या नेत्यांचा आहे. बाजारपेठ उध्वस्त केल्याशिवाय पुढारी, बिल्डर लॉबीच्या संगनमतातून उभे राहणारे हे मॉल चालणार नाहीत. ग्राहक मिळणार नाही. यामुळेच बाजारपेठेतील विषयाला धार्मिक रंग देण्याचे षडयंत्र आहे. मॉल संस्कृतीमुळे बाजारपेठ, उपनगरांतील छोटे व्यापारी कायमचे उध्वस्त होतील, अशी भीती काळे यांनी व्यक्त केली.

हिंमत असेल तर राणेंनी आरोपींना अटक करुन दाखवावी

भाजप नेते आ. नितेश राणे नगरमध्ये येत आहेत. यावर टिप्पणी करताना किरण काळे म्हणाले, राणे हिंदूंसाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी येताना शहरातील ५० हजार हिंदू तरुण बांधवांच्या रोजगारासाठी सरकारकडून एमआयडीसी करिता १० हजार कोटींचे पॅकेज आणावे. टाटा, बिर्ला, महिंद्रा, बजाज या सारखे मोठे उद्योग घेऊन यावेत. यामुळे बाजारपेठेतील व्यापाराला देखील चालना मिळेल. नवलानींसह हिंदू बांधव असणारे माळी समाजाचे कांदा व्यापारी चिपाडे यांनाही राणेंनी न्याय मिळवून द्यावा. राणेंनी हिंमत असेल तर बाजारपेठेत जाण्यापूर्वी चिपाडे यांच्यावरील हल्लेखोरांना त्यांच्या सरकारच्या माध्यमातून अटक करुन दाखवावी, असे आव्हान काँग्रेसने दिले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर