शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अण्णांच्या मनधरणीसाठी भाजप नेते राळेगणसिद्धीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे ...

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे व खा. डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे अण्णांची भेट घेऊन चर्चा केली. अण्णांनी दिल्लीत उपोषणाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस सुनील थोरात उपस्थित होते. रविवारीच दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी राळेगणमध्ये अण्णांची भेट घेऊन त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे नेते राळेगणमध्ये आले.

अण्णांनी केलेल्या मागण्या शेतकरी हिताच्या असून त्यासंबंधी चर्चेतून योग्य मार्ग काढण्यात येईल. अण्णांचे वय पाहता त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबू नये, असा आग्रह भाजप नेत्यांनी अण्णांकडे केला. हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता. २३ मार्च २०१८ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदान आणि ३० जानेवारी २०१९ रोजी राळेगणसिद्धी येथे केलेल्या आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय कृषिमंत्री यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्षांत या आश्वासनाचे पालन झाले नसल्याची आठवण यावेळी अण्णांनी भाजप नेत्यांना करून दिली.

बागडे आणि खा. डॉ. कराड यांनी यावेळी अण्णांना सुधारित कृषी कायद्याची मराठी आवृत्ती दिली. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. यातून लवकरच देशातील शेतकऱ्यांचा फायदा झाल्याचे पहायला मिळेल, असे भाजप नेत्यांनी सांगितले.

-----

अण्णांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक

या सर्व प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा, अशी मागणी अण्णांकडे केली आहे. केंद्रीय पातळीवर चर्चा करून अण्णांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे खा. डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.