शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

भाजप सरकारने दूध उत्पादकांना फसवले : राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:54 IST

राज्य सरकारवर अवलंबून राहून शेतकरी सुखी होणार नाहीत. भाजप सरकारचे मंत्री फक्त घोषणा करतात आणि मग विचार करतात.

संगमनेर : राज्य सरकारवर अवलंबून राहून शेतकरी सुखी होणार नाहीत. भाजप सरकारचे मंत्री फक्त घोषणा करतात आणि मग विचार करतात. कोणत्याच निर्णयाची अंमलबजावणी या सरकारकडून होत नाही. कर्जमाफी योजनेप्रमाणेच राज्यातील दुध उत्पादकांनाही या सरकारने फसवले आहे. दूध उत्पादकांना पाच रूपयांचा दर वाढवून देण्यातही सरकारने खोटेपणा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.शनिवारी तालुक्यातील मनोली येथे एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विखे यांनी सरकारवर टीका केली. अमुल दुध संघाचे सह व्यवस्थापक प्रभाकर चौरे, डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड. रोहीणी निघुते, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, भगवानराव इलग, रामभाऊ भुसाळ, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी आधिकारी कारभारी नवले, पंचायत समितीचे गटविकास आधिकारी सुरेश शिंदे, सरपंच उज्वला शिंदे, विनय निसाळ, मच्छिंद्र भागवत, अण्णासाहेब बेंद्रे आदी उपस्थित होते.विखे म्हणाले, राज्य सरकारने दुध उत्पादकांना दर वाढवून द्यावेत या मागणीसाठी नागपुर आधिवेशनात आपण मागणी लावून धरली होती. सरकारने केवळ घोषणा केली. पण आज तागायत दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतेही पैसे वर्ग केले नाहीत. शेतकरी कर्जमाफी योजनेतही हाच प्रकार सरकारने केला. मुख्यमंत्र्यांपासुन सर्व मंत्री आधी घोषणा करतात आणि मग त्याचा विचार करतात. असे अनेक फतवे मंत्र्यांनी मागे घेतल्याची उदाहरणे असल्याचे विखे म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर