शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

बेरोजगारीला भाजप, सेना जबाबदार-सत्याजित तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:41 IST

शेतीवर युवकांचे भविष्य घडणे शक्य नसून त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजप, सेना सरकारने रोजगार निर्मितीसाठी कोणतेही कार्य केले नाही. राज्यात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्याजित तांबे यांनी केली.

संगमनेर : शेतीवर युवकांचे भविष्य घडणे शक्य नसून त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजप, सेना सरकारने रोजगार निर्मितीसाठी कोणतेही कार्य केले नाही. राज्यात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्याजित तांबे यांनी केली. संगमनेर तालुक्यातील जाखुरी, खराडी, मालुंजे येथे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ सभांमध्ये ते बोलत होते.  संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, गणपतराव सांगळे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, सदाशिव वाकचौरे, आण्णा राहिंज, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, रमेश नेहे, दादासाहेब देशमुख, भास्कर बागुल, नानासाहेब गुंजाळ, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.  तांबे म्हणाले, यंदाची विधानसभा निवडणुक युवकांसाठी खूप महत्त्वाची आहे. युवकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे. काँग्रेस सरकारने मागील   काळात अनेक उद्योग कारखाने या देशात आणले. परंतु भाजप, सेना सरकारने रोजगार निर्माण करेल असा एकही कारखाना राज्यात आणला नाही.सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात शिक्षणाची क्रांती केली. संस्था उभारल्यामुळे तालुक्याची स्थिती सक्षम झाली आहे. थोरात हे प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे राज्यात काँग्रेसची स्थिती खूप चांगली आहे. सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. सचिन खेमनर, मोहन गुंजाळ, गौरव डोंगरे, सिद्धार्थ थोरात, रमेश गफले, शेखर सोसे, बाळासाहेब राहाणे, राधाकिसन देशमुख, किसन पानसरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर