शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बेरोजगारीला भाजप, सेना जबाबदार-सत्याजित तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:41 IST

शेतीवर युवकांचे भविष्य घडणे शक्य नसून त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजप, सेना सरकारने रोजगार निर्मितीसाठी कोणतेही कार्य केले नाही. राज्यात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्याजित तांबे यांनी केली.

संगमनेर : शेतीवर युवकांचे भविष्य घडणे शक्य नसून त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजप, सेना सरकारने रोजगार निर्मितीसाठी कोणतेही कार्य केले नाही. राज्यात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्याजित तांबे यांनी केली. संगमनेर तालुक्यातील जाखुरी, खराडी, मालुंजे येथे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ सभांमध्ये ते बोलत होते.  संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, गणपतराव सांगळे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, सदाशिव वाकचौरे, आण्णा राहिंज, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, रमेश नेहे, दादासाहेब देशमुख, भास्कर बागुल, नानासाहेब गुंजाळ, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.  तांबे म्हणाले, यंदाची विधानसभा निवडणुक युवकांसाठी खूप महत्त्वाची आहे. युवकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे. काँग्रेस सरकारने मागील   काळात अनेक उद्योग कारखाने या देशात आणले. परंतु भाजप, सेना सरकारने रोजगार निर्माण करेल असा एकही कारखाना राज्यात आणला नाही.सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात शिक्षणाची क्रांती केली. संस्था उभारल्यामुळे तालुक्याची स्थिती सक्षम झाली आहे. थोरात हे प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे राज्यात काँग्रेसची स्थिती खूप चांगली आहे. सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. सचिन खेमनर, मोहन गुंजाळ, गौरव डोंगरे, सिद्धार्थ थोरात, रमेश गफले, शेखर सोसे, बाळासाहेब राहाणे, राधाकिसन देशमुख, किसन पानसरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर