शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

बेरोजगारीला भाजप, सेना जबाबदार-सत्याजित तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:41 IST

शेतीवर युवकांचे भविष्य घडणे शक्य नसून त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजप, सेना सरकारने रोजगार निर्मितीसाठी कोणतेही कार्य केले नाही. राज्यात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्याजित तांबे यांनी केली.

संगमनेर : शेतीवर युवकांचे भविष्य घडणे शक्य नसून त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजप, सेना सरकारने रोजगार निर्मितीसाठी कोणतेही कार्य केले नाही. राज्यात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्याजित तांबे यांनी केली. संगमनेर तालुक्यातील जाखुरी, खराडी, मालुंजे येथे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ सभांमध्ये ते बोलत होते.  संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, गणपतराव सांगळे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, सदाशिव वाकचौरे, आण्णा राहिंज, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, रमेश नेहे, दादासाहेब देशमुख, भास्कर बागुल, नानासाहेब गुंजाळ, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.  तांबे म्हणाले, यंदाची विधानसभा निवडणुक युवकांसाठी खूप महत्त्वाची आहे. युवकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे. काँग्रेस सरकारने मागील   काळात अनेक उद्योग कारखाने या देशात आणले. परंतु भाजप, सेना सरकारने रोजगार निर्माण करेल असा एकही कारखाना राज्यात आणला नाही.सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात शिक्षणाची क्रांती केली. संस्था उभारल्यामुळे तालुक्याची स्थिती सक्षम झाली आहे. थोरात हे प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे राज्यात काँग्रेसची स्थिती खूप चांगली आहे. सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. सचिन खेमनर, मोहन गुंजाळ, गौरव डोंगरे, सिद्धार्थ थोरात, रमेश गफले, शेखर सोसे, बाळासाहेब राहाणे, राधाकिसन देशमुख, किसन पानसरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर