शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

पक्ष्यांच्या चारा, पाण्यासाठी खुला केला ज्वारीचा मळा

By admin | Updated: January 12, 2016 23:36 IST

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा दुष्काळी स्थितीमुळे जिरायत भागातील ज्वारीचे पीक करपले आहे. चारा, पाण्याच्या शोधार्थ पक्ष्यांनी बागायती भागात धाव घेतली आहे

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा दुष्काळी स्थितीमुळे जिरायत भागातील ज्वारीचे पीक करपले आहे. चारा, पाण्याच्या शोधार्थ पक्ष्यांनी बागायती भागात धाव घेतली आहे. पक्ष्यांना चारा, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वांगदरी येथील शेतकरी प्रल्हाद निवृत्ती नागवडे यांनी आपल्या साडेतीन एकर ज्वारीच्या शेतात चार पाणवठे तयार करून ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला केला आहे. ज्वारीच्या सोन्यासारख्या टपोऱ्या कणसावर ऐटीत बसून विविध प्रकारचे पक्षी ताव मारून पाणी पिण्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी घोड धरणाच्या लाभ क्षेत्रातील ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी ज्वारी,गव्हाच्या पिकांकडे मोर्चा वळविला आहे. प्रल्हाद नागवडे यांनी नऊ एकर शेतीपैकी साडेतीन एकर क्षेत्रात ज्वारीची पेरणी करुन ज्वारी पिकास खतपाणी घातले. त्यामुळे जोंधळ्याला चांदणे लगडले. दुष्काळीस्थितीमुळे जिरायत भागातील विविध प्रकारचे पक्षी तहानभूक भागविण्यासाठी घोडच्या पट्टयात आले आहेत. प्रल्हाद नागवडे व त्यांचा मुलगा अविनाश नागवडे यांनी अर्थकारण व स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीव्हीसी पाईप कापून त्याचे पाणवठे तयार केले. विविध प्रकारचे पक्षी नागवडे यांच्या मळ्यात हक्काने येऊन भूक, तहान भागवितात, तृप्त पक्षी मंजुळ किलबिलाट करतात. पक्ष्यांचे मनोहारी दृश्य पाहून नागवडे परिवाराला आगळावेगळे समाधान मिळत आहे. अध्यात्मिक वारसा असलेले प्रल्हाद नागवडेंचे कुटुंब हा उपक्रम तीन वर्षांपासून राबवित आहे. ईश्वराच्या सेवेपेक्षा पशू, पक्ष्यांच्या सेवेतून अधिक समाधान मिळते. यात मोठा आनंद आहे. ‘पक्षी येती शेतात, आम्हा तोचि दिवाळी दसरा’. कायम दिवाळी, दसरा साजरा होण्यासाठी दरवर्षी ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला करणार आहे. -प्रल्हाद नागवडे, प्रगतशील शेतकरी, वांगदरी दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे मार्च, मे महिन्यात पशुपक्ष्यांचे जीवनमान धोक्यात येणार आहे. अशा आणीबाणीच्या काळात प्रत्येकाने मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पशु, पक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले पाहिजेत. माणसांच्या जेवणावळी उठविण्यापेक्षा प्रल्हाद नागवडे या शेतकऱ्याचा आदर्श घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी पशु, पक्ष्यांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था करावी. यामधून सुट्टीचा आगळावेगळा आनंद लुटावा. आपल्या परिवार,परिसरात वेगळे चैतन्य निर्माण होईल. -ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा.