शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

कोट्यवधी लाटणारे व्हाईट कॉलर गुन्हेगार खुलेआम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST

आर्थिक गुन्ह्यांतील आरोपींवर वेळीच कारवाई होत नसल्याने आर्थिक संस्थांमधील अपहाराचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. गेल्या पाच ते ...

आर्थिक गुन्ह्यांतील आरोपींवर वेळीच कारवाई होत नसल्याने आर्थिक संस्थांमधील अपहाराचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत विविध मल्टी नॅशनल कंपन्यांनी आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून नगरकरांना २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेला गंडा घालून गाशा गुंडाळला. बहुतांशी पतसंस्थांनीही गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडविले आहेत. अडकलेले पैसे परत मिळतील या आशेने गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेत हेलपाटे मारत आहेत. अपहार करणाऱ्या आरोपींना अटक करा, त्यांच्या मालमत्तेवर टाच आणा, अशा मागण्या गुंतवणूकदारांकडून सातत्याने होत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून मात्र बहुतांशी गुन्ह्यांत ठोस अशी काहीच कारवाई होत नसल्याने गुंतवणूकदारही हवालदिल झाले आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------

उपअधीक्षक सोनवणे यांना पुनर्नियुक्ती

पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे या आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. बहुतांशी गुन्ह्यांचा त्या स्वत: तपास करत आहेत. नगर येथील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची नंदुरबार येथे बदली झाली होती. मात्र, शासनाने ही बदली रद्द करून त्यांना पुन्हा नगर येथेच नियुक्ती दिली. त्यामुळे त्यांच्या आधीच्या कार्यकालात तपासावर असलेले गुन्हे तातडीने मार्गी लागतील, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे.

------------------------------------------------------------------------------------

या कंपन्या, संस्थांमध्ये झाला अपहार

बीएनपी, विश्वमित्रा, एनआयसीएल, जनसहारा मल्टी, मैत्रेय सुवर्णसद्धी, रॉयल टिंक्वट स्टार या मल्टी नॅशनल कंपन्यांसह संपदा सहकारी पतसंस्था, मार्तंड नागरी पतसंस्था, सुवर्ण नागरी तपसंस्था, श्रीनाथ मल्टीस्टेट, रावसाहेब पटवर्धन पतसंस्था, व्यंकटेश पतसंस्था यासह जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांमध्ये छोट्यामोठ्या अपहाराची प्रकरणे समोर आली आहेत. अहमदनगर शहर सहकारी बँक व नगर अर्बन बॅंकेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सध्या सर्वत्र गाजत आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------

आर्थिक गुन्ह्यांचा तपास हा क्लिष्ट स्वरूपाचा असतो. त्यामुळे इतर गुन्ह्यांच्या तुलनेत अशा तपासांना वेळ लागतो. या गुन्ह्यांतील आरोपीची मालमत्ता शोधणे, त्यावर पुढील कारवाई करणे, शासनाला प्रस्ताव पाठविणे, अशा प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तपास किती गतीने होत आहे यापेक्षा तपासाचा दर्जा कसा आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

-मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक,