शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘बिहार पॅटर्न’ने जगविली तीनशेहून अधिक झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 16:34 IST

भर उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील जामगाव येथील ‘बिहार पॅटर्न’ अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील तीनशेहून अधिक झाडे आजही हिरवीगार आहेत.

राजूर : भर उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील जामगाव येथील ‘बिहार पॅटर्न’ अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील तीनशेहून अधिक झाडे आजही हिरवीगार आहेत. पाणी टंचाईची समस्या भेडसावत असतानाही ग्रामपंचायत आणि रोजगार सेवक यांच्या योग्य नियोजनामुळे हरितग्रामकडे वाटचाल करत असलेला जामगाव येथील उपक्रम इतर गावांना दिशादायक ठरेल असाच आहे.दोन वर्षांपूर्वी अकोले पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत जामगाव येथे या उपक्रमांतर्गत गावातील रस्त्याच्या दुतर्फा करंज, शिसव, काशीद, बदाम, बॉटल पंप व काही शोभेची अशी विविध प्रकारची चारशे झाडे लावण्यात आली. या झाडांची देखभाल करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.सुरवातीला या झाडांना शेणखत देण्यात आले, यानंतर नियमितपणे पाणी घालणे,झाडांच्या संरक्षनासाठी कूंपण तयार करणे, आळे तयार करून त्यातील तन काढणे आदी कामे या अंतर्गत येत असतात.गावातील सुरवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत व गावअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा काही झाडे लावण्यात आली आहेत. यातील काही झाडांची मर झालेली असली तरी चारशे पैकी तीनशे चाळीस झाडे आजही हिरवीगार आहेत.शेवटच्या टोकाला लावण्यात आलेली झाडे मुरमाड जागेवर असल्याने त्यांची वाढ काहीशी कमी आहे. मात्र गावातील झाडांची वाढ चांगली झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या झाडांना शेणखत टाकणे, आळे हलवून घेणे आदी करावयाचे कामांची माहिती रोजगार सेवक यांना दिली आहे.त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील वर्षात या झाडांची वाढ चांगली होईल, असा आशावाद पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी डी. बी. कोकतरे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले