शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

‘बिहार पॅटर्न’ने जगविली तीनशेहून अधिक झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 16:34 IST

भर उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील जामगाव येथील ‘बिहार पॅटर्न’ अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील तीनशेहून अधिक झाडे आजही हिरवीगार आहेत.

राजूर : भर उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील जामगाव येथील ‘बिहार पॅटर्न’ अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील तीनशेहून अधिक झाडे आजही हिरवीगार आहेत. पाणी टंचाईची समस्या भेडसावत असतानाही ग्रामपंचायत आणि रोजगार सेवक यांच्या योग्य नियोजनामुळे हरितग्रामकडे वाटचाल करत असलेला जामगाव येथील उपक्रम इतर गावांना दिशादायक ठरेल असाच आहे.दोन वर्षांपूर्वी अकोले पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत जामगाव येथे या उपक्रमांतर्गत गावातील रस्त्याच्या दुतर्फा करंज, शिसव, काशीद, बदाम, बॉटल पंप व काही शोभेची अशी विविध प्रकारची चारशे झाडे लावण्यात आली. या झाडांची देखभाल करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.सुरवातीला या झाडांना शेणखत देण्यात आले, यानंतर नियमितपणे पाणी घालणे,झाडांच्या संरक्षनासाठी कूंपण तयार करणे, आळे तयार करून त्यातील तन काढणे आदी कामे या अंतर्गत येत असतात.गावातील सुरवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत व गावअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा काही झाडे लावण्यात आली आहेत. यातील काही झाडांची मर झालेली असली तरी चारशे पैकी तीनशे चाळीस झाडे आजही हिरवीगार आहेत.शेवटच्या टोकाला लावण्यात आलेली झाडे मुरमाड जागेवर असल्याने त्यांची वाढ काहीशी कमी आहे. मात्र गावातील झाडांची वाढ चांगली झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या झाडांना शेणखत टाकणे, आळे हलवून घेणे आदी करावयाचे कामांची माहिती रोजगार सेवक यांना दिली आहे.त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील वर्षात या झाडांची वाढ चांगली होईल, असा आशावाद पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी डी. बी. कोकतरे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले