शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बिहार पॅटर्नने जगविली ९५ टक्के रोपे

By admin | Updated: April 22, 2016 00:11 IST

अहमदनगर : सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध भागात केलेल्या १ लाख १३ हजार वृक्ष लागवडी पैकी ९५ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा केला आहे.

अहमदनगर : सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध भागात केलेल्या १ लाख १३ हजार वृक्ष लागवडी पैकी ९५ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा केला आहे. ही लागवड जिल्ह्यातील विविध तालुक्यात १०२. ३० किलोमीटरवर करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक संचालक एल.बी. बामबर्से यांनी दिली. बिहार पॅटर्नमुळे लागवड केलेली रोपे जगवता आली असे त्यांनी स्पष्ट केले. २०१५-१६ या वर्षभराच्या कालावधीत सामाजिक वनीकरण विभागाने नरेगा (महात्मा गांधी रोजगार हमी), राज्य योजना आणि कॅम्प अंतर्गत ही १ लाख १३ हजार वृक्ष लागवड केली होती. रोहयोतून ९० किलोमीटर लांबीवर रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात आली आहे. गट लागवड पध्दतीत १४. ४५ हेक्टरवर लागवड करण्यात आली असून कॅम्प अंतर्गत १२ किलोमीटरवर गट लागवडीत गावातील गायरान जमिनीवर ही लागवड झालेली आहेत. यात एका हेक्टरवर १ हजार १०० वृक्षाची लागवड करण्यात येते. जिल्ह्यात १०२.३० किलोमीटरवर आणि १६ हेक्टरवर १ लाख १३ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचे बामबर्से यांनी सांगितले. यातील जवळपास ९५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याला बिहार पॅटर्न कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)