शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

बिहार पॅटर्नने जगविली ९५ टक्के रोपे

By admin | Updated: April 22, 2016 00:11 IST

अहमदनगर : सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध भागात केलेल्या १ लाख १३ हजार वृक्ष लागवडी पैकी ९५ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा केला आहे.

अहमदनगर : सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध भागात केलेल्या १ लाख १३ हजार वृक्ष लागवडी पैकी ९५ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा केला आहे. ही लागवड जिल्ह्यातील विविध तालुक्यात १०२. ३० किलोमीटरवर करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक संचालक एल.बी. बामबर्से यांनी दिली. बिहार पॅटर्नमुळे लागवड केलेली रोपे जगवता आली असे त्यांनी स्पष्ट केले. २०१५-१६ या वर्षभराच्या कालावधीत सामाजिक वनीकरण विभागाने नरेगा (महात्मा गांधी रोजगार हमी), राज्य योजना आणि कॅम्प अंतर्गत ही १ लाख १३ हजार वृक्ष लागवड केली होती. रोहयोतून ९० किलोमीटर लांबीवर रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात आली आहे. गट लागवड पध्दतीत १४. ४५ हेक्टरवर लागवड करण्यात आली असून कॅम्प अंतर्गत १२ किलोमीटरवर गट लागवडीत गावातील गायरान जमिनीवर ही लागवड झालेली आहेत. यात एका हेक्टरवर १ हजार १०० वृक्षाची लागवड करण्यात येते. जिल्ह्यात १०२.३० किलोमीटरवर आणि १६ हेक्टरवर १ लाख १३ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचे बामबर्से यांनी सांगितले. यातील जवळपास ९५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याला बिहार पॅटर्न कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)