शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

पदाचा आग्रह धरला नाही, ही मोठी चूक

By admin | Updated: April 25, 2016 23:19 IST

संगमनेर : काँग्रेस पक्षाने मला आमदारकी दिली. न मागता विविध खात्यांची मंत्रिपदे मिळाली. आपण पदासाठी कधीच आग्रह धरला नाही

संगमनेर : काँग्रेस पक्षाने मला आमदारकी दिली. न मागता विविध खात्यांची मंत्रिपदे मिळाली. आपण पदासाठी कधीच आग्रह धरला नाही. मात्र, ही आयुष्यातील मोठी चूक झाल्याची स्पष्ट कबुली माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली. थोरात यांना मुख्यमंत्रीपदाने अनेकदा हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांनी ही सल अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली. संगमनेर पत्रकार मंचच्या वतीने सोमवारी आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष्यामध्ये माझ्या हातून सगळ्यात काय चांगले झाले असेल तर ते निळवंडे धरण. १९९९ ला मी पाटबंधारे राज्यमंत्री झाल्यावर कामास गती दिली. माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या साथीने ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ ही संकल्पना राबविली. स्वत:ची ५ एकर जमीन दिली. आता उर्वरिक काम व कालव्यांसाठी १०० कोटींपेक्षा अधिक निधीची गरज असताना सरकारने फक्त १३ कोटी दिले. याबाबत आपला पाठपुरावा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. २००६ ला समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर झाला, पण त्याचा वेगळा अर्थ लावला गेला. पिण्याचे पाणी खालच्या भागाला देण्यास आपण विरोध केला नाही. पण, निळवंडेचे पाणी गेले तर दुष्काळाची भिती आहे, असे त्यांनी सांगितले. बायपास, प्रवरेला जोड पूल, निंबाळे रिंगरोड, म्हाळुंगीचा रस्ता, निळवंडेतून पाईपलाईन, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, न्यायालयीन इमारत अशी अनेक कामे केली. तंबाखू व विडी उद्योगावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. कारखाने बंद काळात त्यांना बेरोजगार भत्ता दिला पाहिजे. जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर संगमनेर जिल्हा व्हावा, अशी आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका बजावली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीबाबत विचारले असता, मी कधीही पक्ष सोडण्याचा विचार केलेला नसल्याचे ते म्हणाले. साखर कारखान्यांना पाणी दिले नाही तर उसाचे गाळप कसे होणार? मात्र, पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे, असे त्यांनी मद्य निर्मिती संदर्भातील प्रश्नावर स्पष्ट केले. (प्रतिनिधी)