शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 14:04 IST

बालस्तावतक्रीडासक्त: तरुण्स्तावत्तरुणीस्क्त: वृध्दस्तावच्चिन्तासक्त: परमे ब्रह्मणी को२पि न सक्त भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥ ९

भज गोविंदम -९------------------मनुष्य जीवनाचे जन्मापासून काही महत्वाचे भाग पडतात. बालपण, तरुणपण आणि वृद्धापकाळ या तीनही स्तरातून मानव जेव्हा जातो तेव्हा त्याची संसार आसक्ती सुटत नाही. आयुष्य किती आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. पण आपण उद्या जिवंत आहोत, असाच सर्वांना भ्रम असतो. ब्रह्म भिन्नम सर्व मिथ्याह्ण, असे वेद सांगतो. ब्रह्म खरे आहे. बाकी सर्व मिथ्या आहे. खरे आहे असे फक्त भासते. पण प्रत्यक्ष अनुभव घेतला तर मात्र ते खोटे ठरते. जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज म्हणतात, ज्जू सपार्कार भासियाले जगडंबरह्ण, संध्याकाळचे वेळी दोरीवर सर्प भ्रम होत असतो. कारण आधी दोरी होती खरी. सर्प कल्पना उमटे दुसरीे, तैसे सत्य अधिष्ठानावारी जगत कल्पना उमटे. (एकनाथ महाराज).दोरीचे दोरीरूपाने ज्ञान न होता ते सर्परूपाने अन्यथा ज्ञान (विपरीत ज्ञान) होते. तसेच जगत खरे तर नाही. पण ब्रह्मस्वरूप अधिष्ठानावर जगात कल्पना भासत असते व ते सत्य रूपाने भासत असते. कल्पनेला सत्यत्व दिले की, दु:ख होणारच. कासया सत्य मनिला संसार का हे केले चार माझे माझे. जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज म्हणतात, हे जीवा तू संसार का सत्य मानला ? माझे माझे का म्हणालास ? याला कारण फक्त अज्ञान आहे. अरे तुज्या जीवनात किती स्थित्यंतरे झाली हे तुला तरी कळले का ?बालपण गेले नेणता, तरुणपणी विषयव्यथा, वृद्धपाणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म धरी. संत सांगतात की हे जीवा तुझे बालपण अज्ञानातच गेले व तरुणपणी विषयासक्ती तुला जडली व तू त्यातच आसक्त झालास. माउली म्हणतात, विषयाचे समसुख बेगाडाची बाहुली. अभ्राची साऊली जाईल रया. या विषयाचे सुख हे भासमान असते. ते प्राप्त करताना दु:ख, प्राप्त जरी झाले तरी रक्षणाचे दु:ख, व नष्ट झाले तर आणखी दु:ख.भर्तुहरी म्हणतोह्यभोगा न भुक्ता वयमेव भुक्ता: तपो न तप्तं वयमेव तप्ता: ।कालो न यातो वयमेव याता:, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा:आम्ही भोग भोगीत नाही तर भोगच आम्हाला भोगतो. आपल्याला वाटते की, आपण गुलाबजाम खातो पण तोच गुलाबजाम मात्र आपल्याला भोगीत असतो. तो आपली शुगर वाढवतो व मधुमेहाचा रोगी बनवतो. असेच पंचविषयातील भोग आपण भोगीत नसून ते भोगच आपल्याला भोगीत असतात. तापच आपणास तप्त करीत असतो. काळ आपल्याला खात असतो, हे लक्षातच येत नाही. आपली तृष्णा जीर्ण होत नाही, आपण जीर्ण होतो.आचार्य आपणास हे अंतिम सत्य सांगतात, की तू वृद्धापकाळापर्यंत आलास पण तुला तुझे खरे हित अजून कळले नाही. विचारहीन माणसाच्या जीवनात साधारण क्रीडा, भोगासक्ती आणि दु:ख या तीन मयार्दा आहेत. निसर्गत: कोणीही मनुष्य, प्राणी कालप्रवाहाच्या विरुध्द जावू शकत नाही. पण तो त्यावेळी सावध मात्र होऊ शकतो. जीवनाच्या संध्याकाळी म्हणजेच म्हतारपणी तरी सावध व्हावे. ज्ञानेंद्रिये ही स्वभावात: बर्हिर्मुख आहेत. म्हणूनच शम, दम साधून परब्रह्मस्वरूपाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. इंद्रियांना अंतर्मुख करून जीवब्रह्मैक्य साधून घेऊन कृतार्थ व्हावे यातच खरे हित आहे.-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिलेगुरुकुल भागावाताश्रम, चिचोंडी(पाटील),जि. अहमदनगर, मोब. ९४२२२२०६०३ 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक