शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

भाऊसाहेब बेपत्ता, ‘डमी’च्या हाती सत्ता

By admin | Updated: July 3, 2014 00:59 IST

अहमदनगर : 'सरकारी काम सहा महिने थांब' या म्हणीचा प्रत्यय बुधवारी जिल्हाभरातील तलाठी कार्यालयावर आला.

अहमदनगर : 'सरकारी काम सहा महिने थांब' या म्हणीचा प्रत्यय बुधवारी जिल्हाभरातील तलाठी कार्यालयावर आला. मंत्रालयातील काम लवकर होईल पण तलाठी कार्यालयातील काम होईलच याची शाश्वती देता येणार नाही. बुधवारी 'टीम लोकमत' ने जिल्ह्यातील ५८३ तलाठी सज्जांपैकी ९० सज्जांवर एकाच वेळी भेट देऊन पाहणी केली. यातून पुढे आलेले वास्तव धक्कादायक आहे. तलाठी कार्यालयात हजर असतील या अपेक्षेने हातात कागदाचा पुडका घेऊन अर्धशिक्षित शेतकरी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवून दमतात तरी देखील तलाठ्यांना घाम फुटत नाही. प्रत्येक तलाठ्याने एक डमी सजावर ठेवलेला आहे. तलाठी कार्यालयाचे काम एका हेलपाट्यात झाले असे म्हणणारा एकही व्यक्ती शोधूनही सापडला नाही. याचा अनुभव बुधवारी स्टींग आॅपरेशन मुळे निदर्शनास आला. एकाच वेळी जिल्ह्यातील तलाठी सजांवर जाऊन तलाठी कार्यालयाच्या 'कारभाराची' पाहणी केली. यातून पुढे आलेले हे वास्तव. (टीम लोकमत, अहमदनगर)नगर तालुक्यातील ४ तलाठी कार्यालयांना भेट दिली असता तेथील कारभाराने शेतकरी वैतागल्याचे दिसून आले. त्याचा हा वृत्तांत...नगर तालुका : तलाठी कार्यालयगाव- चास- वेळ-१०-३०चासमधील तलाठी कार्यालयाला कुलूप होते. चौकशी केली असता तलाठी भाऊसाहेबांकडे चास, सोनेवाडी, भोयरे पठार, भोयरे खुर्द या गावांचा ‘चार्ज’ आहे. त्यांनी आपला एक ‘असिस्टंट’ ही नेमला आहे. पण आज तोही भाऊसाहेबांबरोबर ‘बाहेर’ गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.गाव : खडकी, वेळ- ११खडकीच्या तलाठी भाऊसाहेबांकडे खडकी, खंडाळा, बाबुर्डी बेंद ही तीन गावे आहेत. भाऊसाहेबांना जास्त काम असल्याने त्यांनी कुणाची ‘गैरसोय’ नको किंवा हेलपाटा नको म्हणून चक्क कोऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यावर सह्या करून ठेवल्या होत्या. ‘असिस्टंट’ साहेब प्रत्येकाकडून १० रुपये घेऊन दाखला देत होता.गाव : वाळकी, वेळ- ११-५०तलाठी कार्यालयाजवळ गेलो तर त्याला टाळे. चौकशी केली तर समजले तलाठी साहेब येतच नाहीत. उताऱ्यांची संगणकीकृत सोय नाही. झेरॉक्स दाखला लागणाऱ्यालाच आणायला सांगतात. त्याचे ३० रुपये घेतात. गावकरी म्हणाले, आमच्या भाऊसाहेबांकडे घड्याळच नसल्याने त्यांना वेळेचे बंधन नाही. येथे पूर्ण वेळ तलाठी नेमावा अशी मागणी प्रकाश बोठे व रावसाहेब बोठे यांनी केली.अरणगाव- बाबुर्डी घुमट, वेळ- १२-१५ ते १२-३०दोन्हीही गावाला एकच तलाठी. पण दोन्हीही तलाठी कार्यालय बंद. बाहेर तलाठी येण्याचे वार लिहिलेले होते. आज बाबुर्डीचा वार म्हणून बाबुर्डी गाठली. तर कळाले भाऊसाहेब येथे येतच नसतात. आम्ही विचारले वार तर लिहिलेले आहेत? गावकरी म्हणाले वार फक्त नावापुरते आहे. वारांमुळे तर सगळा घोटाळा चालू आहे.