शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

सावित्रीबाई-महात्मा फुलेंना मरणोत्तर भारतरत्न द्यावा; काँग्रेसची मागणी

By साहेबराव नरसाळे | Updated: April 11, 2023 16:57 IST

भाजपने देखील आपले सरकार नसताना ही मागणी केलेली आहे. आता तर केंद्रात त्यांचे सरकार आहे.

अहमदनगर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण क्षेत्रात मुलभूत पायाभरणी करण्याचे काम  महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या दांपत्याने केले. महात्मा फुले हे थोर समाज सुधारक होते. फुले दांपत्याला केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करावे, अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली. 

महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत जयंतीनिमित्त काँग्रेसच्या कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माळीवाडा वेस येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी ते बोलत होते. काळे म्हणाले, फुले दांपत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होत आहे. भाजपने देखील आपले सरकार नसताना ही मागणी केलेली आहे. आता तर केंद्रात त्यांचे सरकार आहे. केवळ राजकीय दृष्ट्या या विषयाकडे न पाहता फुले दांपत्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्राने हा पुरस्कार या दांपत्याला जाहीर केला पाहिजे. 

ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांचा या महाराष्ट्रात जन्म झाला ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. महात्मा फुले हे ओबीसी समाजाबरोबरच सर्व समाज घटकांसाठी आदर्श आहेत. त्यांना समाजाच्या सर्व घटकांमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या विचारांची जपणूक करणे आणि तरुण पिढीला यातून दिशा दाखविणे हे आपले कर्तव्य आहे. 

यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, शैलाताई लांडे, जिल्हा सरचिटणीस मनसुखभाई संचेती, रतिलाल भंडारी, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, युवक सरचिटणीस आकाश आल्हाट, अभिनय गायकवाड इंजिनिअर सुजित क्षेत्रे, तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, युवक शहर संघटक विनोद दिवटे, युवक शहर जिल्हा सरचिटणीस सुरज गुंजाळ, सुहास त्रिभुवन, रामभाऊ धोत्रे, ब्लॉक काँग्रेस कमिटी सदस्य हनीफ मोहम्मद जहागीरदार, आप्पासाहेब लांडगे, सागर दळवी आदी उपस्थित होते.