शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदरा धरण उपेक्षेच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:09 IST

राजूर : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या आणि बांधकाम पूर्ण होऊन ९४ वर्षे पूर्ण झालेले भंडारदरा धरण देखभाल दुरुस्तीअभावी ...

राजूर : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या आणि बांधकाम पूर्ण होऊन ९४ वर्षे पूर्ण झालेले भंडारदरा धरण देखभाल दुरुस्तीअभावी अद्यापही उपेक्षेच्या गर्तेत आहे. १९१० मध्ये भंडारदरा धरणाच्या कामास प्रारंभ झाला आणि १९२६ मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले.

२६५.७० फूट उंचीच्या भंडारदरा धरणास ५० फूट, १०० फूट, १५० फूट आणि २०० फूट पातळीवर मोऱ्या आहेत. प्रत्येक ठिकाणी ३ फूट व्यासाच्या दोन अशा एकूण आठ मोऱ्या आहेत. या मोऱ्यावर सलुईस आणि निडल अशा दोन प्रकारच्या झडपा बसविण्यात आल्या. पाणी सोडण्याची या यंत्रोस ९० वर्षे झाली. यातील ५० फुटांवरील एक आणि १०० फुटावरील एका मोरीवर यांत्रिक पद्धतीचे व्हॉल्व्ह बदलण्यात आले आहेत. बाकी सहा मोऱ्यांवर जुनाट यंत्रणा उभी आहे. ही सर्व यंत्रणा मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. घर्षणामुळे या सहा मोऱ्यांच्या झडपांचे आटे गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे मोऱ्यांची दारे नीट बंद होत नाहीत आणि त्यातून पाणी गळती सुरू असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या धरणाच्या गेटमधून पाणी सोडण्यासाठी अध्यापही मनुष्यबळ वापरले जात आहे. त्यामुळे एखाद्या वेळी कुठलीही अनुचित घटना घडू शकते.

यांत्रिकीकरणाच्या युगात इतर काही धरणांची पाणी पातळी मोजण्यासाठी सेन्सरचा वापर केला जात आहे. याआधारे पाणी पातळी, हवेचा वेग, बाष्पीभवन आदी मोजले जाते. मात्र, जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, राहुरी आणि नेवासा या सहा तालुक्यांतील सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्राला ओलिताखाली आणणाऱ्या या धरणाची पाणी पातळी आजही गेज पट्टीच्या साहाय्याने मोजली जात आहे. १९६९ मध्ये भूकंपाच्या धक्क्यानंतर धरणास तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी धरणाच्या भिंतीत मोठ्या प्रमाणावर बदल करत धरणाचे मजबुतीकरण करण्यात आले होते. मागील काही वर्षांपूर्वी येथे भूकंप मापन यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, त्यावेळी या यंत्रणेतील सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यापासून भूकंप मापन यंत्रणा कार्यान्वित नाही.

केंद्रीय जलआयोगाच्या समितीने मागील वर्षी या धरणाची पाहणी केली. यानंतर धरण सुरक्षा समितीने धरणाची पाहणी करून तसा अहवाल पाठविला. याबरोबरच येथील पाटबंधारे विभागानेही धरणाच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात अनेक वेळा प्रस्तावही पाठविले असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

................

प्रोफाइल वॉल बांधण्याची मागणीही प्रलंबित

जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा परिसरातील रस्त्यांची तसेच पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या धरणाखालील बागेची दुरवस्था पाहण्यास मिळत आहे. येथील वर्ग एकच्या बंगल्याचे दुरुस्तीचेही काम अर्धवट अवस्थेत आहे. देखभाल दुरुस्तीचेही प्रस्ताव पाठवले असले तरी मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने धरणाचे मजबुतीकरण उपेक्षेच्या गर्तेत कायम आहे. धरण परिसरातील ज्या गावांमध्ये धो धो पाऊस कोसळून धरण भरते त्याच गावांना उन्हाळ्यात धरणातील पाणी खोलवर तसेच दूरवर जात असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते. ही समस्या सोडवण्यासाठी या धरणात बुडीत बंधारे बांधण्याची आणि प्रवरा पात्रात प्रोफाइल वॉल बांधण्याची जुनी मागणी प्रलंबित आहे.