शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

भंडारदरा धरण उपेक्षेच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:09 IST

राजूर : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या आणि बांधकाम पूर्ण होऊन ९४ वर्षे पूर्ण झालेले भंडारदरा धरण देखभाल दुरुस्तीअभावी ...

राजूर : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या आणि बांधकाम पूर्ण होऊन ९४ वर्षे पूर्ण झालेले भंडारदरा धरण देखभाल दुरुस्तीअभावी अद्यापही उपेक्षेच्या गर्तेत आहे. १९१० मध्ये भंडारदरा धरणाच्या कामास प्रारंभ झाला आणि १९२६ मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले.

२६५.७० फूट उंचीच्या भंडारदरा धरणास ५० फूट, १०० फूट, १५० फूट आणि २०० फूट पातळीवर मोऱ्या आहेत. प्रत्येक ठिकाणी ३ फूट व्यासाच्या दोन अशा एकूण आठ मोऱ्या आहेत. या मोऱ्यावर सलुईस आणि निडल अशा दोन प्रकारच्या झडपा बसविण्यात आल्या. पाणी सोडण्याची या यंत्रोस ९० वर्षे झाली. यातील ५० फुटांवरील एक आणि १०० फुटावरील एका मोरीवर यांत्रिक पद्धतीचे व्हॉल्व्ह बदलण्यात आले आहेत. बाकी सहा मोऱ्यांवर जुनाट यंत्रणा उभी आहे. ही सर्व यंत्रणा मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. घर्षणामुळे या सहा मोऱ्यांच्या झडपांचे आटे गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे मोऱ्यांची दारे नीट बंद होत नाहीत आणि त्यातून पाणी गळती सुरू असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या धरणाच्या गेटमधून पाणी सोडण्यासाठी अध्यापही मनुष्यबळ वापरले जात आहे. त्यामुळे एखाद्या वेळी कुठलीही अनुचित घटना घडू शकते.

यांत्रिकीकरणाच्या युगात इतर काही धरणांची पाणी पातळी मोजण्यासाठी सेन्सरचा वापर केला जात आहे. याआधारे पाणी पातळी, हवेचा वेग, बाष्पीभवन आदी मोजले जाते. मात्र, जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, राहुरी आणि नेवासा या सहा तालुक्यांतील सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्राला ओलिताखाली आणणाऱ्या या धरणाची पाणी पातळी आजही गेज पट्टीच्या साहाय्याने मोजली जात आहे. १९६९ मध्ये भूकंपाच्या धक्क्यानंतर धरणास तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी धरणाच्या भिंतीत मोठ्या प्रमाणावर बदल करत धरणाचे मजबुतीकरण करण्यात आले होते. मागील काही वर्षांपूर्वी येथे भूकंप मापन यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, त्यावेळी या यंत्रणेतील सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यापासून भूकंप मापन यंत्रणा कार्यान्वित नाही.

केंद्रीय जलआयोगाच्या समितीने मागील वर्षी या धरणाची पाहणी केली. यानंतर धरण सुरक्षा समितीने धरणाची पाहणी करून तसा अहवाल पाठविला. याबरोबरच येथील पाटबंधारे विभागानेही धरणाच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात अनेक वेळा प्रस्तावही पाठविले असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

................

प्रोफाइल वॉल बांधण्याची मागणीही प्रलंबित

जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा परिसरातील रस्त्यांची तसेच पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या धरणाखालील बागेची दुरवस्था पाहण्यास मिळत आहे. येथील वर्ग एकच्या बंगल्याचे दुरुस्तीचेही काम अर्धवट अवस्थेत आहे. देखभाल दुरुस्तीचेही प्रस्ताव पाठवले असले तरी मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने धरणाचे मजबुतीकरण उपेक्षेच्या गर्तेत कायम आहे. धरण परिसरातील ज्या गावांमध्ये धो धो पाऊस कोसळून धरण भरते त्याच गावांना उन्हाळ्यात धरणातील पाणी खोलवर तसेच दूरवर जात असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते. ही समस्या सोडवण्यासाठी या धरणात बुडीत बंधारे बांधण्याची आणि प्रवरा पात्रात प्रोफाइल वॉल बांधण्याची जुनी मागणी प्रलंबित आहे.