शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

भंडारदरा ७२ तर मुळा ५० टक्के भरले

By admin | Updated: September 20, 2015 00:50 IST

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परतीच्या मान्सूनचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीसाठ्यांत बऱ्यापैकी वाढ झाली आहे़

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परतीच्या मान्सूनचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीसाठ्यांत बऱ्यापैकी वाढ झाली आहे़ शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार राहिल्याने भंडारदरा ७२़५४ तर मुळा धरण ५४़६३ टक्के भरले आहे़ जिल्ह्यातील क्षेत्राला लाभ होणाऱ्या इतर धरणांतही नव्याने पाण्याची आवक झाली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७०. ३९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कमी -अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यात पाऊस होत असल्याने दुष्काळाची धग काही प्रमाणात कमी झाली आहे़ काही दिवसांपुरता पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे़ शुक्रवारी तर अकोले, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर संगमनेर या तालुक्यांत सर्वाधिक पाऊस झाला़ या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन जनावरेही मृत्युमुखी पडली़ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणांमध्ये नव्याने पाण्याची आवक वाढली आहे़ पूर्वा नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाला सुरुवात होऊन सलगता राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ गेल्या तीन महिन्यात झाला नाही, एवढा पाऊस गेल्या आठ दिवसांत झाल्याची नोंद आहे़ हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणांच्या पाणीसाठ्यांत आणखी वाढ होणार आहे़ मुळा धरणात २४ तासात ५०० दलघफू पाण्याची आवक झाली़ धरणात १४४५० दलघफू पाणी साठा झाला आहे़ दारणा ६९ टक्के तर गंगापूर धरण ६६ टक्के पाणीसाठाकोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने उघडीप दिली आहे़ त्यामुळे गोदावरीत नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला आहे़ शुक्रवारी रात्री २० हजार क्युसेकपर्यंत असलेला विसर्ग शनिवारी दुपारी बारा वाजता १३ हजार क्युसेक केलेला विसर्ग सायंकाळी १६१४ क्युसेकपर्यंत घटविला़ त्यामुळे दुथडी भरू न वाहणाऱ्या गोदावरीचे पाणी कमी झाले़ कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर भागाला वरदान ठरणाऱ्या दारणा धरणात ६९़२२, तर गंगापूर धरणात ६६ टक्के पाणी साठा झाला आहे़कोपरगाव, रवंदे परिसरात अतिवृष्टीकोपरगाव व रवंदे महसुली मंडळात शुक्रवारी अतिवृष्टी झाली़ खडकी व रवंदे येथे चार घरांची पडझड झाली़ शनिवारी पावसाने उघडीप दिली़ कोपरगाव महसुली मंडळात ७० मि़ मी़, पोहेगाव मंडळात ६२, सुरेगाव मंडळात ५०, दहेगाव बोलका मंडळात ६१ व रवंदे महसुली मंडळात ९३ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ खडकी परिसरात दोन व रवंदे गावात दोन घरांची पडझड झाली़ या ठिकाणी ७० ते १५ हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकते, अशी माहिती तहसीलदार इंदिरा चौधरी यांनी दिली़