शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

भगवानगडावरील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 17:48 IST

पाथर्डी (जि. अहमदनगर) : सुमारे पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दरवर्षीच्या तुलनेत शनिवारी भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी दिवसभर सोयीच्या वेळेनुसार भगवानबाबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. ‘भगवानबाबा की जय’ अशा घोषणांनी गड दुमदुमवा. गडावर जमावबंदी लागू असल्याने भक्त समाधिस्थळाचे दर्शन घेऊन लगेच परतत होते.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : सुमारे पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दरवर्षीच्या तुलनेत शनिवारी भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी दिवसभर सोयीच्या वेळेनुसार भगवानबाबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. ‘भगवानबाबा की जय’ अशा घोषणांनी गड दुमदुमवा. गडावर जमावबंदी लागू असल्याने भक्त समाधिस्थळाचे दर्शन घेऊन लगेच परतत होते.भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दसºयाच्या दिवशी राजकीय नेत्यांच्या भाषणबंदीचा ठराव सलग दुसºया वर्षी केल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे स्थळ बदलले. भगवानबाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे मेळावा घेतल्याने गडावर गर्दी होणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. महंत डॉ. नामदेव शास्त्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात मेळाव्यावरून झालेल्या वादामुळे पोलिसांनी भगवानगडावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. गडावर जमावबंदीचा आदेश लागू होता. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी व्हॅन उभ्या केल्या होत्या. तसेच प्रत्येक ठिकाणी पोलीसांची वेगवेगळी पथके गडावर होती. शनिवारी सकाळी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या हस्ते भगवानबाबांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला. सकाळी गडावर शुकशुकाट होता, परंतु सकाळी अकरानंतर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. दुपारी भक्तांनी गटागटाने येत दर्शन घेतले. दर्शनानंतर भक्त गडावर थांबत नसल्यामुळे गर्दी दिसली नाही.-------------भगवानगडावर होणाºया मेळाव्याच्या मुद्यावरून झालेल्या वादाची पार्श्वभूमी पाहाता पोलिसांनी गडाच्या पायथ्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहने अडविली. त्यामुळे गडावर भाविकांना पायी जावे लागले. गडावर जाणाºया तिन्ही रस्त्यांवरून भाविक येताना दिसत होते. प्रत्येक पॉइंटवर पोलीस बंदोबस्त तैनात होता. सायंकाळच्या सुमारास भगवानगडावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री गुरुमंत्राचा कार्यक्रम पार पडला. गेल्या २५ वर्षांपासून दसºयाच्या दिवशी भगवानगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी असायची, परंतु आज मात्र तुलनेने गर्दी कमी होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे गडाला छावणीचे स्वरूप आले होते.---आमची काही दुकानदारी नाही. जो भगवानबाबांचा भक्त आहे, तो गडावर दर्शनासाठी येत आहे. सगळे भक्त एकत्रित नसल्यामुळे गर्दी दिसत नसली, तरी भक्त मोठ्या संख्येने गडावर येत आहेत. -डॉ. नामदेव शास्त्री, महंत भगवानगड---------