शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भगवानगडावरील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 17:48 IST

पाथर्डी (जि. अहमदनगर) : सुमारे पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दरवर्षीच्या तुलनेत शनिवारी भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी दिवसभर सोयीच्या वेळेनुसार भगवानबाबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. ‘भगवानबाबा की जय’ अशा घोषणांनी गड दुमदुमवा. गडावर जमावबंदी लागू असल्याने भक्त समाधिस्थळाचे दर्शन घेऊन लगेच परतत होते.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : सुमारे पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दरवर्षीच्या तुलनेत शनिवारी भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी दिवसभर सोयीच्या वेळेनुसार भगवानबाबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. ‘भगवानबाबा की जय’ अशा घोषणांनी गड दुमदुमवा. गडावर जमावबंदी लागू असल्याने भक्त समाधिस्थळाचे दर्शन घेऊन लगेच परतत होते.भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दसºयाच्या दिवशी राजकीय नेत्यांच्या भाषणबंदीचा ठराव सलग दुसºया वर्षी केल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे स्थळ बदलले. भगवानबाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे मेळावा घेतल्याने गडावर गर्दी होणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. महंत डॉ. नामदेव शास्त्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात मेळाव्यावरून झालेल्या वादामुळे पोलिसांनी भगवानगडावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. गडावर जमावबंदीचा आदेश लागू होता. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी व्हॅन उभ्या केल्या होत्या. तसेच प्रत्येक ठिकाणी पोलीसांची वेगवेगळी पथके गडावर होती. शनिवारी सकाळी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या हस्ते भगवानबाबांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला. सकाळी गडावर शुकशुकाट होता, परंतु सकाळी अकरानंतर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. दुपारी भक्तांनी गटागटाने येत दर्शन घेतले. दर्शनानंतर भक्त गडावर थांबत नसल्यामुळे गर्दी दिसली नाही.-------------भगवानगडावर होणाºया मेळाव्याच्या मुद्यावरून झालेल्या वादाची पार्श्वभूमी पाहाता पोलिसांनी गडाच्या पायथ्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहने अडविली. त्यामुळे गडावर भाविकांना पायी जावे लागले. गडावर जाणाºया तिन्ही रस्त्यांवरून भाविक येताना दिसत होते. प्रत्येक पॉइंटवर पोलीस बंदोबस्त तैनात होता. सायंकाळच्या सुमारास भगवानगडावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री गुरुमंत्राचा कार्यक्रम पार पडला. गेल्या २५ वर्षांपासून दसºयाच्या दिवशी भगवानगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी असायची, परंतु आज मात्र तुलनेने गर्दी कमी होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे गडाला छावणीचे स्वरूप आले होते.---आमची काही दुकानदारी नाही. जो भगवानबाबांचा भक्त आहे, तो गडावर दर्शनासाठी येत आहे. सगळे भक्त एकत्रित नसल्यामुळे गर्दी दिसत नसली, तरी भक्त मोठ्या संख्येने गडावर येत आहेत. -डॉ. नामदेव शास्त्री, महंत भगवानगड---------