शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भगवानगडावरील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 17:48 IST

पाथर्डी (जि. अहमदनगर) : सुमारे पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दरवर्षीच्या तुलनेत शनिवारी भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी दिवसभर सोयीच्या वेळेनुसार भगवानबाबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. ‘भगवानबाबा की जय’ अशा घोषणांनी गड दुमदुमवा. गडावर जमावबंदी लागू असल्याने भक्त समाधिस्थळाचे दर्शन घेऊन लगेच परतत होते.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : सुमारे पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दरवर्षीच्या तुलनेत शनिवारी भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी दिवसभर सोयीच्या वेळेनुसार भगवानबाबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. ‘भगवानबाबा की जय’ अशा घोषणांनी गड दुमदुमवा. गडावर जमावबंदी लागू असल्याने भक्त समाधिस्थळाचे दर्शन घेऊन लगेच परतत होते.भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दसºयाच्या दिवशी राजकीय नेत्यांच्या भाषणबंदीचा ठराव सलग दुसºया वर्षी केल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे स्थळ बदलले. भगवानबाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे मेळावा घेतल्याने गडावर गर्दी होणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. महंत डॉ. नामदेव शास्त्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात मेळाव्यावरून झालेल्या वादामुळे पोलिसांनी भगवानगडावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. गडावर जमावबंदीचा आदेश लागू होता. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी व्हॅन उभ्या केल्या होत्या. तसेच प्रत्येक ठिकाणी पोलीसांची वेगवेगळी पथके गडावर होती. शनिवारी सकाळी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या हस्ते भगवानबाबांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला. सकाळी गडावर शुकशुकाट होता, परंतु सकाळी अकरानंतर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. दुपारी भक्तांनी गटागटाने येत दर्शन घेतले. दर्शनानंतर भक्त गडावर थांबत नसल्यामुळे गर्दी दिसली नाही.-------------भगवानगडावर होणाºया मेळाव्याच्या मुद्यावरून झालेल्या वादाची पार्श्वभूमी पाहाता पोलिसांनी गडाच्या पायथ्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहने अडविली. त्यामुळे गडावर भाविकांना पायी जावे लागले. गडावर जाणाºया तिन्ही रस्त्यांवरून भाविक येताना दिसत होते. प्रत्येक पॉइंटवर पोलीस बंदोबस्त तैनात होता. सायंकाळच्या सुमारास भगवानगडावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री गुरुमंत्राचा कार्यक्रम पार पडला. गेल्या २५ वर्षांपासून दसºयाच्या दिवशी भगवानगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी असायची, परंतु आज मात्र तुलनेने गर्दी कमी होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे गडाला छावणीचे स्वरूप आले होते.---आमची काही दुकानदारी नाही. जो भगवानबाबांचा भक्त आहे, तो गडावर दर्शनासाठी येत आहे. सगळे भक्त एकत्रित नसल्यामुळे गर्दी दिसत नसली, तरी भक्त मोठ्या संख्येने गडावर येत आहेत. -डॉ. नामदेव शास्त्री, महंत भगवानगड---------