शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

संगमनेरच जिल्ह्याचे ठिकाण व्हावे

By admin | Updated: July 31, 2016 23:50 IST

संगमनेर : जिल्हा विभाजनाबाबत राज्य शासनाकडून सुतोवाच करण्यात आल्यानंतर जिल्हा विभाजनाच्या हालचाली वाढल्या आहेत.

संगमनेर : जिल्हा विभाजनाबाबत राज्य शासनाकडून सुतोवाच करण्यात आल्यानंतर जिल्हा विभाजनाच्या हालचाली वाढल्या आहेत. नवीन जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर हेच व्हावे यासाठी संगमनेर जिल्हा कृती समितीने एका अल्बमचे रविवारी प्रकाशन केले. जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी संगमनेरात असल्याचे या अल्बममधून प्रभावीपणे मांडण्यात आले असून हा अल्बम मुख्यमंत्री, महसूलमंत्री व पालकमंत्री यांना लवकरच देण्यात येणार आहे.अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे विभाजन करून नवीन जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर येथे करावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. मात्र संगमनेर की श्रीरामपूर या वादात जिल्हा विभाजनाचा प्रश्न रेंगाळत पडला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. राज्य सरकार जिल्हा विभाजनाला अनुकूल असल्याने जिल्हा विभाजनाच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत.जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबी संगमनेरात उपलब्ध असल्याने संगमनेर येथेच जिल्ह्याचे मुख्यालय करावे, अशी मागणी संगमनेर जिल्हा कृती समितीने वेळोवेळी केली आहे. यासाठी राज्य सरकारकडे करावा लागणारा पाठपुरावा मात्र केला जात नव्हता. भारतीय जनता पक्षाचे नेते राजेश चौधरी व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी पाठपुरावा करून एक अल्बम बनविला आहे.संगमनेरच जिल्हा का झाला पाहिजे हे पटवून देण्यासाठी ५१ मुद्द्यांचा उल्लेख या अल्बममध्ये करण्यात आला आहे. नवीन जिल्ह्यासाठी लागणारी जागा, विविध कार्यालयासाठी लागणाऱ्या इमारती, पाणी पुरवठा, संगमनेरपासून जवळच्या तालुक्यांचे अंतर आदी बाबींचा समावेश या अल्बममध्ये आहे. अल्बम प्रकाशनवेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अमर तारी, भाजपचे राजेश चौधरी, संजय नाकील, किशोर कालडा, उमर बेग, शौकत जहागीरदार, प्रकाश कलंत्री, सीताराम मोहरीकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)