शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जागरुक राहा : जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 15:10 IST

आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. द्विवेदी यांनी महिलांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी, महिला संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी, त्याअनुषंगाने दाखल असलेल्या गुन्ह्यांची सद्यस्थितीची माहिती घेतली. अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक आदींनी अशा प्रकाराबाबत अधिक जागरुक राहण्याची गरज आहे. महिला व बालविकास विभागाने त्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य घेऊन व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यात अठरा वर्षे वयाखालील मुलामुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे याबाबत शालेय पातळीवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.जिल्ह्यात विविध ठिकाणी आस्थापनांवर बालकामगार असतील तर अशा आस्थांपनांवर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. या बालकांच्या पुनर्वसनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी महिला व बालविकास विभागाला दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्षय शिंदे, महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर व गोविंद दाणेज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय