शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जागरुक राहा : जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 15:10 IST

आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. द्विवेदी यांनी महिलांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी, महिला संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी, त्याअनुषंगाने दाखल असलेल्या गुन्ह्यांची सद्यस्थितीची माहिती घेतली. अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक आदींनी अशा प्रकाराबाबत अधिक जागरुक राहण्याची गरज आहे. महिला व बालविकास विभागाने त्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य घेऊन व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यात अठरा वर्षे वयाखालील मुलामुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे याबाबत शालेय पातळीवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.जिल्ह्यात विविध ठिकाणी आस्थापनांवर बालकामगार असतील तर अशा आस्थांपनांवर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. या बालकांच्या पुनर्वसनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी महिला व बालविकास विभागाला दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्षय शिंदे, महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर व गोविंद दाणेज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय