शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जागरुक राहा : जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 15:10 IST

आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : आपला जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहासारख्या घटना घडणार नाहीत, यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्था संघटनांनी जागरुक राहावे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. द्विवेदी यांनी महिलांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी, महिला संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी, त्याअनुषंगाने दाखल असलेल्या गुन्ह्यांची सद्यस्थितीची माहिती घेतली. अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या प्रगत जिल्हा मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक आदींनी अशा प्रकाराबाबत अधिक जागरुक राहण्याची गरज आहे. महिला व बालविकास विभागाने त्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य घेऊन व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यात अठरा वर्षे वयाखालील मुलामुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे याबाबत शालेय पातळीवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.जिल्ह्यात विविध ठिकाणी आस्थापनांवर बालकामगार असतील तर अशा आस्थांपनांवर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. या बालकांच्या पुनर्वसनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी महिला व बालविकास विभागाला दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्षय शिंदे, महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर व गोविंद दाणेज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय