शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

दोन गावांमधील गौराईची लढाई बरोबरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 19:08 IST

श्रावणी पोळ्याच्या दुस-या दिवशी रंगणारी शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई आज बरोबरीत सुटली. मात्र महिलांची असणा-या या लढाईत पुरूषांची यावेळी मोठी लुडबुड वाढल्याने पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ आली.

ठळक मुद्दे गौराईचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पूजन महिलांच्या लढाईत पुरूषांची लुडबुडपोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ तरूणांच्या वादाने लढाईला गालबोट

अहमदनगर : श्रावणी पोळ्याच्या दुस-या दिवशी रंगणारी शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई आज बरोबरीत सुटली. मात्र महिलांची असणा-या या लढाईत पुरूषांची यावेळी मोठी लुडबुड वाढल्याने पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ आली.

आज दोन्ही गावातील महिलांनी आणलेल्या गौराईचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर जवळपास अर्धा तास लढाई चालली. पण यात पुरुषांचा हस्तक्षेप इतका वाढला की पोलिसांना यात त्यांना मागे ओढावे लागले. पोलिस बंदोबस्त नसता तर राडा होण्याची चिन्हे दिसत होती. काही तरूणांच्या आपसातील वादाचे ही या लढाईला गालबोट लागले. शेवटी कर्डिले यांच्या हस्ते लढाई बरोबरीत सोडवण्यात आली. पुरुष हस्तक्षेपामुळे लढाई करणा-या महिलांचा हिरमोड झाला. लढाई पाहण्यासाठी आलेल्या महिलांना पुरूषांच्या गदीर्मुळे काहीच दिसत नव्हते.

नगर तालुक्यातील शेंडी व पोखर्डी हि शेजारीशेजारी गावे. या गावांच्या मधून सीना नदी वाहते. नदी हीच या दोन गावांची सीमा आहे. शेंडी-पोखर्डी मधील महिलांमध्ये भांडण, शिव्यांची लाखोली, एकमेकींना खेचाखेची, ओढाओढी अशा प्रकारची एक वैशिट्यपूर्ण परंपरा या दोन गावांनी अनेक वर्षांपासून जतन केली आहे. ती लढाई नगरची आता खास ओळख बनत आहे. ही लढाई म्हणजे दोन गावातील महिलांची स्पर्धा असली तरी त्यात द्वेष भावना नसते. दरवर्षी श्रावणी पोळ्याच्या दुस-या दिवशी या दोन गावांमध्ये गौराईची लढाई होत असते.

गौराई म्हणजे पार्वती व शंकराने आपल्या योग सामर्थ्याच्या बळावर दोन गावात द्वापर युगात शेवटी लावलेली लढाई आहे. या दिवशी दोन्ही गावातील महिला सूर्यास्ताच्या वेळेला गौराई देवीची पूजा करून सवाद्य मिरवणुकीने नदीकाठी जमतात. तेथे गौराईचे विसर्जन करण्यात येते. मग सुरु होते लढाई. लढाई सुरु होण्यापूर्वी महिला दोन्ही गावांच्या पाटलांच्या नावाने हातवारे करून  शिव्याशाप देतात. एकमेकींची उणीदुणी काढतात. बळकट बांध्याच्या महिला पुढे होतात. एकमेकींच्या कमरेला घट्ट पकडून नदीच्या मध्यभागी जमतात. दोन्ही गावातील महिला एकमेकींच्या समोरासमोर उभ्या राहून समोरच्या गावातील महिलेला आपल्या गटाकडे खेचण्यासाठी ओढाओढी करतात. प्रतिस्पर्धी गटातील एखादी महिला आपल्या गटात खेचण्यात जो गट यशस्वी होईल त्या गटातर्फे त्या महिलेची माहेरवाशीण म्हणून गावातून मिरवणुक काढली जाते. दुस-या दिवशी तीला साडी-चोळी देऊन तिच्या गावात परत पाठवले जाते.

पुरुषांचा हस्तक्षेप आणि गालबोट

  • गेल्या काही वर्षांपासून महिलांची असणाऱ्या या लढाईत पुरुषांचा हस्तक्षेप वाढत आहे.महिलांच्या लढाईत पुरुषांचा वाढत जाणारा सहभाग या लढाईत गालबोट लागण्यास कारणीभूत ठरत असल्याचे उदाहरण आहेत.यामुळे या दोन गावादरम्यान अनेकदा वादावादीचे प्रसंग उद्भभवले आहेत.यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असतो .यामुळे या लढाईला गालबोट लागण्याचे प्रसंग घडत आहेत.