शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

फटाके विक्रीवर बंदी; व्यापा-यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 15:10 IST

अहमदनगर : नुकतीच सर्वोच्च न्यायालया ने दिल्लीत फटाकेबंदी केली. त्यानंतर मुंबई तसेच महाराष्ट्रातही फटाके बंदीची आतषबाजी करण्यात आली. या ...

ठळक मुद्देव्यापा-यांची भूमिका :आनंदाच्या क्षणीच फटाका वाजविला जातोआठ दिवसांवर दिवाळी आल्यानंतर ऐनवेळी निर्णय काफटाका व्यवसायातील रोजगाराचा विचार व्हावानिवासी भागात, मध्यवर्ती भागात बंदी आवश्यकसण, उत्सव पारंपरिक आणि पूर्वापार चालत आल्याने बंदी नको.

अहमदनगर : नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाकेबंदी केली. त्यानंतर मुंबई तसेच महाराष्ट्रातही फटाके बंदीची आतषबाजी करण्यात आली. या निर्णयावर व महाराष्ट्र सरकारच्या फटाके बंदीच्या भूमिकेवर व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नगर शहरातील सर्वात मोठे फटाका मार्केट कल्याण रोडवर आहे़ फटाका मार्केटमधील व्यापा-यांनी सरकारच्या भूमिकेबाबत ‘लोकमत’कडे तीव्र नाराजी व्यक्त करीत ऐन दिवाळीत हा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी, किराणा दुकानातून होणा-या फटाके विक्रीला अहमदनगरमधील व्यापारी संघटनेने विरोध दर्शविला असून, प्रशासनाने अशा फटाके विक्रीवर कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. निवासी ठिकाणी फटाके विक्रीवर बंदी घालण्याशी सहमती दर्शविली आहे. मात्र, निवासी ठिकाणापासून दूर असलेल्या फटाके विक्रीवर बंदी घालणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

फटाके वाजल्यापासून नेमका काय त्रास होतोे याचा शोध घ्यावा. फटाक्याच्या ध्वनी प्रदूषणाचे प्रात्यक्षिक घ्यावे. फटाक्यासाठी १२५ डेसिबलची जरी मर्यादा आहे. प्रत्यक्षात ९५ डेसिबलपेक्षा जास्त एकाही फटाक्याचा आवाज येत नाही. त्यामुळे सरसकट बंदी चुकीची आहे. यामुळे व्यापारी वर्ग व ग्राहक यांच्यामध्ये संभम्र निर्माण झाला आहे. सर्वात जास्त प्रदूषण वाहनांमुळे होत आहे. त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. आनंदाच्या क्षणी, सण उत्सवातच फटाके वाजविले जातात. त्यामुळे निर्णय योग्य म्हणता येणार नाही. मोठा व्यवसाय असल्याने अनेकांना या माध्यमातून रोजगारही मिळतो. यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. निवासी भागातील फटाके विक्री बंदीचे आम्ही स्वागतच करतो. मात्र निवासी भाग कोणता याचे स्पष्टीकरण करावे. तसेच शहराच्या मध्यवस्तीत, लोकवस्तीतही बंदी असावी. बेकायदेशीर विक्रीवर प्रशासनाने कारवाई करावी. पारंपरिक सण असल्याने फटाक्यांची विक्री पूर्वापार सुरु आहे. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे.- कैलास गिरवले, अध्यक्ष, अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन

सध्या नोटाबंदी व जीएसटीमुळे मार्केट थंड आहे. फटाके बंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील व्यापारी फटाके खरेदी करत नाहीत. ग्राहकही खरेदी करण्यास उत्सुक नाहीत. भारतीय संस्कृतीचा विचार करुन निर्णय घेणे गरजेचे आहे. पारंपरिक सण, उत्सव साजरा करण्यास विरोध कशासाठी केला जातो हे समजत नाही. फटाक्याव्यतिरिक्त इतर कारणांनी होणाºया प्रदूषणावर शासनाने विचार करण्याची गरज आहे. दिवाळी तोंडावर आल्यानंतर शासन बंदीबाबत संभम्र निर्माण करत आहे. सर्व बाबींचा विचार करुन शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे.- गणेश क्षीरसागर

मी सोनईवरुन फटाके खरेदीला नगरच्या मार्केटमध्ये आलो आहे. मात्र फटाके बंदी नेमकी कुठे काय कशासाठी याबाबत मी संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी खरेदी करणार आहे. माझ्यासारखे ग्रामीण भागातील व्यापारी या निर्णयामुळे धास्तावले आहेत. सण उत्सवाच्या काळात केली जाणारी फटाके बंदी अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने यावर विचार करुनच पुढील पावले उचलणे गरजेचे आहे. सरकारविरुध्द सर्वसामान्य लोक या निर्णयामुळे नाराज आहेत.- प्रकाश घावटे, सोनई ता. नेवासा