शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

खाते वाटपावरून मित्रपक्षात वाद नाहीत-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 14:17 IST

खातेवाटपावरून मित्रपक्षांत कोणताही वाद नाही़. सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. तेव्हा चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले़.

शिर्डी : मंत्र्यांच्या खातेवाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दोन दिवसात त्यासंबधी निर्णय होईल. खातेवाटपावरून मित्रपक्षांत कोणताही वाद नाही. सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. तेव्हा चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मंत्री थोरात यांनी शिर्डी येथे शनिवारी साईसमाधीचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकरी कठीण प्रसंगातून जात असल्याने शेतक-यांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. सरकारमध्ये तीन पक्ष वेगवेगळ्या विचाराचे असले तरी तीनही पक्षांचा राज्य घटनेवर विश्वास आहे़. त्यामुळेच आम्ही तीन्ही पक्ष एकाच विचाराने कारभार करण्यासाठी पुढे जात आहोत. पाच वर्षें सरकार टिकवायचे असल्याने चर्चेतून निर्णय घेण्याची काळजी घेतली जात आहे. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावरच महामंडळे व साईसंस्थान विश्वस्त मंडळांच्या नियुक्तीबाबत निर्णय होणार आहे. राज्य मंत्रीमंडळात आपण कोणत्याही एका विशिष्ट खात्यासाठी अडून बसलेलो नाही. जे मिळेल ते खाते स्वीकारणार आहे. लोकसभा आणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठे नेतेमंडळी पक्ष सोडून गेले. आज त्यांना पक्ष सोडल्याचा पश्चाताप होत आहे. त्यांना पक्षात घेण्याबाबत कोणतीही चर्चा सध्या सुरू नाही. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची जागा घेतलेल्या युवा कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल. गेली पाच वर्षे मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता असतो तर मला आज अधिक फायदा झाला असता, असेही थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliticsराजकारण