शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

खाते वाटपावरून मित्रपक्षात वाद नाहीत-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 14:17 IST

खातेवाटपावरून मित्रपक्षांत कोणताही वाद नाही़. सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. तेव्हा चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले़.

शिर्डी : मंत्र्यांच्या खातेवाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दोन दिवसात त्यासंबधी निर्णय होईल. खातेवाटपावरून मित्रपक्षांत कोणताही वाद नाही. सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. तेव्हा चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मंत्री थोरात यांनी शिर्डी येथे शनिवारी साईसमाधीचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकरी कठीण प्रसंगातून जात असल्याने शेतक-यांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. सरकारमध्ये तीन पक्ष वेगवेगळ्या विचाराचे असले तरी तीनही पक्षांचा राज्य घटनेवर विश्वास आहे़. त्यामुळेच आम्ही तीन्ही पक्ष एकाच विचाराने कारभार करण्यासाठी पुढे जात आहोत. पाच वर्षें सरकार टिकवायचे असल्याने चर्चेतून निर्णय घेण्याची काळजी घेतली जात आहे. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावरच महामंडळे व साईसंस्थान विश्वस्त मंडळांच्या नियुक्तीबाबत निर्णय होणार आहे. राज्य मंत्रीमंडळात आपण कोणत्याही एका विशिष्ट खात्यासाठी अडून बसलेलो नाही. जे मिळेल ते खाते स्वीकारणार आहे. लोकसभा आणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठे नेतेमंडळी पक्ष सोडून गेले. आज त्यांना पक्ष सोडल्याचा पश्चाताप होत आहे. त्यांना पक्षात घेण्याबाबत कोणतीही चर्चा सध्या सुरू नाही. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची जागा घेतलेल्या युवा कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल. गेली पाच वर्षे मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता असतो तर मला आज अधिक फायदा झाला असता, असेही थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliticsराजकारण