शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

खाते वाटपावरून मित्रपक्षात वाद नाहीत-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 14:17 IST

खातेवाटपावरून मित्रपक्षांत कोणताही वाद नाही़. सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. तेव्हा चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले़.

शिर्डी : मंत्र्यांच्या खातेवाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दोन दिवसात त्यासंबधी निर्णय होईल. खातेवाटपावरून मित्रपक्षांत कोणताही वाद नाही. सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. तेव्हा चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मंत्री थोरात यांनी शिर्डी येथे शनिवारी साईसमाधीचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकरी कठीण प्रसंगातून जात असल्याने शेतक-यांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. सरकारमध्ये तीन पक्ष वेगवेगळ्या विचाराचे असले तरी तीनही पक्षांचा राज्य घटनेवर विश्वास आहे़. त्यामुळेच आम्ही तीन्ही पक्ष एकाच विचाराने कारभार करण्यासाठी पुढे जात आहोत. पाच वर्षें सरकार टिकवायचे असल्याने चर्चेतून निर्णय घेण्याची काळजी घेतली जात आहे. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावरच महामंडळे व साईसंस्थान विश्वस्त मंडळांच्या नियुक्तीबाबत निर्णय होणार आहे. राज्य मंत्रीमंडळात आपण कोणत्याही एका विशिष्ट खात्यासाठी अडून बसलेलो नाही. जे मिळेल ते खाते स्वीकारणार आहे. लोकसभा आणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठे नेतेमंडळी पक्ष सोडून गेले. आज त्यांना पक्ष सोडल्याचा पश्चाताप होत आहे. त्यांना पक्षात घेण्याबाबत कोणतीही चर्चा सध्या सुरू नाही. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची जागा घेतलेल्या युवा कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल. गेली पाच वर्षे मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता असतो तर मला आज अधिक फायदा झाला असता, असेही थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliticsराजकारण