शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

निळवंडेतून धरणातील एक थेंबसुद्धा पाणी देणार नाही - आमदार बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:10 IST

निळवंडे धरणातील एक थेंबसुद्धा पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे या पाण्यावर कोणी हक्क सांगू नये, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिला. तळेगाव दिघे ( ता.संगमनेर) येथील चौफुलीवर निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्तारोको आंदोलनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देतळेगाव दिघे येथे रास्तारोको आंदोलन

तळेगाव दिघे: निळवंडे धरणातील एक थेंबसुद्धा पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे या पाण्यावर कोणी हक्क सांगू नये, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिला. तळेगाव दिघे ( ता.संगमनेर) येथील चौफुलीवर निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्तारोको आंदोलनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.थोरात म्हणाले, राज्यातील निळवंडे हे एकमेव असे धरण आहे की, ज्याचे काम पूर्ण होण्याअगोदर संपूर्ण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आपण केले. आता पाण्यावर कुणीही राजकारण करू नये. अफवांवर विश्वास ठेऊ नका. मनातील किल्मिश काढून टाका. बाकी राहिलेले काम आपल्यालाच करावे लागणार आहे. पाण्यासाठी तुमच्याबरोबर कुठेही यायला मी तयार आहे?, असे आश्वासन थोरातांनी आंदोलकांना दिले. आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, आमदार थोरात कधीही शेतकऱ्यांच्या हिताच्या आड आले नाहीत. निळवंडेच्या कामात कोणीही राजकारण आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले.याप्रसंगी बाबा ओहळ, महेंद्र गोडगे, गणपत सांगळे, मच्छिंद्र दिघे, रमेश दिघे, राजेंद्र भडांगे, सरपंच बाबाजी कांदळकर, गणेश दिघे यांची यावेळी भाषणे झाली. आंदोलनात संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपसरपंच अनिल कांदळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या पद्मा थोरात, जे. डी. दिघे, हरिश चकोर, अविनाश सोनवणे, तुकाराम दिघे, हौशिराम सोनवणे, प्रभाकर कांदळकर हे प्रमुख नेते सहभागी झाले होते. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतक-यांपेक्षा परिसरातील कार्यकर्तेच आंदोलनात मोठ्या प्रमाणात दिसत होते. आंदोलनस्थळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे वाहतुकीस अडथळा आला नाही.पाणी पळविण्याचे षडयंत्रसंगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे व पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी आ.थोरातांच्या हस्ते निवेदन स्वीकारले. कालव्यांची कामे त्वरित सुरू करा, कोपरगाव, शिर्डी, राहाता शहरांसाठी पाणी पळविण्याचे षडयंत्र थांबवा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर