शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

राहात्यात बहुजन आक्रोश मोर्चा

By admin | Updated: April 19, 2017 19:47 IST

शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, इव्हीएम मशीन बंद करा यासारख्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राहाता येथे बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आॅनलाइन लोकमतराहाता (अहमदनगर) दि़१९- शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, इव्हीएम मशीन बंद करा यासारख्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राहाता येथे बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालय घोषणांनी दणाणून सोडले. शेतकऱ्यांना कर्ज माफी करा , शेतमाल व दुधास हमी भाव द्या, निळवंडे कालव्याची कामे त्वरित करा,ईव्हीएम मशिन बंद करुन निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी यासारख्या तीस मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर राहाता शहरातून घोषणा देत तहसील कार्यालयात मोर्चा दाखल झाला. मोर्चेकऱ्यांनी तहसील परिसर घोषणा देत दणाणून सोडला. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. अनिल माने म्हणाले की, आमच्या मागण्या संविधानिक आहेत. आमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सरकारकडे मोर्चाव्दारे आक्रोेश करीत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत सरकार विरोधात आमचा लढा सुरु राहील. गरज पडल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे केले जाईल. भारतीय विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थिनींनी निवेदन व संविधान प्रास्तविके चे वाचन केल्यानंतर प्रियंका म्हस्के, सुप्रिया मंतोडे ,नंदिनी मंतोडे यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले. यावेळी शांताराम उपाध्ये, सोमनाथ दरंदले, सुनील बोऱ्हाडे, राजेंद्र बर्डे, दत्ता गोरे, अनिल सोमवंशी, विनायक निकाळे, निलेश दुरगुडे, सचिव बनसोडे, संतोष रोहम, अनिल मंतोडे यांची भाषणे झाली.