शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पाणवठ्यामुळे परतले वन्यजीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:54 IST

नगर तालुक्यातील भातोडी येथील दुर्गम भागात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. मात्र चारा-पाण्याअभावी येथील वन्यजीव या भागात दिसेनासे झाले होते.

केडगाव : नगर तालुक्यातील भातोडी येथील दुर्गम भागात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. मात्र चारा-पाण्याअभावी येथील वन्यजीव या भागात दिसेनासे झाले होते. पाण्याच्या शोधात हे जीव अन्यत्र स्थलांतरीत झाल्याचे लक्षात येताच गावातील पांडुरंग प्रतिष्ठानच्या तरुणांनी वन्यजीवांचे अस्तित्व असणाऱ्या भागात ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आणि काही दिवसांच्या अवधीनंतर गावातून निघून गेलेले वन्यजीव गावाकडे पुन्हा फिरले.नगर तालुक्यातील ऐतिहासिक भातोडी गावातील परिसरात चौत्रा नावाचा एक दुर्गम भाग आहे. या भागात हरीण, ससे, लांडगे, कोल्हे, मोर व इतर वन्य प्राणी व पक्ष्यांचे अस्तित्व आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर गजबजलेला असतो. मात्र भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील वन्यजीवांचे अन्न पाण्यावाचून हाल सुरु झाले. पाण्याच्या शोधात यातील अनेक वन्यप्राणी हा परिसर सोडून इतरत्र स्थलांतरीत होऊ लागले. पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणारा हा परिसर प्राणी व पक्ष्यांअभावी ओसाड बनला. गावातील पांडुरंग प्रतिष्ठान कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी वन्यजीवांसाठी काहीतरी करण्याची तयारी सुरु केली.ज्या पाण्याअभावी वन्यजीव निघून गेले त्याच पाण्याच्या सोयीसाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्याचा निर्णय घेतला. ठिकठिकाणी पाणवठे तयार केल्यानंतर काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निघून गेलेले सर्व वन्यजीव या परिसरात परतू लागले. ओसाड बनलेला हा परिसर पुन्हा गजबजून गेला. गावातील अनेक तरुण यासाठी सहकार्य करीत आहेत. पाणवठे तयार करण्यासाठी शाम घोलप, राजेंद्र काळे, किरण शिंदे, आकाश ओव्होलकर, विशाल घोलप, अभिमान घोलप यांनी परिश्रम घेतले.पाणवठे तयार केल्यानंतर दोन-तीन दिवस या परिसरात एकही पक्षी नजरेस पडला नाही. यामुळे केलेले परिश्रम वाया जातात काय अशी भीती वाटू लागली. मात्र काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हजारो पशु-पक्षी या परिसरात पुन्हा परतले आणि हा परिसर पुन्हा गजबजला. - शाम घोलप ( सचिव, पांडुरंग प्रतिष्ठान, भातोडी)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर