शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पाणवठ्यामुळे परतले वन्यजीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:54 IST

नगर तालुक्यातील भातोडी येथील दुर्गम भागात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. मात्र चारा-पाण्याअभावी येथील वन्यजीव या भागात दिसेनासे झाले होते.

केडगाव : नगर तालुक्यातील भातोडी येथील दुर्गम भागात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. मात्र चारा-पाण्याअभावी येथील वन्यजीव या भागात दिसेनासे झाले होते. पाण्याच्या शोधात हे जीव अन्यत्र स्थलांतरीत झाल्याचे लक्षात येताच गावातील पांडुरंग प्रतिष्ठानच्या तरुणांनी वन्यजीवांचे अस्तित्व असणाऱ्या भागात ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आणि काही दिवसांच्या अवधीनंतर गावातून निघून गेलेले वन्यजीव गावाकडे पुन्हा फिरले.नगर तालुक्यातील ऐतिहासिक भातोडी गावातील परिसरात चौत्रा नावाचा एक दुर्गम भाग आहे. या भागात हरीण, ससे, लांडगे, कोल्हे, मोर व इतर वन्य प्राणी व पक्ष्यांचे अस्तित्व आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर गजबजलेला असतो. मात्र भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील वन्यजीवांचे अन्न पाण्यावाचून हाल सुरु झाले. पाण्याच्या शोधात यातील अनेक वन्यप्राणी हा परिसर सोडून इतरत्र स्थलांतरीत होऊ लागले. पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणारा हा परिसर प्राणी व पक्ष्यांअभावी ओसाड बनला. गावातील पांडुरंग प्रतिष्ठान कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी वन्यजीवांसाठी काहीतरी करण्याची तयारी सुरु केली.ज्या पाण्याअभावी वन्यजीव निघून गेले त्याच पाण्याच्या सोयीसाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्याचा निर्णय घेतला. ठिकठिकाणी पाणवठे तयार केल्यानंतर काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निघून गेलेले सर्व वन्यजीव या परिसरात परतू लागले. ओसाड बनलेला हा परिसर पुन्हा गजबजून गेला. गावातील अनेक तरुण यासाठी सहकार्य करीत आहेत. पाणवठे तयार करण्यासाठी शाम घोलप, राजेंद्र काळे, किरण शिंदे, आकाश ओव्होलकर, विशाल घोलप, अभिमान घोलप यांनी परिश्रम घेतले.पाणवठे तयार केल्यानंतर दोन-तीन दिवस या परिसरात एकही पक्षी नजरेस पडला नाही. यामुळे केलेले परिश्रम वाया जातात काय अशी भीती वाटू लागली. मात्र काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हजारो पशु-पक्षी या परिसरात पुन्हा परतले आणि हा परिसर पुन्हा गजबजला. - शाम घोलप ( सचिव, पांडुरंग प्रतिष्ठान, भातोडी)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर