शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आयुष्यमान कार्डवाटपास आशा सेविकांचा नकार, जिल्हा परिषदेवर ठिय्या

By चंद्रकांत शेळके | Updated: September 13, 2023 17:54 IST

हे कार्ड काढण्याचे काम शासनाने काही खासगी एजन्सींना दिले आहे.

 चंद्रकांत शेळके

अहमदनगर : केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड असणे बंधनकारक आहे. परंतु हे कार्ड तयार झाल्यानंतर लाभार्थ्याला वाटप करण्याची व आवश्यक तेथे केवायसी करण्याची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे. मूळात हे काम आशा सेविकांचे नाही, त्यामुळे ते काम शासनाने काढून घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी आशासेविकांनी जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन केले.

हे कार्ड काढण्याचे काम शासनाने काही खासगी एजन्सींना दिले आहे. हे कार्ड छपाईनंतर त्याचे वाटप करण्याचे नियोजन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हे काम आशासेविकांवर सोपवले आहे. परंतु हे काम किचकट आहे. आशासेविकेने हे कार्ड देताना संबंधित लाभार्थ्याची केवायसी करायची आहे. यासाठी प्रत्येक यशस्वी केवायसीसाठी ५ रूपये व प्रती कार्ड वाटपास ३ रूपये असे आठ रूपये देण्यात येत आहेत. मूळात केवायसी प्रक्रिया मोबाईलवरून करायची आहे. त्यासाठी आशा सेविकांना कोणतेही प्रशिक्षण नाही किंवा तसे अद्ययावत मोबाईल त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे हे काम त्यांना देऊ नये किया द्यायचेच असेल तर प्रती कार्ड ५० रूपये द्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्या आशासेविकांनी केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरayushman bharatआयुष्मान भारत