शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

अकोलेतील सेतूपुलावर आंदोलकांचा जागता पहारा : तिस-या दिवशीही आंदोलन सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 12:10 IST

रविवारी रात्रीपासून अगस्ती सेतू पुलावर सुरु झालेला बैठा सत्याग्रह अकोले तालुका दुष्काळी घोषणा होईपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीने घेतला.

अकोले : रविवारी रात्रीपासून अगस्ती सेतू पुलावर सुरु झालेला बैठा सत्याग्रह अकोले तालुका दुष्काळी घोषणा होईपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीने घेतला. तिस-या दिवशीही आंदोलकांचा ‘जागता पहारा’ सुरु असून हा ‘एल्गार’ तालुक्यात दुष्काळ जाहीर होईपर्यंत थांबणार नाही, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे व आमदार वैभव पिचड यांनी दिला.रविवारी रात्रभर खासदार लोखंडे व कॉ.अजित नवले कार्यकर्त्यांसह अगस्ती पुलावर बसून होते. सोमवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुलावर दिवसभर ठिय्या दिला होता. दुपारी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी भाषणे करीत आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करुन दिली. दुपारी एक वाजता सुरु झालेली ही सभा साडेचार वाजेपर्यंत सुरु होती.भाजप सरकारने योजना राबविण्यासाठी सुरु केलेली ‘आॅनलाईन’ नावाची चेष्टा थांबवावी. सरकारने जनतेच्या मागणीच्या रेट्याची बूज राखावी, अशी अपेक्षा आमदार पिचड यांनी व्यक्त केली.खासदार लोखंडे यांनी मतदारसंघातील सहा तालुक्यांचा विचार करुन निळवंडेचे प्रस्तावित कालवे होऊ द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर होईपर्यंत शांत बसणार नाही, असे सांगितले.यावेळी कॉम्रेड डॉ.अजित नवले, मधुकर नवले, गिरजाजी जाधव, शिवाजी धुमाळ, मिनानाथ पांडे, शांताराम वाळुंज, डॉ.संदीप कडलग, मच्छिंद्र धुमाळ, विकास शेटे, मारुती मेंगाळ, विनय सावंत, परबत नाईकवाडी, अंजना बोंबले, उत्कर्षा रुपवते, निखिल जगताप, विलास आरोटे, अशोक देशमुख, विजय वाकचौरे यांची भाषणे झाली. सोमवारी भाजपचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले होते.जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, कारभारी उगले, रामनाथ चौधरी,दादापाटील वाकचौरे, कैलास वाकचौरे, वसंत मनकर, रंजना मेंगाळ, आशा पापळ, कल्पना सुरपुरीया, प्रदीप हासे, खंडू वाकचौरे, रोहिदास धुमाळ, सुरेश नवले, दत्ता नवले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रांत भागवत डोईफोडे,तहसीलदार मुकेश कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, जलसंपदा विभागाचे अभियंता रामनाथ आरोटे यांनी आंदोलकांशी चर्चा करुन दुष्काळासंदर्भात ३१आॅक्टोबरला निर्णय होईल असे सांगितले.दुष्काळाची नियमावली ठरवणारा शासनाचा २०१६चा कायदा अन्यायकारक आहे. दुष्काळ नाकारायचा व धरणातील पाणीही काढून घ्यायचे हा अन्याय आहे. पूर्वीच्या पाटपाण्याच्या लढ्याची आठवण होईल, असा संघर्ष शेतकरी उभारतील याची शासनाने नोंद घ्यावी. - मधुकर नवले, प्रदेश उपाध्यक्ष, किसान आघाडी, राष्टÑवादी