शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक- मालक संघटनेच्यावतीने साखळी पद्धतीने बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 13:30 IST

अहमदनगर :  कोविड  महामारीमुळे रिक्षाचालक_ मालक यांना वीस हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी. तसेच महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी या मागणीकडे नगर शहरात रिक्षा चालकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

अहमदनगर :  कोविड  महामारीमुळे रिक्षाचालक_ मालक यांना वीस हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी. तसेच महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी या मागणीकडे नगर शहरात रिक्षा चालकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने मार्केटयार्ड हमाल भवन येथे साखळी पद्धतीने सोशल डिस्टंसिंग ठेवून कायदेशीर नियमाचे पालन करून बेमुदत उपोषण चालू करण्यात आले. 

 यावेळी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, सचिव अशोक औशिकर, सल्लागार विलास कराळे, रावसाहेब काळे, गोरख खांदवे, रघुनाथ कापरे, प्रकाश गोसावी, सुनिल खेर्पे, लतीफ शेख, नंदकुमार गायकवाड, शंकर जाधव, गोरख रोहकले, विषाल कावडे, रवींद्र वाघ, दीपक गहिले आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  

 

लॉकडाउन झाल्यामुळेऑटो रिक्षा चालकांचे व्यवसाय बंद आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहेत.  रिक्षाचालकांवर आजपर्यंत इतके दिवस रिक्षा बंद ठेवण्याची वेळ आली नव्हती.  तरी शासनाने रिक्षाचालकांसाठी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही,  रिक्षा चालक व मालक सरकारला वाहन कर इन्शुरन्स पासिंग इतर कर आणि डिझेल व पेट्रोल खरेदी कर भरत असतो वर्षाला सर्व मिळून एक रिक्षा चालक 30 हजार रुपये सरकारला महसूल भरत आहेत.  पण सरकार रिक्षाचालक व मालकांना मदत करण्याबाबत विचार करायला तयार नाही.  रिक्षाचालक हर रोज कमावणारा व खाणारा समाजाचा घटक आहे महाराष्ट्र मध्ये ऑटोरिक्षा धारक परवानाधारक 25. लाख आहे.

 चालक-मालक मिळून 50 लाख इतकी आहे तर राज्याप्रमाणे केरळ दिल्ली कर्नाटक या राज्यात 10 हजार रुपये सरकारने रिक्षा चालक व मालक यांना आर्थिक मदत दिलेली असून त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त मदत रिक्षा चालक व मालक यांना तातडीने 20 हजार रुपये आर्थिक मदत मिळावी म्हणून अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मार्केट याड हमाल भवन येथे साखळी पद्धतीने उपोषण चालू करण्यात आले आहे.