शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक- मालक संघटनेच्यावतीने साखळी पद्धतीने बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 13:30 IST

अहमदनगर :  कोविड  महामारीमुळे रिक्षाचालक_ मालक यांना वीस हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी. तसेच महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी या मागणीकडे नगर शहरात रिक्षा चालकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

अहमदनगर :  कोविड  महामारीमुळे रिक्षाचालक_ मालक यांना वीस हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी. तसेच महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी या मागणीकडे नगर शहरात रिक्षा चालकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने मार्केटयार्ड हमाल भवन येथे साखळी पद्धतीने सोशल डिस्टंसिंग ठेवून कायदेशीर नियमाचे पालन करून बेमुदत उपोषण चालू करण्यात आले. 

 यावेळी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, सचिव अशोक औशिकर, सल्लागार विलास कराळे, रावसाहेब काळे, गोरख खांदवे, रघुनाथ कापरे, प्रकाश गोसावी, सुनिल खेर्पे, लतीफ शेख, नंदकुमार गायकवाड, शंकर जाधव, गोरख रोहकले, विषाल कावडे, रवींद्र वाघ, दीपक गहिले आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  

 

लॉकडाउन झाल्यामुळेऑटो रिक्षा चालकांचे व्यवसाय बंद आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहेत.  रिक्षाचालकांवर आजपर्यंत इतके दिवस रिक्षा बंद ठेवण्याची वेळ आली नव्हती.  तरी शासनाने रिक्षाचालकांसाठी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही,  रिक्षा चालक व मालक सरकारला वाहन कर इन्शुरन्स पासिंग इतर कर आणि डिझेल व पेट्रोल खरेदी कर भरत असतो वर्षाला सर्व मिळून एक रिक्षा चालक 30 हजार रुपये सरकारला महसूल भरत आहेत.  पण सरकार रिक्षाचालक व मालकांना मदत करण्याबाबत विचार करायला तयार नाही.  रिक्षाचालक हर रोज कमावणारा व खाणारा समाजाचा घटक आहे महाराष्ट्र मध्ये ऑटोरिक्षा धारक परवानाधारक 25. लाख आहे.

 चालक-मालक मिळून 50 लाख इतकी आहे तर राज्याप्रमाणे केरळ दिल्ली कर्नाटक या राज्यात 10 हजार रुपये सरकारने रिक्षा चालक व मालक यांना आर्थिक मदत दिलेली असून त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त मदत रिक्षा चालक व मालक यांना तातडीने 20 हजार रुपये आर्थिक मदत मिळावी म्हणून अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मार्केट याड हमाल भवन येथे साखळी पद्धतीने उपोषण चालू करण्यात आले आहे.