शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

मुख्याधिका-यांनीच पालिकेच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:12 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर पदाधिकारी व प्रशासनाचा धाक न राहिल्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली. त्यामुळे ...

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर पदाधिकारी व प्रशासनाचा धाक न राहिल्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली. त्यामुळे वेळेचे बंधन न पाळणा-या कर्मचा-यांना झटका दाखविण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांनी सोमवारी चक्क पालिकेच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले.त्यामुळे लेटलतिफ कर्मचा-यांची एकच धांदल उडाली. श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणुक जवळ येत असल्याने कोणी पदाधिकारी बोलत नाही. मुख्याधिकारी दातीर हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे कर्मचा-यांना रान मोकळे झाल्याने आपल्या मर्जीनुसार काम सुरू होते. गेल्या दोन महिन्यांपासून नगरपालिकेत कर्मचा-यांची मनमानी सुरू आहे. मुख्याधिका-यांनी कर्मचा-यांना अनेकदा कामावर वेळेत येण्याबाबत समज दिली. पण कर्मचा-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सोमवारी आठवडे बाजारचा दिवस असल्याने अनेक नागरिक पालिकेत थांबले होते. दुपारचे सव्वा तीन वाजले तरी एकही कर्मचार हजर नसल्याचे पाहून मुख्याधिकारी दातीर यांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याचा आदेश कर्मचा-यांना दिला. त्यामुळे नंतर आलेल्या सर्व कर्मचा-यांना बाहेर उभे रहावे लागले. प्रवेशद्वार उघडल्यानंतर मुख्याधिका-यांनी कर्मचा-यांना पालिका तुमची घरची संस्था आहे का?, तुम्ही वेळेवर का येत नाही?, अशी विचारणा करीत चांगलेच झापले. कर्मचा-यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पालिकेचे कामकाज सुरळीत सुरू झाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा