शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

असरच्या आडून शिक्षण व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न; नगरमध्ये लोकमत चर्चासत्रात शिक्षकांनी उपस्थित केले प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:42 IST

शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. 

ठळक मुद्देअसर अहवालावरील अक्षेपविद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शाळेबाहेर करणे चुकीचे, शंभर टक्के मुलांचे सर्वेक्षण नाहीसर्वेक्षण करणा-यांना पुरेसे ज्ञान नाही, शिक्षण व्यवस्थेला विश्वासात घेतले जात नाहीअहवालानुसार कोणत्याही उपाययोजना नाहीतप्रत्येकवेळी नकारात्मक अहवाल देणे, सकारात्मक बाजू दाखविली जात नाही

अहमदनगर : शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. असरच्या आडून राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बदनाम करून खासगी करण्याचा डाव रचला जात असल्याचा सूर शिक्षकांनी आळवला.अ‍ॅन्युअल स्टेटस एज्युकेशन रिपोर्ट-२०१७ (असर)चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालाबाबत ‘लोकमत’तर्फे गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी यावेळी असर अहवालाची पोलखोल करत हे सर्वेक्षण अशास्त्रीय पध्दतीने केल्याचा आक्षेप नोंदविला. मुख्याध्यापक लक्ष्मण टिमकर, भास्कर नरसाळे, शिक्षक नेते संजय कळमकर आणि शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी चर्चेत सहाभाग घेतला.असर संस्थेतर्फे सन २००५ पासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्यात येते़ सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर होतो. सरकारकडून त्यावर उपाययोजना केल्या जातात, असे सांगितले जाते. मग गेल्या बारा वर्षांत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा का झाली नाही, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला. याचाच अर्थ शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सर्वेक्षण न करता केवळ दोष दाखवून शिक्षण व्यवस्थेला बदनाम करणे हा एकमेव उद्देश असल्याचे यावरून उघड होते. जर मुलांना लिहिता वाचता येत नाही, मग एसएससी बोर्डाचा निकाल ९९ टक्के कसा लागतो़ शिक्षण विभागाकडून १०० टक्के मुलांचे सर्वेक्षण केले जाते़ परंतु, असर कडून नमुन्यादाखल काही गावातील मुलांचे सर्वेक्षण होते़ त्यावरून सर्वच मुलांची गुणवत्ता ठरविली जाते़ ही पध्दतच मुळात चुकीची असेही शिक्षक म्हणाले़ विद्यार्थ्यांच्या ढासळत असलेल्या गुणवत्तेवर शिक्षकांनी प्रकाश टाकला. गुणवत्ता ढासळण्यास केवळ शिक्षकच जबाबदार आहे, असे चित्र रंगविले जात आहे. परंतु गुणवत्ता ढासळण्यास शिक्षकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वच जबाबदार आहेत. कारण शिक्षकांना मुलांना शिकविण्यासाठी वेळच मिळत नाही़ शिक्षकांचे शिकविण्याचे तास, इतर कामे, प्रशिक्षणे, यासारख्या कामांचे असरने सर्वेक्षण करावे. म्हणजे शिक्षकांचा सर्वाधिक वेळ खर्च होतो, याचा सर्वांनाच अंदाज येईल, असा सल्ला शिक्षकांनी असर संस्थेला दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर