शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

असरच्या आडून शिक्षण व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न; नगरमध्ये लोकमत चर्चासत्रात शिक्षकांनी उपस्थित केले प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:42 IST

शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. 

ठळक मुद्देअसर अहवालावरील अक्षेपविद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शाळेबाहेर करणे चुकीचे, शंभर टक्के मुलांचे सर्वेक्षण नाहीसर्वेक्षण करणा-यांना पुरेसे ज्ञान नाही, शिक्षण व्यवस्थेला विश्वासात घेतले जात नाहीअहवालानुसार कोणत्याही उपाययोजना नाहीतप्रत्येकवेळी नकारात्मक अहवाल देणे, सकारात्मक बाजू दाखविली जात नाही

अहमदनगर : शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. असरच्या आडून राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बदनाम करून खासगी करण्याचा डाव रचला जात असल्याचा सूर शिक्षकांनी आळवला.अ‍ॅन्युअल स्टेटस एज्युकेशन रिपोर्ट-२०१७ (असर)चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालाबाबत ‘लोकमत’तर्फे गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी यावेळी असर अहवालाची पोलखोल करत हे सर्वेक्षण अशास्त्रीय पध्दतीने केल्याचा आक्षेप नोंदविला. मुख्याध्यापक लक्ष्मण टिमकर, भास्कर नरसाळे, शिक्षक नेते संजय कळमकर आणि शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी चर्चेत सहाभाग घेतला.असर संस्थेतर्फे सन २००५ पासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्यात येते़ सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर होतो. सरकारकडून त्यावर उपाययोजना केल्या जातात, असे सांगितले जाते. मग गेल्या बारा वर्षांत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा का झाली नाही, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला. याचाच अर्थ शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सर्वेक्षण न करता केवळ दोष दाखवून शिक्षण व्यवस्थेला बदनाम करणे हा एकमेव उद्देश असल्याचे यावरून उघड होते. जर मुलांना लिहिता वाचता येत नाही, मग एसएससी बोर्डाचा निकाल ९९ टक्के कसा लागतो़ शिक्षण विभागाकडून १०० टक्के मुलांचे सर्वेक्षण केले जाते़ परंतु, असर कडून नमुन्यादाखल काही गावातील मुलांचे सर्वेक्षण होते़ त्यावरून सर्वच मुलांची गुणवत्ता ठरविली जाते़ ही पध्दतच मुळात चुकीची असेही शिक्षक म्हणाले़ विद्यार्थ्यांच्या ढासळत असलेल्या गुणवत्तेवर शिक्षकांनी प्रकाश टाकला. गुणवत्ता ढासळण्यास केवळ शिक्षकच जबाबदार आहे, असे चित्र रंगविले जात आहे. परंतु गुणवत्ता ढासळण्यास शिक्षकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वच जबाबदार आहेत. कारण शिक्षकांना मुलांना शिकविण्यासाठी वेळच मिळत नाही़ शिक्षकांचे शिकविण्याचे तास, इतर कामे, प्रशिक्षणे, यासारख्या कामांचे असरने सर्वेक्षण करावे. म्हणजे शिक्षकांचा सर्वाधिक वेळ खर्च होतो, याचा सर्वांनाच अंदाज येईल, असा सल्ला शिक्षकांनी असर संस्थेला दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर