शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

असरच्या आडून शिक्षण व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न; नगरमध्ये लोकमत चर्चासत्रात शिक्षकांनी उपस्थित केले प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:42 IST

शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. 

ठळक मुद्देअसर अहवालावरील अक्षेपविद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शाळेबाहेर करणे चुकीचे, शंभर टक्के मुलांचे सर्वेक्षण नाहीसर्वेक्षण करणा-यांना पुरेसे ज्ञान नाही, शिक्षण व्यवस्थेला विश्वासात घेतले जात नाहीअहवालानुसार कोणत्याही उपाययोजना नाहीतप्रत्येकवेळी नकारात्मक अहवाल देणे, सकारात्मक बाजू दाखविली जात नाही

अहमदनगर : शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. असरच्या आडून राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बदनाम करून खासगी करण्याचा डाव रचला जात असल्याचा सूर शिक्षकांनी आळवला.अ‍ॅन्युअल स्टेटस एज्युकेशन रिपोर्ट-२०१७ (असर)चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालाबाबत ‘लोकमत’तर्फे गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी यावेळी असर अहवालाची पोलखोल करत हे सर्वेक्षण अशास्त्रीय पध्दतीने केल्याचा आक्षेप नोंदविला. मुख्याध्यापक लक्ष्मण टिमकर, भास्कर नरसाळे, शिक्षक नेते संजय कळमकर आणि शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी चर्चेत सहाभाग घेतला.असर संस्थेतर्फे सन २००५ पासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्यात येते़ सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर होतो. सरकारकडून त्यावर उपाययोजना केल्या जातात, असे सांगितले जाते. मग गेल्या बारा वर्षांत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा का झाली नाही, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला. याचाच अर्थ शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सर्वेक्षण न करता केवळ दोष दाखवून शिक्षण व्यवस्थेला बदनाम करणे हा एकमेव उद्देश असल्याचे यावरून उघड होते. जर मुलांना लिहिता वाचता येत नाही, मग एसएससी बोर्डाचा निकाल ९९ टक्के कसा लागतो़ शिक्षण विभागाकडून १०० टक्के मुलांचे सर्वेक्षण केले जाते़ परंतु, असर कडून नमुन्यादाखल काही गावातील मुलांचे सर्वेक्षण होते़ त्यावरून सर्वच मुलांची गुणवत्ता ठरविली जाते़ ही पध्दतच मुळात चुकीची असेही शिक्षक म्हणाले़ विद्यार्थ्यांच्या ढासळत असलेल्या गुणवत्तेवर शिक्षकांनी प्रकाश टाकला. गुणवत्ता ढासळण्यास केवळ शिक्षकच जबाबदार आहे, असे चित्र रंगविले जात आहे. परंतु गुणवत्ता ढासळण्यास शिक्षकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वच जबाबदार आहेत. कारण शिक्षकांना मुलांना शिकविण्यासाठी वेळच मिळत नाही़ शिक्षकांचे शिकविण्याचे तास, इतर कामे, प्रशिक्षणे, यासारख्या कामांचे असरने सर्वेक्षण करावे. म्हणजे शिक्षकांचा सर्वाधिक वेळ खर्च होतो, याचा सर्वांनाच अंदाज येईल, असा सल्ला शिक्षकांनी असर संस्थेला दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर