शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

अँट्रॉसिटीचे कलम वगळण्यास आठवले यांचा विरोध

By admin | Updated: December 1, 2014 14:50 IST

जवखेडे हत्याकांडातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यात आधी लावण्यात आलेले अँट्रॉसिटीचे कलम वगळण्यास रिपब्लिकन पार्टीचे नेते खासदार रामदास आठवले यांनी विरोध केला आहे.

 

अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यात आधी लावण्यात आलेले अँट्रॉसिटीचे कलम वगळण्यास रिपब्लिकन पार्टीचे नेते खासदार रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. हत्याकांडातील संशयित म्हणून ज्यांची चौकशी झाली, ते अन्य जाती-धर्मातील आहेत. त्यामुळे सदर कलम वगळण्याबाबत पोलिसांनी घाईने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
नगर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जवखेडेच्या घटनेला एक महिना आठ दिवस लोटले आहेत. पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यात अपयश आले आहे. आरोपीच सापडले नाहीत तर कलम वगळण्याबाबत पोलीस निष्कारण घाई करीत आहेत. खर्डा येथील हत्या जातीयवादी भावनेतूनच झाली होती. जोपर्यंत कारणे, पुरावे आणि आरोपी सापडत नाहीत, तोपर्यंत अँट्रॉसिटीचे कलम वगळण्याचे काहीच कारण नाही. या तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स नियुक्त केला जावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पोलिसांना आता भरपूर वेळ दिल्याने तपास सीबीआयकडे देण्याची गरज आहे. 
दलितांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस गंभीरपणे तक्रार दाखल करून घेत नाहीत. त्याचवेळी त्यांनी तपास केला तर पुढील घटना घडणार नाहीत. दलित अत्याचाराच्या घटना ज्या भागात संख्येने जास्त आहेत, अशा भागात पोलीसबळ वाढवावे. दलितांचे संरक्षण करण्यास पोलीस सक्षम नसतील तर स्वसंरक्षणार्थ दलितांना हत्यारे वापरण्याची परवानगी द्यावी. दलित अत्याचाराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक समिती नियुक्त करून त्याची तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे आठवले यांनी सांगितले. दलितांवर अत्याचाराची प्रकरणे देशभर घडत आहेत. ही नीच मानसिकतेची लक्षणे आहेत. त्यावर कसे बंधन आणायचे, याचा सरकारने विचार केला पाहिजे. अँट्रॉसिटीचे कलम रद्द करावे, ही सत्यशोधन समितीची मागणी चुकीची आहे. त्या मागणीला काहीच अर्थ नाही. अत्याचाराच्या घटनांबाबत मागील सरकारपेक्षा आताचे सरकार जास्त गंभीर आहे, असेच गंभीरपणे सरकारने काम करावे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)