शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणचा टक्का वाढल्याने चिंता विधानसभा निवडणूक :

By admin | Updated: October 16, 2014 22:51 IST

सांगली मिरज क्षेत्रातील टक्का झाला कमी, आकड्यांवर व्यक्त केले जाताहेत अंदाज

सांगली : महापालिका क्षेत्रातील मतांचा टक्का घटला असतानाच ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी मतांचा टक्का वाढल्याने अनेकांना चिंता लागली आहे. मतांचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा आणि तोट्याचा यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मतांचा टक्का वाढावा म्हणून प्रशासकीय स्तरावर प्रयत्न झाले होते. ग्रामीण भागातून त्याप्रमाणे टक्का वाढला असला तरी, या वाढलेल्या व कमी झालेल्या टक्केवारीवर निकालाचे गणित मांडले जात आहे. मतदानाची प्रक्रिया बुधवारी पार पडल्यानंतर मतांच्या अंतिम आकड्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी प्रशासनाने याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली. जिल्ह्यातील आठपैकी सांगली व मिरज या दोनच मतदारसंघात साठ टक्क्यांच्या घरात मतदान झाले आहे. उर्वरित सर्वच मतदारसंघात ६५ टक्क्यांवर मतदान झाले आहे. यातही ग्रामीण भागातील मतांचे आकडे मोठे आहेत. मतदानाच्या आकडेवारीची तुलना गत निवडणुकीतील आकड्यांशी केली जात आहे. बहुतांश मतदारसंघातील मतदानाचे आकडे यंदा वाढले आहेत. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला त्याचा फटका बसणार, याची चर्चा आता रंगलेली आहे. अशा गणिताला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी, त्याची चर्चा प्रत्येक निवडणुकीत होत असते. यंदाही त्यापद्धतीने सुरू आहे. पारंपरिक अंदाज व्यक्त करण्याच्या गावोगावी आणि गल्लोगल्ली अशाचप्रकारच्या चर्चांना आता ऊत आला आहे. आकडेवारीवरून आता पैजाही लावल्या जात आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या मतदानाच्या आकडेवारीत २.५५ टक्के इतकी वाढ झाली आहे. तुलनेने गतवेळेपेक्षा मतदानाचा टक्का घटलेल्या मतदारसंघात मिरज आणि इस्लामपूर या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणुकीत मताचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने मतदार जागृती मोहीम राबविली होती. त्याचा परिणामही ग्रामीण भागात जाणवला. (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारी मतदारसंघ२००९ मध्ये २०१४ मध्ये सांगली५८.७६५९.११ शिराळा७७.४७७८.८७ तासगाव-क. म.६३.४४७६.६१ पलूस-कडेगाव७८.००८१.६४ मिरज६२.७३६१.३० खानापूर६७.५१७३.१४ इस्लामपूर७५.५९७२.०३ जत६६.००६८.0८ एकूण६८.६८७०.८४ सर्वाधिक मतदान पलूस-कडेगावमध्ये मतदानाच्या अधिकृत आकडेवारीनुसार पलूस-कडेगावने मतदानात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. याठिकाणी ८१.६४ टक्के मतदान झाले आहे. यात १ लाख ७ हजार २0५ पुरुषांनी तर ९९ हजार ८५८ महिलांनी मतदान केले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदले गेले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ही उर्वरित सात मतदारसंघापेक्षा अधिक आहे. याठिकाणची एकूण मतदारसंख्या ३ लाख २८ हजार ३७0 इतकी आहे. तरीही सांगलीत केवळ ५९ टक्के मतदान झाले. मिरजेतही कमी मतदानाची नोंद झाली. मिरजेची एकूण मतदारसंख्या ३ लाख १ हजार ४३७ इतकी आहे. सांगलीनंतर सर्वाधिक मतदारसंख्या मिरजेत आहे. तरीही मिरजेत ६१.३0 टक्के मतदान झाले. महापालिका क्षेत्रातील मोठा भाग या दोन्ही मतदारसंघात येतो. शहरी चेहरा असलेल्या या मतदारसंघात मतदानाबाबतची उदासीनता स्पष्टपणे दिसून आली. मिरजेत ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान मिरज : मिरज विधानसभेसाठी ग्रामीण भागात सर्वाधिक ७० ते ७५ टक्के व मिरज शहरात केवळ ५५ टक्के मतदान झाले. शहरात मतदान कमी झाल्याने त्याचा कोणाला फटका बसणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. विधानसभेसाठी पंचरंगी लढत असतानाही शहरात मतदान कमी झाले. मिरज पूर्व भागातील मालगाव, आरग, बेडग यासह अन्य गावांत चुरशीने ७० ते ७५ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारीही कमी झाल्याने त्याचा कोणाला फायदा व कोणाला तोटा होणार, याचे आडाखे बांधण्यात येत आहेत. शहरात सुमारे सव्वालाख मतदार आहेत. ग्रामीण व शहरातील मतदानाच्या आकडेवारीमुळे कौल कुणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. (वार्ताहर)