शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

बीपीएल कुटुंबांसाठी ‘अस्मिता’

By admin | Updated: June 1, 2014 00:22 IST

अहमदनगर : जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा आकडा वाढावा, प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी जिल्हा परिषदेचा संपूर्ण स्वच्छता कक्ष प्रयत्न करीत आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा आकडा वाढावा, प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी जिल्हा परिषदेचा संपूर्ण स्वच्छता कक्ष प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी हागणदारी मुक्तीसाठी नियोजनबद्ध काम करण्यासाठी अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून यात वर्षभरात दारिद्र्यरेषेखाली ६८ हजार कुटुंबांचे शौचालय बांधून घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात हागणदारी मुक्तीसाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, यात फारसे यश जिल्हा परिषद प्रशासनाला आलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हागणदारीमुक्तीचा आकडा वाढत नसल्याची परिस्थिती होती. ज्या गावात हागणदारी मुक्ती झालेली असून त्या गावाने त्यात सातत्य ठेवले की नाही, याचा तपास करणारी यंत्रणा जिल्हा परिषदेकडे नसल्याने अडचणी वाढलेल्या आहेत. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील निर्मलग्राम योजनेची स्थिती खराब असून जी गावे यापूर्वी निर्मलग्राम झालेली आहेत. त्यांनी त्यांच्या कामगिरीत सातत्य ठवलेले नाही. यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी हागणदारी मुक्ती योजनेला वेग देण्यासाठी अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात असणार्‍या दारिद्र्य रेषेखालील ६८ हजार कुटुंबांचे शौचालय बांधून घेण्याचा यात संकल्प करण्यात आला आहे. सुरूवातीला जर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब शौचालय बांधून घेत असेल तर अन्य सधन कुटुंबे देखील त्याचे अनुकरण करतील, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. शौचालय बांधल्याने साथजन्य आजारांना चाप बसेल, सामाजिक स्तर उंचावेल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्राधान्य देणे, या सर्व कुटुंबांना शौचालयाचे फायदे समजावून सांगणे, महिला केंद्र बिंंदूमानून महिला कुटुंब प्रमुखांना प्राधान्याने शौचालय बांधण्याचे अनुदान देणे, महिला ग्रामसभा, बचत गटांना माहिती देणे, विधानसभा निवडणुकीपूर्वी आचारसंहितेपूर्वी पात्र कुटुंबांची यादी अंतिम करणे, पात्र कुटुंबांना प्रोत्साहन अनुदान मिळवून देणे.जिल्हा परिषद प्रशासन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी कितीही प्रयत्न केले तरी हागणदारी मुक्तीसाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी यांची साथ आवश्यक आहे. अस्मिता योजनेत त्यांचा सहभाग घेण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे.