शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

बीपीएल कुटुंबांसाठी ‘अस्मिता’

By admin | Updated: June 1, 2014 00:22 IST

अहमदनगर : जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा आकडा वाढावा, प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी जिल्हा परिषदेचा संपूर्ण स्वच्छता कक्ष प्रयत्न करीत आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा आकडा वाढावा, प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी जिल्हा परिषदेचा संपूर्ण स्वच्छता कक्ष प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी हागणदारी मुक्तीसाठी नियोजनबद्ध काम करण्यासाठी अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून यात वर्षभरात दारिद्र्यरेषेखाली ६८ हजार कुटुंबांचे शौचालय बांधून घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात हागणदारी मुक्तीसाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, यात फारसे यश जिल्हा परिषद प्रशासनाला आलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हागणदारीमुक्तीचा आकडा वाढत नसल्याची परिस्थिती होती. ज्या गावात हागणदारी मुक्ती झालेली असून त्या गावाने त्यात सातत्य ठेवले की नाही, याचा तपास करणारी यंत्रणा जिल्हा परिषदेकडे नसल्याने अडचणी वाढलेल्या आहेत. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील निर्मलग्राम योजनेची स्थिती खराब असून जी गावे यापूर्वी निर्मलग्राम झालेली आहेत. त्यांनी त्यांच्या कामगिरीत सातत्य ठवलेले नाही. यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी हागणदारी मुक्ती योजनेला वेग देण्यासाठी अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात असणार्‍या दारिद्र्य रेषेखालील ६८ हजार कुटुंबांचे शौचालय बांधून घेण्याचा यात संकल्प करण्यात आला आहे. सुरूवातीला जर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब शौचालय बांधून घेत असेल तर अन्य सधन कुटुंबे देखील त्याचे अनुकरण करतील, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. शौचालय बांधल्याने साथजन्य आजारांना चाप बसेल, सामाजिक स्तर उंचावेल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्राधान्य देणे, या सर्व कुटुंबांना शौचालयाचे फायदे समजावून सांगणे, महिला केंद्र बिंंदूमानून महिला कुटुंब प्रमुखांना प्राधान्याने शौचालय बांधण्याचे अनुदान देणे, महिला ग्रामसभा, बचत गटांना माहिती देणे, विधानसभा निवडणुकीपूर्वी आचारसंहितेपूर्वी पात्र कुटुंबांची यादी अंतिम करणे, पात्र कुटुंबांना प्रोत्साहन अनुदान मिळवून देणे.जिल्हा परिषद प्रशासन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी कितीही प्रयत्न केले तरी हागणदारी मुक्तीसाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी यांची साथ आवश्यक आहे. अस्मिता योजनेत त्यांचा सहभाग घेण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे.